शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

साध्य, साधन, साधक एकत्र आल्यास अविरत सेवा शक्य - अनिल वळसंगकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2018 13:07 IST

जळगावात राष्ट्रीय जनकल्याण समितीच्यावतीने पाच जणांना सेवा गौरव पुरस्कार

ठळक मुद्देकोणत्यातरी माध्यमातून सेवाकार्य करासेवा गौरव

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि. १४ - सगळे काम एक दिवस, १५ दिवस करणे सोपे आहे मात्र सातत्याने १ हजार दिवस तेच ्रकाम, सेवा करणे अवघड आहे. मात्र सेवालयातून भूक भागवण्याचे काम अविरत सुरू असून या सोबतच तेथे स्वाभिमानही रुजविला जात आहे. साध्य, साधन व साधक एकत्र आल्यास अविरत सेवा शक्य आहे व यातूनच इतरांनाही कार्याची प्रेरणा मिळते, असा विश्वास समुपदेशक तथा योजक संस्थेचे संचालक अनिल वळसंगकर यांनी व्यक्त केला. मात्र दुसरीकडे साधनांच्या अतिरेकामुळे संस्कारांचा प्रश्न निर्माण होत असल्याचेही वास्तव त्यांनी या वेळी मांडले.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे सुरू असलेल्या सेवालयाचा चौथा वर्धापन दिन कांताई सभागृहात साजरा करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, समितीचे जिल्हाध्यक्ष मनीष काबरा उपस्थित होते. जिल्हा कार्यवाहक विनोद कोळी यांनी प्रास्ताविक केले. प्रारंभी चित्रफितीद्वारे सेवालयाच्या कार्याची चित्रफित दाखविण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्याहस्ते भारतमाता पूजन करण्यात आले.कोणत्यातरी माध्यमातून सेवाकार्य करातन, मन आणि धनपूर्वक सेवाकार्य करायला हवे. तिन्ही प्रकारे एकाच वेळेला करणे जरी शक्य होत नसेल तरीदेखील कोणत्यातरी माध्यमातून सेवाकार्याशी जुळावे आणि इतरांना यात जोडावे, असे आवाहनही अनिल वळसंगकर यांनी केले.जिल्हाधिकारी यांनी मनोगतात सांगितले की, सेवा कशी करावी याचे उत्तम उदाहरण हे शेगाव गजानन महाराज देवस्थान आहे. पूर्वीची संस्कृती आणि आताची संस्कृतीमध्ये बदल झालाय. पालकांनी याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आपल्याला वृद्धाश्रम उभारावे लागतात. शिकून शहाणे आपण झालो पण संस्कारांनी शहाणे झालो नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक घरात मोबाइल आहे पण पुस्तक नाही. हे पुस्तक महत्वाचे आहे.सेवा गौरवया कार्यक्रमात सेवाकार्य करणाºयांचा गौरव करण्यात आला. यामध्ये विष्णू बाणाईत, अंजली बाविस्कर, वंदना पवार, धनंजय तिवारी, डॉ. नीलिमा सेठिया यांचा पुषगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. या वेळी वंदना पवार, विष्णू बाणाईत यांनी मनोगत व्यक्त केले.सूत्रसंचालन अपूर्वा वाणी, सुनील याज्ञिक यांनी केले तर नंदू शुक्ल यांनी आभार मानले.

टॅग्स :Jalgaonजळगाव