शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
पॅलेस्टिनी समर्थकांसाठी ग्रेटा थनबर्ग रस्त्यावर उतरली अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या; लंडनमध्ये हायव्होल्टेज ड्रामा!
3
Silver Returns: २५ वर्षांत २६ पट; २००० साली चांदीत ₹१०,००० गुंतवले असते तर आज किती मालामाल असता?
4
मूळच्या गुजराती कुटुंबाने खरेदी केली 'पाकिस्तान एअरलाईन्स'; कोण आहेत कराचीतील उद्योगपती आरिफ हबीब?
5
Stock Markets Today: शेअर बाजाराची घसरणीसह सुरुवात; Sensex १०० अंकांनी घसरुन उघडला, Infosys, Wipro टॉप लूझर्स
6
महापालिका निवडणूक: काँग्रेससोबत अकोल्यामध्ये आघाडी करणार का? प्रकाश आंबेडकरांनी मांडली रोखठोक भूमिका
7
कोडीन कफ सिरप तस्करीचा मास्टरमाइंड शुभम जायसवालवर ५० हजारांचं इनाम; आता संपत्तीवर चालणार बुलडोझर!
8
PPF Calculator: दर महिन्याला ₹२,०००, ₹३,००० आणि ₹५,००० गुंतवले तर मॅच्युरिटीवर किती रक्कम मिळेल; पैसेही राहतील सुरक्षित
9
पाहुणी म्हणून आली, लाखोंचे दागिने घेऊन पसार झाली; बंगळुरुमध्ये महिलेला अटक
10
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
11
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
12
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
13
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
14
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
15
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
16
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
17
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
18
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
19
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
20
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
Daily Top 2Weekly Top 5

प्रचंड खर्च करून देखील बळीराजाची झोळी खालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 01:17 IST

आडगाव ता. चाळीसगाव परिसरात यंदा पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामासाठी शेतीत भरपूर पैसा लावून पिकांची लागवड केली, परंतु त्यातून नगण्य उत्पन्न येणार असल्याने बळीराजाची झोळी यंदा खालीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देकमी पावसामुळे आणि ऊसावर आलेल्या रोगामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे मन्याड धरणात पाणीच नसल्यामुळे यंदा उन्हाळी पिके घेताच येणार नसल्याची स्थिती येऊ घातली आहे.

सायगांव, ता. चाळीसगाव : गिरणा परिसरांतील शेतकऱ्यांची परिस्थिती यंदा एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे. खरीप हंगामासाठी शेतीत भरपूर पैसा खर्च करुन देखील हाती पिक येत नसल्याने जिकडे तिकडे नाराजीचाच सूर उमटतांना दिसत आहे.कपाशीची आवक कमी आणि यंदा भाव मात्र जास्तगिरणा परिसरांत शेतकºयांनी यंदा कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती, पण पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने कपाशीचे उत्पन्न जेमतेमच म्हणजे २० टक्क्यापेक्षा कमीच येईल की काय असा प्रश्न सध्या शेतकºयांपुढे आ वासून उभा आहे. त्यातच हंगामाच्या सुरुवातीला कपाशीला सहा हजारापर्यंत सध्या भाव मिळत आहे पुढे हा भाव कमी केला जातो आणि शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसले जातात. त्या वेळेस मिळणाºया भावामुळे कपाशी लागवडीचा खर्च देखील निघत नाही. कपाशीची आवक कमी आणि भाव जास्त अशी स्थिती यंदादेखील निर्माण झाली आहे.सध्या या परिसरात कपाशीची थोडया फार प्रमाणात वेचणीला सुरुवात झाली असून शासनाकडून हमीभाव घोषीत करावा अशी मागणी होत आहे .ऊसावर हुमनीचे आक्रमणयंदा गिरणा परिसरांत उसाची लागवड मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. शेतकºयानी खर्च देखील मोठया प्रमाणात केला होता पण उसावर हुमनी रोगाचे आक्रमण आणि अत्यंत कमी पाऊस त्यामुळे उसाचे पिक देखील येणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने ज्या शेतकºयांच्या ऊसांवर हुमनी रोग आढळून येत आहेत त्या शेताचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तसेच बºयाच शेतकºयांचे कमी पावसामुळे आणि ऊसावर आलेल्या रोगामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.बोंडअळीच्या पैशांची प्रतीक्षाच सायगांव व परिसरांत मागच्या वर्षी पंचनामे झालेल्या बोंडअळीग्रस्त कपाशीचे पैसे गिरणा परिसरातील शेतकºयांच्या खात्यावर पडले पण सायगांव येथील शेतकº्यांना बोंडअळीचे पैसेच मिळाले नसल्याने नाराजीचा सूर कायम असून शेतकरी याबाबत एकमेकाना विचारताना दिसत आहेत.अजूनही पावसाची आशाया वर्षी पाऊस न झाल्याने मन्याड धरणात पाणीच नसल्यामुळे यंदा उन्हाळी पिके घेताच येणार नसल्याची स्थिती येऊ घातली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या संकटात भर पडली आहे. आता पावसाळा संपल्यात जमा असला तरी नवरात्रोत्सवाच्या काळात त्याची काही अंशी तरी हजेरी लागेला अशी आशा अजूनही असून त्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी का होईना सुटण्यास मदत होईल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यंदा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीरया वर्षी गिरणा व मन्याड परिसरात पाऊसच झाला नसल्याने शेतकºयांची कमाई तर गेलीच पण मन्याड धरणात परिसरातील खेड्यांना यंदा पिण्याच्या पाण्याचे सर्वात मोठे संकट उभे राहणार आहे. त्यातच गुरे ढोरे यांचा देखील चाºयाचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून परिसरातील विहिरींची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. काही विहिरी २ ते ३ तासच चालत असल्याने येणारा उन्हाळा हा फार मोठे संकट उभे करणार असल्याचे संकेत आतापासूनच जाणवू लागले आहे . त्यामुळे शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी