शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

सुप्रिम कॉलनीतील महिलांचा दोन महिन्यात मनपावर तिसरा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:32 IST

खासगी कंपनीकडून पाणी देण्याचे दिले आश्वासन

जळगाव : पंधरा-पंधरा दिवस पाणी येत नसल्याने सुप्रिम कॉलनीतील शेकडो महिलांनी सोमवारी मनपावर मोर्चा आणत, जर चार दिवसात या भागातील पाण्याचा प्रश्न सोडवला नाही तर मुला-बाळांसह मनपात ठिय्या आंदोलनाचा इशारा या भागातील महिलांनी मनपा प्रशासनाला दिला आहे. दरम्यान, पाण्याचा प्रश्नासाठी या भागातील महिलांचा दोन महिन्यातील हा तीसरा मोर्चा असून, प्रशासनाकडून देखील तिनही वेळा एकच उत्तर देण्यात आले आहे.शहरातील सुप्रिम कॉलनी भागात पाण्याची समस्या दिवसेंदिवस बिकट होत जात असून, या भागातील नागरिक हैराण झाले आहेत. मनपा प्रशासनाकडून पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने या भागातील महिलांनी नगरसेवक गणेश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी दुपारी १२ वाजता मनपा आयुक्तांच्या दालनात मोर्चा आणला. तसेच काही महिला व नगरसेवक गणेश सोनवणे यांनी मनपा आयुक्तांची भेट घेतली. यावेळी मनपा विरोधी पक्षनेते सुनील महाजन, पाणी पुरवठा विभागाचे मुख्य अभियंता डी.एस.खडके हे देखील उपस्थित होते. सुप्रिम कॉलनीतील महिलांनी मार्च महिन्यात दोनवेळा मनपात मोर्चे आणले होते. तर लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचाही इशारा दिला होता. मात्र, तेव्हाही प्रशासनाने केवळ आश्वासन दिले होते.कोणाही कडून पाणी घ्या, पण आम्हाला पाणी द्याआयुक्तांनी यावेळी एमआयडीसीकडून पाणी घेण्यात येणार असून, लवकरच या भागात पाणी पुरवठा नियमित करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. मात्र, या भागातील महिलांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करत प्रत्येकवेळा मनपात मोर्चा आणल्यानंतर प्रशासनाकडून चार दिवसात पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले जाते. तर आमदार सुरेश भोळे देखील अनेक महिन्यांपासून केवळ आश्वासन देत असून, ते देखील जैन इरिगेशनकडून पाणी आणून प्रश्न सोडविण्याचे आश्वासन देत आहेत. मात्र, कोणाही कडून पाणी आणा, पण आम्हाला पाणी द्या अशी संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी व्यक्त केली.

टॅग्स :Jalgaonजळगाव