शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
दिल्ली हल्ल्यापूर्वी पैसा आला कुठून? एनआयएसोबत ईडी करणार चौकशी, गृह मंत्रालयात उच्चस्तरीय बैठकीत झाला निर्णय
3
मराठी अधिकारी करणार दिल्लीच्या स्फोटाचा तपास
4
द. आफ्रिकेच्या फिरकीपुढे परीक्षा, पहिली कसोटी ईडनवर आजपासून, ‘डब्ल्यूटीसी’मध्ये स्थान बळकट करण्याची भारताकडे संधी
5
व्हाइट कॉलर टेरर मॉड्यूल : काश्मिरात १३ ठिकाणी छापे
6
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
7
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
8
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
9
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
10
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
11
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
12
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
13
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
14
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
15
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
16
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
17
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
18
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
19
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
20
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
Daily Top 2Weekly Top 5

जागोजागी रस्त्यांवर साचले डबके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 13:09 IST

गैरसोय : वाहनधारकांसह पादचाऱ्यांची कसरत, मनपा प्रशासन, लोकप्रतिनिधीचे सपशेल दुर्लक्ष

जळगाव : गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे शहरातील सर्व रस्त्यांसह अंतर्गंत रस्त्यांवर पावसाचे पाणी तुंबले आहे. यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन काढताना तारेवरची कसरत करावी लागत असून, दुसरीकडे अनेक ठिकाणी पादचाऱ्यांना रस्तादेखील शिल्लक राहिला नसल्याचे ‘लोकमत’ ने केलेल्या पाहणीत आढळून आले. विशेष म्हणजे या रस्त्यांवरून मनपाचे लोकप्रतिनिधी आणि अधिकाºयांचा वापर सुरू असतानांही त्यांचे सपशेल दुर्लक्ष झाले आहे.

शहरात एकीकडे कचºयाची समस्या वाढत असतांना दुसरीकडे शहरातील रस्त्यांची समस्यादेखील बिकट झाली आहे. जागोजागी असलेल्या खड्डयांमध्ये पाणी तुंबत असल्यामुळे काही ठिकाणी तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. या ठिकाणाहून वाहन काढतांना खड्डयांचा अंदाज येत नसल्याने, दुचाकी सारखे वाहन घसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

परिणामी या ठिकाणाहून वाहतूक संथ गतीने सुरू असून, वाहतुकीची कोंडी उद्भवत आहे. अग्रवाल चौक, महेश चौक व पिंप्राळा रेल्वे गेटकडून रिंगरोडकडे जाणाºया रस्त्यावर तर पादचाºयांना पायी चालण्यासाठी देखील रस्ता नसल्याचे दिसून आले.यामुळे या परिसरातील रहिवाशांकडून मनपा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.दोन दिवसांपूर्वी दुचाकीस्वाराचा अपघातदोन दिवसांपूर्वी पावसामुळे सकाळी ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी तुंबले होते. पाण्यामुळे खड्डयांचा अंदाज न आल्याने, एका दुचाकी स्वाराचे वाहन या ठिकाणी घसरले. तसेच अनेकवेळा रिक्षा, कार ही मोठी वाहनेदेखील फसल्याचे प्रकार घडत असल्याचेही सांगण्यात आले. विशेष म्हणजे हा भाग सखल असल्याने, चारही बाजूने पाणी येते. त्यामुळे पावसाळ््यातील चारही महिने या ठिकाणी खड्डे असतात आणि पाणीही असते.अग्रवाल चौकात वाहनधारकांची कसरतशहरातील अत्यंत वर्दळीचा आणि महामार्गालगत असलेल्या अग्रवाल चौकात मू. जे. महाविद्यालयाकडे जाणाºया रस्त्यावर भलीमोठी पाण्याची डबकी तुंबली आहेत. आधीच सखल भाग आणि त्यातही जागोजागी खड्डे पडल्यामुळे या ठिकाणी अधिकच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना या ठिकाणाहून वाहन काढतांना अत्यंत तारेवरची कसरत करावी लागत आहे. पााऊस आल्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी तुंबत असून, पाण्याचा निचरा होईपर्यंत या रस्त्यावरून दुचाकीधारकांची वाहतुकच बंद होत असल्याचे येथील एका व्यावसायिकाने सांगितले. विशेष म्हणजे बहुतांश पादचारी नागरिकांचा तर या ठिकाणाहून वापरच बंद झाला असल्याचेही सांगण्यात आले. 

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाJalgaonजळगाव