शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

...तर अठरा वर्षानंतर जगणेच मुश्कील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:37 IST

कार्यशाळा : डॉ.सुभाष पाळेकरांचा इशारा

जळगाव : रासायनिक शेती व उद्योग क्षेत्र ही दोन प्रमुख कारणे ग्लोबल वॉर्मिंगची आहेत. हवेतील तापमानाचा स्तर वाढताच राहिला तर आगामी अठरा वर्षानंतर माणसाचं जगणं मुश्किल होईल, असा इशारा डॉ़ सुभाष पाळेकर यांनी दिला आहे.‘चला जाऊ परत निसर्गाकडे’ ही एकदिवसीय विषमुक्त अन्न आणि टेरेस गार्डन कार्यशाळा विवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते़अन्नात व पाण्यात कीटकनाशकांचे प्रमाण वाढल्याने मधुमेह, वंध्यत्व हृदयविकार, कर्करोग असे असाध्य आजार वाढले आहेत़ नैसर्गिक अन्नधान्य, भाजीपाला, फळे उपलब्ध होत नाही. त्यासाठी लोकांनी परसबागेत, गच्चीवर नैसर्गिक भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. गच्चीवर कशाप्रकारे वाफे, नर्सरी माती तयार करावी, भाजीपाला लागवड कशी करावी, जीवामृत, घनजीवामृत व नैसर्गिक कीटकनाशके घरी कसे बनवावे याचे प्रशिक्षण डॉ.पाळेकर यांनी दिले. राज्यभरातून ८०० नागरिकानी कार्यशाळेला उपस्थिती दिली. कार्यशाळेसाठी दीपक सोनार, दीपक पाटील, आशिष पाटील, योगेश लाठी, विश्वेश रावेरकर, तनुजा पाटील, रोहिणी जोशी, रामा माळी, अश्विनी सोनार आदीनी परिश्रम घेतले.सेंद्रीय शेती बॉम्बपेक्षा भयानकसेंद्रिय शेती बॉम्बपेक्षा खतरनाक असून त्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन जास्त प्रमाणात होत आहे. हवेचे तापमान आणि उष्णता वाढल्याने खान्देशातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हवा शुद्ध करण्यासाठी जंगल आणि झाडे वाढविण्याची गरज आहे. नैसर्गिक शेती काळाची गरज असल्याचे ते म्हणाले़अब तेरा क्या होगा...वातावरण बदलाची प्रचंड घातक प्रक्रिया वेगाने वाढत आहे़ ग्लोबल वार्मींगमुळे एक दिवस संपूर्ण मुंबई, चेन्नई ही शहरे पाण्याखाली जाणार आहेत. तेव्हा मुंबईतील दोन कोटी जनता जळगावात येईल, तेव्हा अब तेरा क्या होगा..़ अशी स्थिती निर्माण होईल, अशा उपहासात्मक भाषेत पाळेकर यांनी वाढत्या प्रदूषणाचे गांभिर्य पटवून दिले़

टॅग्स :Jalgaonजळगाव