शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

अनलॉक करताना राहणार दुहेरी आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 12:56 IST

लॉकडाऊन हटविताना कंटेनमेंट झोनमधील हालचालींवर प्रतिबंध, ६९ दिवसांनंतर मोकळा श्वास घेणाऱ्या जनतेकडून स्वनियंत्रण हवे, कोरोनापासून बचावासाठी उपाययोजनांकडे दुर्लक्ष नकोच

मिलिंद कुलकर्णी

लॉकडाऊनचे चौथे पर्व संपताना केंद्र सरकारने ३० जूनपर्यंत पाचवे पर्व सुरु राहील, अशी घोषणा केली आहे. मात्र ही घोषणा करताना हे लॉकडाऊन केवळ कोरोनाचा उद्रेक झालेल्या प्रतिबंधात्मक क्षेत्रात राहील, असा दिलासा दिलेला आहे. चौथे पर्व सुरु करताना १८ मे पासून रेड झोन आणि नॉन रेड झोन अशी विभागणी केलेली होती. आता अनलॉकच्या पार्श्वभूमीवर खान्देशचा विचार केला तर जळगाव आणि धुळे ही दोन महापालिका क्षेत्रे रेड झोनमध्ये आहेत, नंदुरबारसह उर्वरित तालुका क्षेत्रे ही नॉन रेड झोनमध्ये आहेत. परंतु, कोरोनाचा उद्रेक ज्या पध्दतीने झाला, त्यामुळे संचारबंदी, जनता कर्फ्यू या नावाखाली प्रतिबंध कायम राहिले. त्यामुळे निर्बंध शिथील होत असले तरी स्थानिक परिस्थिती पाहून जिल्हाधिकारी जो निर्णय घेतील, त्याचीच अंमलबजावणी होणार आहे. लॉकडाऊनच्या चार पर्वात कोरोना बाधितांची संख्या टप्प्या टप्प्याने वाढली. बहुदा, मे अखेर हा उच्चांकी टप्पा असावा. नंदुरबारमध्ये अद्यापही स्थिती नियंत्रणात आहे. अधिकृतपणे तीन तालुक्यांमध्ये ३४ रुग्ण आहेत. तळोद्यातील रुग्ण नाशिकला उपचार घेत असल्याने तांत्रिकदृष्टया त्याची नोंद तिकडे आहे. गुजराथच्या सीमेवरील नवापूर आणि दुर्गम भाग असलेला धडगाव तालुका सुदैवाने अद्याप सुरक्षित आहे. धुळ्यात परिस्थिती नियंत्रणात असली तरी धुळे शहर हे शंभरीकडे वाटचाल करीत आहे, तर शिरपुरात आश्चर्यकारक रीत्या रुग्णांची संख्या वाढत आहे. परराज्यात रोजगारासाठी गेलेले स्थानिक मजूर परतल्याने संसर्गाचा धोका अधिक वाढण्याची भीती खरी ठरताना दिसत आहे. जळगाव जिल्हा तर ७०० चा टप्पा ओलांडत आहे. जळगाव (१५६), भुसावळ (१६०), अमळनेर (१२८) या तीन शहरांपाठोपाठ भडगाव (७२), चोपडा (३८), रावेर (२९), पाचोरा (२६), यावल (१९), जळगाव ग्रामीण (१६), धरणगाव (१४) या तालुक्यांमध्ये बाधितांची वाढणारी संख्या चिंताजनक आहे. दिलासा एवढाच आहे की, बोदवड आणि मुक्ताईनगर तूर्त तरी संसर्गापासून दूर आहेत. अनलॉक करीत असताना कोरोनासंबंधी सुरक्षेची पुरेपूर उपाययोजना करावी लागणार आहे. ६९ दिवस लोक घरात कैद होते. आता निर्बंध हटविल्याने गर्दी होणार आहे. त्यावेळी सुरक्षित अंतर, मास्क या गोष्टींचे पालन करणे आवश्यक राहणार आहे. जिल्ह्यातील सगळ्यांची आरोग्य तपासणी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे, हे स्वागतार्ह पाऊल आहे. त्यासोबतच कोवीड रुग्णालय, विलगीकरण कक्षातील सोयी-सुविधा, प्रयोगशाळेतून लवकर अहवाल मिळतील, यासाठी प्रयत्नांची आता खरी गरज आहे. देशातील सरासरी मृत्यूदरापेक्षा खान्देशातील तिन्ही जिल्ह्यातील मृत्यूदर तिप्पट-चौपट आहे. बरे होण्याचे प्रमाण वाढविणे आणि मृत्यूदर कमी करण्यावर आता आरोग्य प्रशासनाचा भर असायला हवा. जिल्हा बंदी व राज्यबंदी हटविली जात असताना आणि १ जूनपासून रेल्वे व विमानसेवा सुरु होत असताना संगर्गापासून बचाव करण्यासाठी नागरिक आणि प्रशासन दोघांनीही पुरेशी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे. कोरोनाचा धोका टळलेला नाही, आपण त्यावर मात केलेली नाही, हे लक्षात घ्यायला हवे.६९ दिवस लॉकडाऊन असलेला देश अनलॉक करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या उच्चांकी पातळीवर पोहोचलेली असताना निर्बंध शिथील होत असल्याने दुहेरी आव्हान प्रशासनापुढे राहणार आहे.जून-जुलैत उद्रेकाची शक्यता लक्षातघेऊन अनलॉक करताना पुरेशी सावधगिरी, खबरदारी घ्यायला हवी. कोवीड रुग्णालय व विलगीकरण कक्षात पुरेशा सोयी-सुविधा, लवकर नमुने घेणे, त्याचे अहवाल येणे या बाबींकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. प्रतिबंधित क्षेत्रातील हालचालींवर निर्बंध ठेवणे गरजेचे असल्याने कठोरपणे परिस्थिती हाताळावी लागणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव