शहरं
Join us  
Trending Stories
1
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
2
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
3
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
4
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
5
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
6
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
7
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
8
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
9
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
10
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
11
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
12
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
13
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
14
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
15
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
16
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
17
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
18
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
19
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
20
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...

कपाशीच्या बियाणांबाबत शासनाकडून सूचनाच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2018 21:32 IST

कृषी विभाग अनभिज्ञ

ठळक मुद्दे इतर बियाणांबाबत गुरूवारी सूचना प्राप्त ६४३० क्विंटलचे आवंटन

जळगाव : जिल्ह्यात सर्वाधिक लागवडीचे क्षेत्र असलेल्या कपाशीच्या बियाणांबाबत कृषी विभागाला शासनाकडून अद्याप काहीच सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. इतकेच नव्हे तर बीटीच्या पूर्वी बंदी घातलेल्या बियाणांवर यावर्षीही बंदी आहे की नाही? याबाबत देखील कृषी विभाग अनभिज्ञ आहे. दरम्यान गुरूवार, २६ रोजी इतर पिकांच्या बियाणांबाबतची सूचना कृषी विभागाला प्राप्त झाली.यंदाच्या खरीप हंगामात जिल्ह्णात ८ लाख ३४ हजार ४५०हेक्टर क्षेत्र इतका पेरणी लक्षांक ठेवण्यात आला आहे. यामध्ये तृणधान्य १९०५२० हेक्टर, कडधान्य ११३५२० हेक्टर, गळीतधान्य ३५८६० हेक्टर, कापूस ४८३००० हेक्टर, तर ऊस पिकाचे ११५५० हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे लक्षांक आहे. या माध्यमातून जिल्ह्णात १२ लाख २१ हजार ४४७ मेट्रीक टन उत्पादनाचा लक्षांक आहे. याकरीता महाबीजकडून ६०२५ क्विंटल बियाणे उपलब्ध होणार आहे. तसेच कापूस पिकासाठी २३ लाख १६ हजार १४५ पाकिटांची कापूस बियाणांची मागणी करण्यात आली आहे. गतवर्षी बोंडअळीचा प्रादुर्भाव होऊन कापसाचे नुकसान झाले असले तरीही कापसाच्या क्षेत्रात यंदा घट होणार नसल्याचा कृषी विभागाचा दावा आहे.कपाशीच्या बियाणांबाबत अनभिज्ञतायंदा दुप्पट बोंडअळीचा प्रादुर्भाव होईल, असा अंदाज आहे. कारण बोंडअळी नष्ट करण्यासाठी योग्य उपाययोजना झाल्या नाहीत. त्यातच आता १५ मे पासून पेरणी सुरू होत आहे. काही ठिकाणी तर १ मे पासूनच पेरणी सुरू होते. जेमतेम १५ दिवसांचा, महिनाभराचा कालावधी उरला आहे. मात्र बियाणांची परवानगी अजून दिलेली नाही. भाव ठरवून दिलेला नाही. कोणत्या बियाणांवर बंदी आहे? याची सूचनाही अद्याप दिलेली नाही. मग १५ मे पर्यंत बियाणे शेतकऱ्यांपर्यंत कसे पोहोचणार? असा सवाल उपस्थित होत आहे.६४३० क्विंटलचे आवंटनअन्य पिकांच्या बियाणांबाबतचे आवंटन कृषी विभागाला गुरूवार, २६ रोजी प्राप्त झाले. सुमारे ६४३० क्विंटल बियाणांचे आवंटन प्राप्त झाले आहे.३ लाख ४० हजार मे.टन खतांची मागणीजिल्ह्यात रासायनिक खतांचा वापर राज्यात सर्वाधिक आहे. मागील वर्षी खरीपासाठी ३ लाख २८ हजार ३२ मेट्रीक टन तर रब्बीसाठी १ लाख १ हजार ४८९ मेट्रीक टन असा ४ लाख २९ हजार ५२१ मेट्रीक टन खताचा वापर झाला होता. २०१८ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने ३ लाख ४० हजार मेट्रीक टन खतांची मागणी केली आहे. मात्र मंजूर आवंटन अद्याप प्राप्त झालेले नाही. मात्र जिल्ह्यात खतांचा तुटवडा नसल्याचे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.