शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

...तर जिल्ह्यामधील ११७९ गावात सुरू होणार शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:11 IST

= डमी - स्टार - ७५३ लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त असलेली आणि भविष्यातही गाव ...

= डमी - स्टार - ७५३

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त असलेली आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील, अशा गावात पाचवी ते दहावी दरम्यानच्या शाळा सुरू करता येतील का? याचा आढावा घेण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात अशी १ हजार १७९ गावे आहेत, जी गेल्या काही महिन्यांपासून कोरोनामुक्त आहेत तर ७० गावांमध्ये एकही कोरोनाचा रूग्ण आढळून आलेला नाही. परिणामी, अशा गावांमध्ये शाळा सुरू होऊ शकतात.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सलग दुस-या वर्षीही विद्यार्थ्यांना ऑनलाइन पध्दतीने शिक्षण दिले जात आहे. वर्षभरापासून विद्यार्थी हे घरातचं आहेत. दररोज घरात राहून ऑनलाइन शिक्षण पद्धतीला विद्यार्थी कंटाळले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे खेळण्यासह अनेक बाबींवर सुध्दा निर्बंध आलेले आहेत. शाळेत गेल्यावर आपल्या मित्र-मैत्रिणींना भेटता येईल ही ओढ विद्यार्थ्यांना लागून आहे. त्यामुळे यंदा तरी प्रत्यक्ष शाळेला सुरूवात होईल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती, पण कोरोनाच्या दुस-या लाटेमुळे विद्यार्थ्यांच्या या आनंदावर विरजण पडले. आता कोरोनाची दुसरी लाट ओसरली आहे, त्यामुळे राज्यातील कोरोनामुक्त गावांमध्ये दहावी व बारावीचे वर्ग सुरू करण्याबाबतच्या शक्यता तपासण्याच्या सूचना मुख्यमंत्री यांनी दिल्या आहेत. सोबत पाचवी ते दहावीच्या दरम्यानच्या शाळा सुरू करता येतील का? असाही आढावा घेण्याचे सूचित केले आहे.

- जिल्ह्यातील एकूण शाळा - ३३९९

जिल्हा परिषद शाळा - १८२८

अनुदानित शाळा - ९६२

विनाअनुदानित शाळा - १५६

----------

कोणत्या वर्गात किती विद्यार्थी

पाचवी - ७८८२८

सहावी - ७७३११

सातवी - ७७६७७

आठवी - ७६३८५

----------

जिल्ह्यातील एकूण गावे - १४९९

सध्या कोरोनामुक्त असलेली गावे -११७९

-----------

तालुकानिहाय कोरोना मुक्त गावे

अमळनेर -१४२

भडगाव -४६

भुसावळ -५०

बोदवड -२२

चाळीसगाव - ९८

चोपडा - ९२

धरणगाव - ८६

एरंडोल - ४२

जळगाव - ७४

जामनेर - ११९

मुक्ताईनगर - ६१

पाचोरा - ९०

पारोळा -९५

रावेर - १०१

यावल -६१

१४३१ गावांमध्ये आढळले बाधित

जळगाव जिल्ह्यात एकूण १४९९ गावे आहेत. त्यापैकी १४३१ गावांमध्ये आतापर्यंत कोरोना रूग्ण आढळून आलेले आहेत. तर ७० गावांमध्ये एकही बाधित रूग्ण आढळून आलेला नाही. आता ११७९ गावे कोरोनामुक्त झालेली आहेत. अशा गावांमध्ये शाळा सुरू करता येवू शकतात. तसेच शाळा कधी सुरू होईल, याचीही प्रतीक्षा विद्यार्थ्यांना लागून आहे. ऑनलाइन शिक्षणामुळे मुले अभ्यासात मागे राहत असल्याने पालक देखील मुलांना शाळेत पाठविण्यास तयार आहेत.