शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रचंड खर्च करून देखील बळीराजाची झोळी खालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 01:17 IST

आडगाव ता. चाळीसगाव परिसरात यंदा पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामासाठी शेतीत भरपूर पैसा लावून पिकांची लागवड केली, परंतु त्यातून नगण्य उत्पन्न येणार असल्याने बळीराजाची झोळी यंदा खालीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देकमी पावसामुळे आणि ऊसावर आलेल्या रोगामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे मन्याड धरणात पाणीच नसल्यामुळे यंदा उन्हाळी पिके घेताच येणार नसल्याची स्थिती येऊ घातली आहे.

सायगांव, ता. चाळीसगाव : गिरणा परिसरांतील शेतकऱ्यांची परिस्थिती यंदा एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे. खरीप हंगामासाठी शेतीत भरपूर पैसा खर्च करुन देखील हाती पिक येत नसल्याने जिकडे तिकडे नाराजीचाच सूर उमटतांना दिसत आहे.कपाशीची आवक कमी आणि यंदा भाव मात्र जास्तगिरणा परिसरांत शेतकºयांनी यंदा कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती, पण पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने कपाशीचे उत्पन्न जेमतेमच म्हणजे २० टक्क्यापेक्षा कमीच येईल की काय असा प्रश्न सध्या शेतकºयांपुढे आ वासून उभा आहे. त्यातच हंगामाच्या सुरुवातीला कपाशीला सहा हजारापर्यंत सध्या भाव मिळत आहे पुढे हा भाव कमी केला जातो आणि शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसले जातात. त्या वेळेस मिळणाºया भावामुळे कपाशी लागवडीचा खर्च देखील निघत नाही. कपाशीची आवक कमी आणि भाव जास्त अशी स्थिती यंदादेखील निर्माण झाली आहे.सध्या या परिसरात कपाशीची थोडया फार प्रमाणात वेचणीला सुरुवात झाली असून शासनाकडून हमीभाव घोषीत करावा अशी मागणी होत आहे .ऊसावर हुमनीचे आक्रमणयंदा गिरणा परिसरांत उसाची लागवड मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. शेतकºयानी खर्च देखील मोठया प्रमाणात केला होता पण उसावर हुमनी रोगाचे आक्रमण आणि अत्यंत कमी पाऊस त्यामुळे उसाचे पिक देखील येणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने ज्या शेतकºयांच्या ऊसांवर हुमनी रोग आढळून येत आहेत त्या शेताचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तसेच बºयाच शेतकºयांचे कमी पावसामुळे आणि ऊसावर आलेल्या रोगामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.बोंडअळीच्या पैशांची प्रतीक्षाच सायगांव व परिसरांत मागच्या वर्षी पंचनामे झालेल्या बोंडअळीग्रस्त कपाशीचे पैसे गिरणा परिसरातील शेतकºयांच्या खात्यावर पडले पण सायगांव येथील शेतकº्यांना बोंडअळीचे पैसेच मिळाले नसल्याने नाराजीचा सूर कायम असून शेतकरी याबाबत एकमेकाना विचारताना दिसत आहेत.अजूनही पावसाची आशाया वर्षी पाऊस न झाल्याने मन्याड धरणात पाणीच नसल्यामुळे यंदा उन्हाळी पिके घेताच येणार नसल्याची स्थिती येऊ घातली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या संकटात भर पडली आहे. आता पावसाळा संपल्यात जमा असला तरी नवरात्रोत्सवाच्या काळात त्याची काही अंशी तरी हजेरी लागेला अशी आशा अजूनही असून त्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी का होईना सुटण्यास मदत होईल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यंदा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीरया वर्षी गिरणा व मन्याड परिसरात पाऊसच झाला नसल्याने शेतकºयांची कमाई तर गेलीच पण मन्याड धरणात परिसरातील खेड्यांना यंदा पिण्याच्या पाण्याचे सर्वात मोठे संकट उभे राहणार आहे. त्यातच गुरे ढोरे यांचा देखील चाºयाचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून परिसरातील विहिरींची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. काही विहिरी २ ते ३ तासच चालत असल्याने येणारा उन्हाळा हा फार मोठे संकट उभे करणार असल्याचे संकेत आतापासूनच जाणवू लागले आहे . त्यामुळे शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी