शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

फत्तेपूर परिसरात नुकसानीचे पंचनामेच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2020 23:18 IST

अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने केले असले तरी अजूनही फत्तेपूर परिसरातील शेतकरी पंचनामे झाले नसल्याची तक्रार करीत आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त आमदार महाजन यांनी लक्ष देण्याची मागणी

जामनेर : तालुक्यात अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे कृषी व महसूल विभागाने केले असले तरी अजूनही फत्तेपूर परिसरातील शेतकरी पंचनामे झाले नसल्याची तक्रार करीत आहे. तलाठी व कृषी विभागाकडे वारंवार विनंती करूनही नुकसानीचे पंचनामे होत नसल्याने आमदार गिरीश महाजन यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी होत आहे. मदत मिळेल अथवा नाही याची शाश्वती नाही, मात्र पंचनामे होत नाही ही लाजीरवाणी बाब असल्याचे संतप्त शेतकरी बोलत आहे.सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने मका, कापूस, सोयाबीन व इतर कडध्यान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महसूल व कृषी विभागाने सुमारे १ हजार हेक्टर क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे केले.पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे तक्रार नोंदविली आहे. मात्र अद्याप काहीही कार्यवाही होत नसल्याचे शेतकरी सांगतात. शेतकºयांनी महागडे बियाणे घेऊन पेरणी केली, उत्पादन हाती येण्याची वेळ आली असत निसर्गाच्या अवकृपेने तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे.पाच एकरमध्ये मका लावला आतापर्यंत सुमारे ७० हजार खर्च आला. अतिवृष्टीने मक्याचे पीक आडवे झाले. आता फक्त १० टक्के उत्पादन निघेल अशी स्थिती आहे. शेतकºयांच्या या प्रश्नाकडे आमदार गिरीश महाजन यांनी लक्ष घालून प्रशासनास पंचनामे करून मदत मिळवून द्यावी एवढीच अपेक्षा आहे.- पंकज चोपडे, शेतकरी, फत्तेपूरतालुक्यातील नुकसानग्रस्त शेतातील पिकांचे पंचनामे केले आहे. तरीही राहीलेल्या शेककºयांचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित भागातील कृषी सहायकांना दिले जातील.-अभिमन्यू चोपडे, तालुका कृषी अधिकारी, जामनेरअजूनही ३ टक्के भागातील शेतकºयांंचे पंचनामे झालेले नाही. फत्तेपूर मंडळ अधिकाºयांना पंचनाम्याचे आदेश दिले आहे. ज्या शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे झाले नसतील त्यांनी स्थानिक तलाठ्यांशी संपर्क साधावा.- अरुण शेवाळे, तहसीलदार 

टॅग्स :FarmerशेतकरीJamnerजामनेर