शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
2
ठाकरे गटाला धक्का देण्यासाठी एकनाथ शिंदेंची खेळी; शिवीगाळ करणाऱ्या दत्ता दळवींचा शिवसेनेत प्रवेश
3
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
4
Stock Market Today: १७८ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकमध्ये जोरदार तेजी, FMGC आपटले
5
नियंत्रण कक्षात आला एक फोन कॉल; अवघ्या १२ मिनिटांत पोलिस पोहचले अन् मिळालं जीवदान
6
टॅरिफवर ट्रम्प यांचा आणखी एक यु-टर्न; आता 'या'वरील आयात शुल्क कमी करण्याची घोषणा
7
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
8
Akshaya Tritiya 2025: सोन्याची किंमत पाहून फुटतोय घाम? 'हा' आहे २४ कॅरेट सोनं स्वस्तात खरेदी करायचा जुगाड
9
भरत जाधवचं 'सही रे सही' नाटक कधी निरोप घेणार? केदार शिंदे म्हणाले, "ज्या दिवशी तो..."
10
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
11
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
12
शाहरुख, सलमान की आमिर- कोणासोबत काम करायला जास्त आवडतं?; परेश रावल म्हणाले...
13
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
14
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
15
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
16
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
17
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
18
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
19
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
20
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या

...तर अठरा वर्षानंतर जगणेच मुश्कील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2019 12:37 IST

कार्यशाळा : डॉ.सुभाष पाळेकरांचा इशारा

जळगाव : रासायनिक शेती व उद्योग क्षेत्र ही दोन प्रमुख कारणे ग्लोबल वॉर्मिंगची आहेत. हवेतील तापमानाचा स्तर वाढताच राहिला तर आगामी अठरा वर्षानंतर माणसाचं जगणं मुश्किल होईल, असा इशारा डॉ़ सुभाष पाळेकर यांनी दिला आहे.‘चला जाऊ परत निसर्गाकडे’ ही एकदिवसीय विषमुक्त अन्न आणि टेरेस गार्डन कार्यशाळा विवारी घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते़अन्नात व पाण्यात कीटकनाशकांचे प्रमाण वाढल्याने मधुमेह, वंध्यत्व हृदयविकार, कर्करोग असे असाध्य आजार वाढले आहेत़ नैसर्गिक अन्नधान्य, भाजीपाला, फळे उपलब्ध होत नाही. त्यासाठी लोकांनी परसबागेत, गच्चीवर नैसर्गिक भाजीपाला व फळांचे उत्पादन घेणे आवश्यक आहे. गच्चीवर कशाप्रकारे वाफे, नर्सरी माती तयार करावी, भाजीपाला लागवड कशी करावी, जीवामृत, घनजीवामृत व नैसर्गिक कीटकनाशके घरी कसे बनवावे याचे प्रशिक्षण डॉ.पाळेकर यांनी दिले. राज्यभरातून ८०० नागरिकानी कार्यशाळेला उपस्थिती दिली. कार्यशाळेसाठी दीपक सोनार, दीपक पाटील, आशिष पाटील, योगेश लाठी, विश्वेश रावेरकर, तनुजा पाटील, रोहिणी जोशी, रामा माळी, अश्विनी सोनार आदीनी परिश्रम घेतले.सेंद्रीय शेती बॉम्बपेक्षा भयानकसेंद्रिय शेती बॉम्बपेक्षा खतरनाक असून त्यामुळे हरितगृह वायूंचे उत्सर्जन जास्त प्रमाणात होत आहे. हवेचे तापमान आणि उष्णता वाढल्याने खान्देशातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. हवा शुद्ध करण्यासाठी जंगल आणि झाडे वाढविण्याची गरज आहे. नैसर्गिक शेती काळाची गरज असल्याचे ते म्हणाले़अब तेरा क्या होगा...वातावरण बदलाची प्रचंड घातक प्रक्रिया वेगाने वाढत आहे़ ग्लोबल वार्मींगमुळे एक दिवस संपूर्ण मुंबई, चेन्नई ही शहरे पाण्याखाली जाणार आहेत. तेव्हा मुंबईतील दोन कोटी जनता जळगावात येईल, तेव्हा अब तेरा क्या होगा..़ अशी स्थिती निर्माण होईल, अशा उपहासात्मक भाषेत पाळेकर यांनी वाढत्या प्रदूषणाचे गांभिर्य पटवून दिले़

टॅग्स :Jalgaonजळगाव