शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात गटबाजीला नाही फुलस्टॉप अन् म्हणे ५० टक्के लोकप्रतिनिधी काँग्रेसचे

By अमित महाबळ | Updated: September 27, 2022 12:44 IST

अन्यथा ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’अशी अवस्था दिसायची.

अमित महाबळ - जळगावजळगाव : जिल्हा काँग्रेसमधील गटबाजीला फुलस्टॉप लागलेला नाही. प्रदेशकडून प्रभारी येऊन जातात, आढावा बैठक घेतात; पण एक गट आत्मसन्मानासाठी चार हात लांबच राहतो, तर दुसरा आपल्याच समर्थनार्थ शक्तिप्रदर्शन करून घेतो. पक्षाला निवडणुकांना सामोरे जायचेय; पण दुरावलेली मनेच जुळत नाहीत म्हटल्यावर एक खासदार आणि पाच आमदार निवडून आणण्याचे लक्ष्य साध्य होणार कसे ? अन्यथा ‘बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात’अशी अवस्था दिसायची.

जिल्हा काँग्रेसमध्ये गटबाजी आहे. वर्चस्वाची स्पर्धा आहे. एकाला मित्र प्रिय आहे, तर दुसऱ्याला पक्ष महत्त्वाचा वाटतोय पण दोन्ही चाके सांभाळून गाडा ओढून नेणारे सक्षम नेतृत्व पक्षाकडे नाही. पक्षातले काही जण जिल्हाध्यक्ष प्रदीप पवार यांच्यावर नाराज आहेत. पवार यांच्या पाठीशी आमदार शिरीष चौधरी आहेत. ते पक्षाचे एकमेव आमदार आहेत. माजी खासदार डॉ.उल्हास पाटील यांची आजची भूमिका स्वत:चा व्यवसाय सांभाळून मग राजकारण अशी आहे. पक्षाला पूर्णवेळ देणारा, कार्यकर्त्यांचे ऐकून घेऊन त्यांची कामे मार्गी लावणारा आणि ऊर्जितावस्था आणेल असा नेता हवा आहे.

गोलमाल भूमिका

पक्षात उघडउघड दोन गट एकमेकांविरोधात आहेत. त्यांच्या महत्त्वाकांक्षा वेगळ्या आहेत. प्रभारी आल्यावर असंतुष्टांच्या गटाने आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. अध्यक्ष हटावची मागणी केली. रात्रीतून असे काही घडले की दुसऱ्या दिवशी असंतुष्टांचा गट पक्षाच्या आढावा बैठकीत दिसलाच नाही. त्यांच्या तक्रारींमुळे दुखावलेल्या जिल्हाध्यक्षांनी आपल्याला कार्यकर्त्यांचे किती समर्थन आहे हे दाखविण्याचा प्रयत्न बैठकीत केला. यावेळी जिल्ह्याचे प्रभारी विनायक देशमुख हजर होते. त्यांनी अशा शक्तिप्रदर्शनाला त्याचक्षणी रोखले नाही; मात्र बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना गटबाजीत स्वारस्य नसल्याचे सांगितले. त्यांची नेमकी भूमिका काय म्हणायची ? यातून ते जिल्हाध्यक्ष पवार यांच्या पाठीशी आहेत, असा संदेश दुसऱ्या गटात गेला.

आमदाराचे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न

प्रभारींना पक्ष वाढवायचा असेल तर गटांना एकत्र आणावे लागेल. काम करणाऱ्यांना संधी द्यावी लागेल. पक्ष महाविकास आघाडीचा सदस्य आहे. सहकारी घटक पक्ष राष्ट्रवादी व शिवसेना या दोघांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. काँग्रेसमध्ये त्या दृष्टीने शांतता आहे. रावेरचे आमदार शिरीष चौधरी नाराज आहेत. पक्षातून त्यांचे स्थान डळमळीत करण्याचा प्रयत्न चालला आहे. ते भाजपात जाणार असल्याची अफवा पसरविणारे पक्षातीलच आहेत; पण त्यांच्यावर कारवाई होत नसल्याचा त्यांचा त्रागा होता. राजकारणात जे अपेक्षित नव्हते ते गेल्या साडेतीन महिन्यात घडून गेले आहे. त्यासंदर्भाने प्रभारींना जळगाव जिल्ह्यात काळजी घ्यावी लागणार आहे.

लोकांनी काँग्रेसकडे यावे कशासाठी ?

युवक काँग्रेस मोठी ताकद आहे. बाकीचे सेल / आघाड्या आहेत. त्यांना वाढवले पाहिजे. भाजपा, शिवसेना व राष्ट्रवादी नको असलेल्यांनी जायचे कुठे, काँग्रेसमध्ये यावे तर पक्षाकडे आहे तरी काय ? गटबाजीला वेळीच विराम लागला नाही, तर जे आज पक्षात दिसत आहेत तेही पक्षापासून दूर जातील. त्याची सुरुवात झाली आहे. धरणगावचे काँग्रेसचे निष्ठावंत डी. जी. पाटील यांच्या मुलाने नुकतीच भाजपाची वाट धरली आहे. एका दिवसांत चमत्कार होण्याची अपेक्षा कार्यकर्त्यांना नाही. पाच-पन्नास कार्यकर्त्यांच्या भरवशावर पक्ष चालत नाही. पण पक्ष कार्यालयातील कार्यक्रमांचे फोटो पाहिल्यावर पक्ष कसा चालतो हे चाणाक्ष नजरेतून सुटल्याशिवाय राहत नाही.

टॅग्स :Jalgaonजळगावcongressकाँग्रेसPoliticsराजकारण