शहरं
Join us  
Trending Stories
1
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
2
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव
3
लिस्टिगपूर्वी लेन्सकार्टचा GMP तोडावर आपटला; १०८ रुपयांवरुन आला १० वर, IPO चे 'बुरे दिन' येणार?
4
नवरदेवाने फोटोग्राफरला मारली कानाखाली; नवरीचा लग्नास नकार, २ वर्षांच्या लव्हस्टोरीचा शेवट
5
धक्कादायक! "तो जवळ यायचा अन्...." बांगलादेश महिला क्रिकेटरचा निवडकर्त्यावर लैंगिक शोषणाचा गंभीर आरोप
6
Manoj Jarange Patil: हत्येच्या कटावरुन मनोज जरांगेंचा थेट धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप, '२.५ कोटींची डील आणि...'
7
रिलायन्स पॉवरला मोठा झटका! बनावट बँक गॅरंटी प्रकरणी ED कडून तिसरी अटक; माजी CFO चाही समावेश
8
ट्रम्प यांच्या भाषणादरम्यान व्हाईट हाऊसमध्ये खळबळ! फार्मा कंपनीचा अधिकारी बेशुद्ध पडला
9
ऐतिहासिक! १८० च्या स्पीडने धावली वंदे भारत स्लीपर ट्रेन; नवा रेकॉर्ड, ट्रायलचा Video व्हायरल
10
४०० कोटींची जमीन, लाखोंचे फ्लॅट; १९९३ मुंबई बॉम्बस्फोटांचा 'मास्टर माइंड' टायगर मेमनच्या संपत्तीचा लिलाव होणार!
11
कच्च्या तेलाच्या दरात मोठी वाढ होणार! पेट्रोल-डिझेलच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी सरकारचा मास्टरप्लॅन
12
Axar Patel: विराट कोहली, ख्रिस गेलनंतर फक्त अक्षर पटेलच करू शकला 'अशी' कामगिरी!
13
Wife सोबत मिळून Post Office च्या या स्कीममध्ये ₹४ लाख जमा करा, पाहा महिन्याला किती मिळेल व्याज?
14
अजित पवारांचे घुमजाव! काल म्हणाले, "गोष्टी कानावर आल्या होत्या"; आता म्हणतात, "अजिबात कल्पना नाही"
15
‘तू बघत राहा, मी खोलीत गुदमरून मरेन’, पत्नीला  मेसेज पाठवून पतीने दरवाजा केला बंद, त्यानंतर...
16
महामार्गांवरून भटक्या कुत्र्यांना हटवा, त्यांचे लसीकरण आणि नसबंदी करून...; सर्वोच्च न्यायालयाचे तीन आदेश
17
Larissa Nery : "मी राहुल गांधींना ओळखत नाही, भारतात..."; ब्राझिलियन महिलेला वाटली भीती, केला मोठा खुलासा
18
दुकानातून हळूहळू कमी होत होता दारूचा स्टॉक; कपल करत होतं भरलेल्या बाटल्यांची चोरी! कसं पकडलं?
19
२५ लाख ते ६० लाख... गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी 'हा' कालावधी निवडा
20
पहिल्याच दिवशी जमिनीवर आला 'हा' आयपीओ; गुंतवणूकदारांना मोठं नुकसान, GMP नं केला 'विश्वासघात'

प्रचंड खर्च करून देखील बळीराजाची झोळी खालीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2018 01:17 IST

आडगाव ता. चाळीसगाव परिसरात यंदा पावसाने दगा दिल्याने खरीप हंगामासाठी शेतीत भरपूर पैसा लावून पिकांची लागवड केली, परंतु त्यातून नगण्य उत्पन्न येणार असल्याने बळीराजाची झोळी यंदा खालीच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देकमी पावसामुळे आणि ऊसावर आलेल्या रोगामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे मन्याड धरणात पाणीच नसल्यामुळे यंदा उन्हाळी पिके घेताच येणार नसल्याची स्थिती येऊ घातली आहे.

सायगांव, ता. चाळीसगाव : गिरणा परिसरांतील शेतकऱ्यांची परिस्थिती यंदा एक ना धड भाराभर चिंध्या अशी झाली आहे. खरीप हंगामासाठी शेतीत भरपूर पैसा खर्च करुन देखील हाती पिक येत नसल्याने जिकडे तिकडे नाराजीचाच सूर उमटतांना दिसत आहे.कपाशीची आवक कमी आणि यंदा भाव मात्र जास्तगिरणा परिसरांत शेतकºयांनी यंदा कपाशीची लागवड मोठ्या प्रमाणात केली होती, पण पावसाने पाहिजे तशी हजेरी न लावल्याने कपाशीचे उत्पन्न जेमतेमच म्हणजे २० टक्क्यापेक्षा कमीच येईल की काय असा प्रश्न सध्या शेतकºयांपुढे आ वासून उभा आहे. त्यातच हंगामाच्या सुरुवातीला कपाशीला सहा हजारापर्यंत सध्या भाव मिळत आहे पुढे हा भाव कमी केला जातो आणि शेतकºयांच्या तोंडाला पाने पुसले जातात. त्या वेळेस मिळणाºया भावामुळे कपाशी लागवडीचा खर्च देखील निघत नाही. कपाशीची आवक कमी आणि भाव जास्त अशी स्थिती यंदादेखील निर्माण झाली आहे.सध्या या परिसरात कपाशीची थोडया फार प्रमाणात वेचणीला सुरुवात झाली असून शासनाकडून हमीभाव घोषीत करावा अशी मागणी होत आहे .ऊसावर हुमनीचे आक्रमणयंदा गिरणा परिसरांत उसाची लागवड मोठया प्रमाणात करण्यात आली आहे. शेतकºयानी खर्च देखील मोठया प्रमाणात केला होता पण उसावर हुमनी रोगाचे आक्रमण आणि अत्यंत कमी पाऊस त्यामुळे उसाचे पिक देखील येणार की नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. शासनाने ज्या शेतकºयांच्या ऊसांवर हुमनी रोग आढळून येत आहेत त्या शेताचे पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी केली जात आहे. तसेच बºयाच शेतकºयांचे कमी पावसामुळे आणि ऊसावर आलेल्या रोगामुळे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.बोंडअळीच्या पैशांची प्रतीक्षाच सायगांव व परिसरांत मागच्या वर्षी पंचनामे झालेल्या बोंडअळीग्रस्त कपाशीचे पैसे गिरणा परिसरातील शेतकºयांच्या खात्यावर पडले पण सायगांव येथील शेतकº्यांना बोंडअळीचे पैसेच मिळाले नसल्याने नाराजीचा सूर कायम असून शेतकरी याबाबत एकमेकाना विचारताना दिसत आहेत.अजूनही पावसाची आशाया वर्षी पाऊस न झाल्याने मन्याड धरणात पाणीच नसल्यामुळे यंदा उन्हाळी पिके घेताच येणार नसल्याची स्थिती येऊ घातली आहे. त्यामुळे शेतकºयांच्या संकटात भर पडली आहे. आता पावसाळा संपल्यात जमा असला तरी नवरात्रोत्सवाच्या काळात त्याची काही अंशी तरी हजेरी लागेला अशी आशा अजूनही असून त्यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न काही अंशी का होईना सुटण्यास मदत होईल असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.यंदा पिण्याचा पाण्याचा प्रश्न गंभीरया वर्षी गिरणा व मन्याड परिसरात पाऊसच झाला नसल्याने शेतकºयांची कमाई तर गेलीच पण मन्याड धरणात परिसरातील खेड्यांना यंदा पिण्याच्या पाण्याचे सर्वात मोठे संकट उभे राहणार आहे. त्यातच गुरे ढोरे यांचा देखील चाºयाचा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून परिसरातील विहिरींची पातळी मोठ्या प्रमाणावर खालावली आहे. काही विहिरी २ ते ३ तासच चालत असल्याने येणारा उन्हाळा हा फार मोठे संकट उभे करणार असल्याचे संकेत आतापासूनच जाणवू लागले आहे . त्यामुळे शासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी