शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

अनलॉक करताना राहणार दुहेरी आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:56 IST

लॉकडाऊन हटविताना कंटेनमेंट झोनमधील हालचालींवर प्रतिबंध, ६९ दिवसांनंतर मोकळा श्वास घेणाऱ्या जनतेकडून स्वनियंत्रण हवे, कोरोनापासून बचावासाठी उपाययोजनांकडे दुर्लक्ष नकोच

मिलिंद कुलकर्णी

लॉकडाऊनचे चौथे पर्व संपताना केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत पाचवे पर्व सुरु राहील, अशी घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा करताना हे लॉकडाऊन केवळ कोरोनाचा उद्रेक झालेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात राहील, असा दिलासा दिलेला आहे. चौथे पर्व सुरु करताना १८ मे पासून रेड झोन आणि नॉन रेड झोन अशी विभागणी केलेली होती. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर खान्देशचा विचार केला तर जळगाव आणि धुळे ही दोन महापालिका क्षेत्रे रेड झोनमध्ये आहेत, नंदुरबारसह उर्वरित तालुका क्षेत्रे ही नॉन रेड झोनमध्ये आहेत. परंतु, कोरोनाचा उद्रेक ज्या पध्दतीने झाला, त्यामुळे संचारबंदी, जनता कर्फ्यू या नावाखाली प्रतिबंध कायम राहिले. त्यामुळे निर्बंध शिथील होत असले तरी स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी जो निर्णय घेतील, त्याचीच अंमलबजावणी होणार आहे. लॉकडाऊनच्या चार पर्वात कोरोना बाधितांची संख्या टप्प्या टप्प्याने वाढली. बहुदा, मे अखेर हा उच्चांकी टप्पा असावा. नंदुरबारमध्ये अद्यापही स्थिती नियंत्रणात आहे. अधिकृतपणे तीन तालुक्यांमध्ये ३४ रुग्ण आहेत. तळोद्यातील रुग्ण नाशिकला उपचार घेत असल्याने तांत्रिकदृष्टया त्याची नोंद तिकडे आहे. गुजराथच्या सीमेवरील नवापूर आणि दुर्गम भाग असलेला धडगाव तालुका सुदैवाने अद्याप सुरक्षित आहे. धुळ्यात परिस्थिती नियंत्रणात असली तरी धुळे शहर हे शंभरीकडे वाटचाल करीत आहे, तर शिरपुरात आश्चर्यकारक रीत्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परराज्यात रोजगारासाठी गेलेले स्थानिक मजूर परतल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची भीती खरी ठरताना दिसत आहे. जळगाव जिल्हा तर ७०० चा टप्पा ओलांडत आहे. जळगाव (१५६), भुसावळ (१६०), अमळनेर (१२८) या तीन शहरांपाठोपाठ भडगाव (७२), चोपडा (३८), रावेर (२९), पाचोरा (२६), यावल (१९), जळगाव ग्रामीण (१६), धरणगाव (१४) या तालुक्यांमध्ये बाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. दिलासा एवढाच आहे की, बोदवड आणि मुक्ताईनगर तूर्त तरी संसर्गापासून दूर आहेत. अनलॉक करीत असताना कोरोनासंबंधी सुरक्षेची पुरेपूर उपाययोजना करावी लागणार आहे. ६९ दिवस लोक घरात कैद होते. आता निर्बंध हटविल्याने गर्दी होणार आहे. त्यावेळी सुरक्षित अंतर, मास्क या गोष्टींचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. जिल्ह्यातील सगळ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, हे स्वागतार्ह पाऊल आहे. त्यासोबतच कोवीड रुग्णालय, विलगीकरण कक्षातील सोयी-सुविधा, प्रयोगशाळेतून लवकर अहवाल मिळतील, यासाठी प्रयत्नांची आता खरी गरज आहे. देशातील सरासरी मृत्यूदरापेक्षा खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातील मृत्यूदर तिप्पट-चौपट आहे. बरे होण्याचे प्रमाण वाढविणे आणि मृत्यूदर कमी करण्यावर आता आरोग्य प्रशासनाचा भर असायला हवा. जिल्हा बंदी व राज्यबंदी हटविली जात असताना आणि १ जूनपासून रेल्वे व विमानसेवा सुरु होत असताना संगर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिक आणि प्रशासन दोघांनीही पुरेशी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा धोका टळलेला नाही, आपण त्यावर मात केलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे.६९ दिवस लॉकडाऊन असलेला देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचलेली असताना निर्बंध शिथील होत असल्याने दुहेरी आव्हान प्रशासनापुढे राहणार आहे.जून-जुलैत उद्रेकाची शक्यता लक्षातघेऊन अनलॉक करताना पुरेशी सावधगिरी, खबरदारी घ्यायला हवी. कोवीड रुग्णालय व विलगीकरण कक्षात पुरेशा सोयी-सुविधा, लवकर नमुने घेणे, त्याचे अहवाल येणे या बाबींकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालींवर निर्बंध ठेवणे गरजेचे असल्याने कठोरपणे परिस्थिती हाताळावी लागणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव