शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

कापूसकोंडय़ाची गोष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2017 11:01 IST

‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’ किती जणांना आठवतेय? ािस्तपूर्व काळ या धर्तीवर बोलायचं तर ‘इंटरनेट’पूर्व काळातली ती गोष्ट आहे. तो एक प्रकारचा खेळ होता.

 ‘कापूसकोंडय़ाची गोष्ट’ किती जणांना आठवतेय? ािस्तपूर्व काळ या धर्तीवर बोलायचं तर ‘इंटरनेट’पूर्व काळातली ती गोष्ट आहे. तो एक प्रकारचा खेळ होता. एखाद्याला विचारायचं, ‘‘तुला कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगू?’’ आणि मग त्यावर तो काहीही बोलला किंवा न बोलला, तरी परत परत तेच विचारायचं, ‘‘कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगू?’’ ऐकणारा पार ‘किर्र’ होईर्पयत असं विचारतच रहायचं.. प्रत्यक्ष गोष्टीला सुरुवात कधी होतच नाही! कारण अशी कोणतीही ‘गोष्ट’ प्रत्यक्षात कधी नसतेच. समोरच्याचं डोकं फिरवण्यासाठी ते नाव फक्त पुन्हा पुन्हा घेतात. थोडक्यात काय, तर काहीही विचार नसलेली, मुद्दा नसलेली किंबहुना ‘गोष्ट’सुद्धा नसलेली अखंड वटवट म्हणजे कापूसकोंडय़ाची गोष्ट.

मला लहानपणी फार कुतूहल होतं, की हा कापूस कोंडय़ा नक्की कुठे असतो? त्याची गोष्ट नक्की कशाबद्दल आहे? वगैरे वगैरे.. मोठेपणी, अलीकडेच हे कोडं उलगडलं. कापूसकोंडय़ा दिसला कधीच नाही, पण त्याचा वावर कुठे असतो ते मात्र समजलं. चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच.. पण जाऊ द्या, उगाच डोक्याला ताण नको. मीच सांगून टाकतो. 24 तास बातम्यांचा रतीब अदृश्य रूपाने वावरत असतो. कारण  त्याचीच गोष्ट सांगायला सगळे चर्चावीर एकत्र जमलेले असतात. मोठमोठय़ाने, तावातावाने, घशाच्या शिरा ताणून ते सूत्रसंचालकाला, एकमेकांना आणि प्रेक्षकांना या कापूसकोंडय़ाची गोष्ट तर सांगत असतात. आठवून बघा. कितीही तास चर्चा- महाचर्चा चालली चालली तरी ती (एकदाची) संपल्यानंतर फक्त अध्र्या तासाने आपण प्रेक्षकांनी आठवण्याचा प्रय} केला की, थोडय़ा वेळापूर्वी आपण काय ऐकलं? तर काही म्हणता काही लक्षात रहात नाही. फक्त कुणीतरी चष्मीष्ट बुवा किंवा बाई, ‘‘मला.. मला.. मला.. मला. असं म्हणायचंय-’’ असं तार सप्तकात बोलताहेत, आणि त्याचवेळी इतर सर्व भिडू प्रचंड गदारोळ करून आपापलं सप्तक लावताहेत, एवढंच लक्षात रहातं. जो-तो आपापल्या परीने आपापली कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगत असतो.
गोष्टीला विषय कोणताही- अक्षरश: कोणताही चालतो. कोणीतरी लहान मुलगा खेळताना बोअर-वेलच्या खड्डय़ात पडला.. कोणत्याही सुमार नटीचा झगा एखाद्या फिल्मी पार्टीत टरकला.. कोणातरी अति श्रीमंत, लाडावलेल्या कार्टीने तुफान दारू पिऊन तुफान वेगाने गाडी चालवून धडकावली.. एखाद्या ‘बोल्ड’ वगैरे नटीने अंगावरल्या कपडय़ांबद्दल असलेल्या आपल्या अॅलर्जीची लागण इतरांना केली.. एखाद्या (इंग्रजीत लिहिणा:या) देशी लेखिकेने हलाहल पचवणा:या शंकराच्या आवेशात ‘मी आता बीफ खाणार आहे’ म्हणून घोषणा केली.. इथपासून ते थेट- अमेरिकेच्या लोकांनी हिलरीबाईंच्या ऐवजी ट्रंप साहेबाला निवडून दिलं.. ओबामाने पाकिस्तानला न विचारता, ओसामा बिन लादेनला मारलं.. कोणत्यातरी जागतिक विचारवंताने आपण ‘गे’ असल्याची घोषणा केली.. इथर्पयत, कोणताही विषय असला, तरी चालतोय की! बघता बघता मिठाईवर माशा जमाव्यात, तसे नेहमीचे यशस्वी चर्चावीर वाहिन्यांवर जमा होतात. आणि ‘एक, दोन..साडे-माडे तीन!’ म्हटलं की, कापूस कोंडय़ाची गोष्ट सुरू होते. ज्या फालतू विषयांवरच्या चर्चेने समाजाचा काडीचाही फायदा होणार नाहीये, आणि ज्या विषयांवरची यांची बडबड संबंधितांर्पयत आयुष्यात कधी पोहोचणार नाहीये, अशा विषयांवर चाललेलं चर्चेचं गु:हाळ किती चालवावं, याला काही सुमार?
या कापूसकोंडय़ाचा कापूस नीट पिंजला जातोय की नाही, याकडे सूत्रसंचालक जातीने लक्ष ठेवून असतात. कोणीही कोणालाही पूर्ण बोलू देणार नाही, आणि कोणीही कोणाचंही म्हणणं नीट ऐकून घेणार नाही, याची संपूर्ण खबरदारी चर्चेच्या दरम्यान घेतली जाते. सगळ्यात जास्त आरडा-ओरडा करणा:या आणि सगळ्यात बेअकली विधानं करणा:या भिडूला अगदी आवजरून निमंत्रण असतं! सवाल टी.आर.पी.का है भाई! आताचंच बघा ना- राष्ट्रपतीपदाचा उमेदवार जाहीर झालाय. आता वाहिन्या- वाहिन्यांवर कापूसकोंडय़ाच्या गोष्टी सुरू होतील. घनघोर चर्चा होतील. ‘कुठेही जाऊ नका.. आम्ही लगेच परत येतोय,’ असा गोड दम दिला जाईल.. एन्जॉय!-ते जाऊ द्या.. कापूसकोंडय़ाची गोष्ट सांगू?
-अॅड.सुशील अत्रे