शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

जागोजागी रस्त्यांवर साचले डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 13:09 IST

गैरसोय : वाहनधारकांसह पादचाऱ्यांची कसरत, मनपा प्रशासन, लोकप्रतिनिधीचे सपशेल दुर्लक्ष

जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील सर्व रस्त्यांसह अंतर्गंत रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबले आहे. यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन काढताना तारेवरची कसरत करावी लागत असून, दुसरीकडे अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना रस्तादेखील शिल्लक राहिला नसल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या पाहणीत आढळून आले. विशेष म्हणजे या रस्त्यांवरून मनपाचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांचा वापर सुरू असतानांही त्यांचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.

शहरात एकीकडे कचºयाची समस्या वाढत असतांना दुसरीकडे शहरातील रस्त्यांची समस्यादेखील बिकट झाली आहे. जागोजागी असलेल्या खड्डयांमध्ये पाणी तुंबत असल्यामुळे काही ठिकाणी तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणाहून वाहन काढतांना खड्डयांचा अंदाज येत नसल्याने, दुचाकी सारखे वाहन घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परिणामी या ठिकाणाहून वाहतूक संथ गतीने सुरू असून, वाहतुकीची कोंडी उद्भवत आहे. अग्रवाल चौक, महेश चौक व पिंप्राळा रेल्वे गेटकडून रिंगरोडकडे जाणाºया रस्त्यावर तर पादचाºयांना पायी चालण्यासाठी देखील रस्ता नसल्याचे दिसून आले.यामुळे या परिसरातील रहिवाशांकडून मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.दोन दिवसांपूर्वी दुचाकीस्वाराचा अपघातदोन दिवसांपूर्वी पावसामुळे सकाळी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. पाण्यामुळे खड्डयांचा अंदाज न आल्याने, एका दुचाकी स्वाराचे वाहन या ठिकाणी घसरले. तसेच अनेकवेळा रिक्षा, कार ही मोठी वाहनेदेखील फसल्याचे प्रकार घडत असल्याचेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे हा भाग सखल असल्याने, चारही बाजूने पाणी येते. त्यामुळे पावसाळ््यातील चारही महिने या ठिकाणी खड्डे असतात आणि पाणीही असते.अग्रवाल चौकात वाहनधारकांची कसरतशहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महामार्गालगत असलेल्या अग्रवाल चौकात मू. जे. महाविद्यालयाकडे जाणाºया रस्त्यावर भलीमोठी पाण्याची डबकी तुंबली आहेत. आधीच सखल भाग आणि त्यातही जागोजागी खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी अधिकच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन काढतांना अत्यंत तारेवरची कसरत करावी लागत आहे. पााऊस आल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबत असून, पाण्याचा निचरा होईपर्यंत या रस्त्यावरून दुचाकीधारकांची वाहतुकच बंद होत असल्याचे येथील एका व्यावसायिकाने सांगितले. विशेष म्हणजे बहुतांश पादचारी नागरिकांचा तर या ठिकाणाहून वापरच बंद झाला असल्याचेही सांगण्यात आले. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाJalgaonजळगाव