शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
5
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
6
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
7
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
8
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
9
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
10
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
11
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
12
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
13
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
14
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
15
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
16
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
17
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
18
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान
19
दिवाळीची भेट! सरकारच्या लाखो कर्मचाऱ्यांसाठी मोठा बोनस जाहीर; दसऱ्यापूर्वीच रक्कम हातात येणार
20
चमत्कार दाखवा आणि २१ लाख जिंका! अंनिसचे बुवा-बाबांना आव्हान; ३६ वर्षांत कोणीच पुढे आले नाही

सुप्रिम कॉलनीतील महिलांचा दोन महिन्यात मनपावर तिसरा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:32 IST

खासगी कंपनीकडून पाणी देण्याचे दिले आश्वासन

जळगाव : पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नसल्याने सुप्रिम कॉलनीतील शेकडो महिलांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणत, जर चार दिवसात या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर मुला-बाळांसह मनपात ठिय्या आंदोलनाचा इशारा या भागातील महिलांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, पाण्याचा प्रश्नासाठी या भागातील महिलांचा दोन महिन्यातील हा तीसरा मोर्चा असून, प्रशासनाकडून देखील तिनही वेळा एकच उत्तर देण्यात आले आहे.शहरातील सुप्रिम कॉलनी भागात पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जात असून, या भागातील नागरिक हैराण झाले आहेत. मनपा प्रशासनाकडून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या भागातील महिलांनी नगरसेवक गणेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी १२ वाजता मनपा आयुक्तांच्या दालनात मोर्चा आणला. तसेच काही महिला व नगरसेवक गणेश सोनवणे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता डी.एस.खडके हे देखील उपस्थित होते. सुप्रिम कॉलनीतील महिलांनी मार्च महिन्यात दोनवेळा मनपात मोर्चे आणले होते. तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा दिला होता. मात्र, तेव्हाही प्रशासनाने केवळ आश्वासन दिले होते.कोणाही कडून पाणी घ्या, पण आम्हाला पाणी द्याआयुक्तांनी यावेळी एमआयडीसीकडून पाणी घेण्यात येणार असून, लवकरच या भागात पाणी पुरवठा नियमित करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, या भागातील महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रत्येकवेळा मनपात मोर्चा आणल्यानंतर प्रशासनाकडून चार दिवसात पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले जाते. तर आमदार सुरेश भोळे देखील अनेक महिन्यांपासून केवळ आश्वासन देत असून, ते देखील जैन इरिगेशनकडून पाणी आणून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, कोणाही कडून पाणी आणा, पण आम्हाला पाणी द्या अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी व्यक्त केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव