शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

जळगावच्या विद्यापीठाने तक्रार निवारण समितीचे कामकाज थांबवले!

By अमित महाबळ | Updated: October 8, 2023 18:56 IST

कार्यपद्धती ठरल्यावर काम पूर्ववत सुरू होणार

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने गेल्या महिन्यात एक ठराव करून विद्यापीठाच्या तक्रार निवारण समितीचे कामकाज थांबविले आहे. मात्र, न्यायालयीन दर्जा असलेल्या समितीचे कामकाज अशा पद्धतीने थांबविण्याचा अधिकार विद्यापीठाला नाही, असा दावा डॉ. संजय भोकरडोळे यांनी केला आहे.

या संदर्भात डॉ. भोकरडोळे यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे तक्रार करून हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे. समितीचे न्यायालयीन कामकाज असल्याने ते सुरूच ठेवावे आणि याबाबत विद्यापीठाला दिशानिर्देश द्यावेत, अशी विनंतीही त्यांनी केली आहे. विद्यापीठाच्या कायद्यानुसार तक्रार निवारण समितीची स्थापना करण्यात आली असून, तिला न्यायालयीन दर्जा आहे. या समितीचे अध्यक्ष निवृत्त जिल्हा न्यायाधीश आहेत. न्यायालयाचे कामकाज थांबवण्याचा अधिकार कुलगुरू किंवा विद्यापीठाला नाही. विद्यापीठ आणि काही संस्थांच्या स्वार्थासाठी तक्रार निवारण समितीचे कामकाज थांबविण्यात आले आहे. ही अतिशय गंभीर गोष्ट असून, न्याय मिळण्याच्या हक्कापासून तक्रारदारांना दूर ठेवण्याचा प्रयत्न आहे. याप्रकरणी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी डॉ. संजय भोकरडोळे यांनी केली आहे. काम थांबविण्याचा ठराव केव्हा मंजूरतक्रार निवारण समितीचे कामकाज थांबविण्याचा ठराव दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी व्यवस्थापन परिषदेत मंजूर झालेला आहे.

कार्यपद्धती ठरल्यावर काम पूर्ववत सुरू होणारतक्रार निवारण समितीच्या कामकाजाची कार्यपद्धती निश्चित नव्हती. त्यावर आधीपासून काम सुरू होते. येत्या दोन महिन्यात कार्यपद्धती ठरल्यावर समितीचे कामकाज पूर्ववत सुरू होईल, अशी माहिती राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य राजेंद्र नन्नवरे यांनी दिली. 

ठरावावर विद्यापीठाने कार्यवाही केलीव्यवस्थापन समितीने जो ठराव केला आहे, त्यानुसार विद्यापीठ प्रशासनाने कार्यवाही केली आहे, असे विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव