शहरं
Join us  
Trending Stories
1
गौतम गंभीरने पिचशी छेडछाड थांबवावी अन् मी सांगतोय ते ऐकावं...; सौरव गांगुलीचा थेट सल्ला
2
ओला ईलेक्ट्रीक गटांगळ्या खाऊ लागली? पुण्यातील सर्व्हिस सेंटर तोडले, अख्ख्या मुंबईत तेही ठाण्यात एकच सर्व्हिस सेंटर...
3
Sheikh Hasina Net Worth: शेख हसीना यांच्या नोकराकडेच होते २८४ कोटी; 'मॅडम'कडील प्रॉपर्टीचा आकडा वाचून तर बघा...
4
'या' एका चुकीमुळे लीक होऊ शकते तुमचे व्हॉट्सअ‍ॅपचे प्रायव्हेट चॅट; तुम्हाला माहीत आहे का?
5
'ऑपरेशन सिंदूर' हा फक्त ट्रेलर होता', लष्करप्रमुखांचा पाकिस्तानला उघड इशारा, दिल्ली स्फोटानंतर लष्कर सज्ज
6
मोबाईलवर मिनिटांत तपासा तुमचा NPS बॅलन्स; पाहा NSDL, उमंग ॲप आणि मिस्ड कॉलची सोपी पद्धत
7
फलटणमध्ये महायुतीतच 'खेळ'! शिंदेंच्या शिवसेनेकडून रामराजेंचा मुलगा, भाजपाकडून माजी खासदारांचा भाऊ मैदानात
8
कमाल! नोकरीसोबतच घरची जबाबदारी, ६ वेळा नापास; २ मुलींची आई ४० व्या वर्षी झाली IAS
9
बांगलादेश कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर शेख हसीना यांची पहिली प्रतिक्रिया; काय म्हणाल्या? 
10
Delhi Blast: दिल्लीत स्फोट घडवण्यासाठी किती पैसे दिले गेले होते, डॉ. शाहीनची काय होती भूमिका?
11
बँकिंग शेअर्समध्ये ऐतिहासिक तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये जोरदार वाढ; 'ही' आहेत प्रमुख ४ कारणं
12
किरकोळ गुंतवणूकदारांनी 'या' १० शेअर्समध्ये टाकले ₹१८,००० कोटी! सुजलॉन त्यापैकी एक, आणखी नावं कोणती?
13
DIY Tips: ड्राय क्लीनिंगचा खर्च वाचवा! कपड्यांवरील चिवट डाग काढण्यासाठी 'हा' घरगुती फॉर्म्युला वापरा 
14
"राहुल गांधी पंतप्रधान होवोत अथवा न होवोत, आमचा हेतू...!" बिहार निवडणुकीसंदर्भात बोलताना काय म्हणाले रॉबर्ट वाड्रा? 
15
क्रिप्टो मार्केटमध्ये हाहाकार! बिटकॉइन १५ लाख तर इथर १.३५ लाखानं कोसळला; ही आहेत कारणं
16
दिल्लीतील स्फोटात बुटाचा वापर, उमरने TATP स्फोटकांचा केला वापर; NIA च्या तपासात खळबळजनक माहिती
17
MLA Disqualification Case: 'आमदारांचं प्रकरण दोन आठवड्यात निकाली काढा, नाहीतर...'; सर्वोच्च न्यायालय विधानसभा अध्यक्षांवर संतापले
18
Gold & Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल; Gold २ हजारांपेक्षा अधिकनं झालं स्वस्त, Silver मध्ये ६५०० ची घसरण
19
दिल्ली स्फोट तपास: कोडवर्ड, 'वुल्फ आवर' आणि महिला दहशतवाद्यांचे 'ऑरोरा-लूना' पथक!
Daily Top 2Weekly Top 5

...तर अठरा वर्षानंतर जगणेच मुश्कील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:37 IST

कार्यशाळा : डॉ.सुभाष पाळेकरांचा इशारा

जळगाव : रासायनिक शेती व उद्योग क्षेत्र ही दोन प्रमुख कारणे ग्लोबल वॉर्मिंगची आहेत. हवेतील तापमानाचा स्तर वाढताच राहिला तर आगामी अठरा वर्षानंतर माणसाचं जगणं मुश्किल होईल, असा इशारा डॉ़ सुभाष पाळेकर यांनी दिला आहे.‘चला जाऊ परत निसर्गाकडे’ ही एकदिवसीय विषमुक्त अन्न आणि टेरेस गार्डन कार्यशाळा विवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते़अन्नात व पाण्यात कीटकनाशकांचे प्रमाण वाढल्याने मधुमेह, वंध्यत्व हृदयविकार, कर्करोग असे असाध्य आजार वाढले आहेत़ नैसर्गिक अन्नधान्य, भाजीपाला, फळे उपलब्ध होत नाही. त्यासाठी लोकांनी परसबागेत, गच्चीवर नैसर्गिक भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. गच्चीवर कशाप्रकारे वाफे, नर्सरी माती तयार करावी, भाजीपाला लागवड कशी करावी, जीवामृत, घनजीवामृत व नैसर्गिक कीटकनाशके घरी कसे बनवावे याचे प्रशिक्षण डॉ.पाळेकर यांनी दिले. राज्यभरातून ८०० नागरिकानी कार्यशाळेला उपस्थिती दिली. कार्यशाळेसाठी दीपक सोनार, दीपक पाटील, आशिष पाटील, योगेश लाठी, विश्वेश रावेरकर, तनुजा पाटील, रोहिणी जोशी, रामा माळी, अश्विनी सोनार आदीनी परिश्रम घेतले.सेंद्रीय शेती बॉम्बपेक्षा भयानकसेंद्रिय शेती बॉम्बपेक्षा खतरनाक असून त्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन जास्त प्रमाणात होत आहे. हवेचे तापमान आणि उष्णता वाढल्याने खान्देशातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हवा शुद्ध करण्यासाठी जंगल आणि झाडे वाढविण्याची गरज आहे. नैसर्गिक शेती काळाची गरज असल्याचे ते म्हणाले़अब तेरा क्या होगा...वातावरण बदलाची प्रचंड घातक प्रक्रिया वेगाने वाढत आहे़ ग्लोबल वार्मींगमुळे एक दिवस संपूर्ण मुंबई, चेन्नई ही शहरे पाण्याखाली जाणार आहेत. तेव्हा मुंबईतील दोन कोटी जनता जळगावात येईल, तेव्हा अब तेरा क्या होगा..़ अशी स्थिती निर्माण होईल, अशा उपहासात्मक भाषेत पाळेकर यांनी वाढत्या प्रदूषणाचे गांभिर्य पटवून दिले़

टॅग्स :Jalgaonजळगाव