शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
2
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
3
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
4
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
5
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
6
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
7
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
8
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
9
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
10
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
11
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
12
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
13
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
14
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
15
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
16
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
17
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
18
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
19
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
20
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...

विद्यापीठाकडून प्राध्यापकांना वेठीस धरण्याचे काम, प्राध्यापक संघटनेचा आरोप

By अमित महाबळ | Updated: December 4, 2023 20:31 IST

स्पर्धांतील सहभागी विद्यार्थ्यांसाठी नंतर परीक्षा घेतली जाते.

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आविष्कार स्पर्धेसाठी परीक्षांचे फेरनियोजन करताना प्राध्यापकांच्या सुट्ट्यांचा विचार केला नाही, त्यामुळे त्यांच्यावर पुन्हा एकदा अन्याय झाला आहे. इतर स्पर्धांतील सहभागी विद्यार्थ्यांसाठी नंतर परीक्षा घेतली जाते. त्याच धर्तीवर वेळापत्रक का केले नाही, असा मुद्दा एन.मुक्ताच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

विद्यापीठात दि. ११ ते १२ डिसेंबर दरम्यान जळगाव, धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची आविष्कार स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. त्यासाठी परीक्षांचे वेळापत्रक बदलण्यात आले पण नवीन तारखांचे नियोजन करताना पेपर आणि कॅपचे काम प्राध्यापकांच्या सुट्यांमध्ये घेण्यात आले आहे. त्यामुळे प्राध्यापकांना झगडून मिळालेल्या सुट्यांचा काहीच फायदा होणार नसल्याचा दावा एन. मुक्ताचे अध्यक्ष डॉ. नितीन बारी यांनी केला आहे.

आविष्कारामुळे दि. ११ ते १४ डिसेंबर दरम्यानचे पेपर आता दि. १८, १९, २० व २१ डिसेंबर रोजी होणार आहेत. प्राध्यापकांना दि. १७ ते ३१ डिसेंबर दरम्यान हिवाळी सुटी आहे. मात्र, त्या दरम्यान परीक्षांचे नियोजन केले गेल्याने सुटीचे चार दिवस कमी झाले आहेत. परीक्षेनंतर महाविद्यालयांमध्ये कॅपचे (पेपर तपासणी) नियोजन सुट्ट्यांमध्ये केले गेले आहे. विद्यापीठाने प्राध्यापकांच्या सुट्या हिरावून घेतल्या आहेत. आता परीक्षा पुढे ढकलल्या आहेत मात्र, दिवाळीतील सुट्यांसाठी केलेल्या उपोषणावेळी हीच मागणी मान्य झाली नव्हती, असेही डॉ. बारी यांनी सांगितले. 

आविष्कारमध्ये प्रत्येक जिल्ह्यातून निवडक विद्यार्थी सहभागी होतील, त्यासाठी सर्वच विद्यार्थ्यांची परीक्षा पुढे ढकलण्याची गरज नव्हती. क्रीडा व इतर स्पर्धांमधील सहभागी स्पर्धक विद्यार्थ्यांची परीक्षा नंतर घेतली जाते. त्याच धर्तीवर आविष्कार स्पर्धेत सहभागी विद्यार्थ्यांचा विचार का करण्यात आला नाही, असाही प्रश्न डॉ. नितीन बारी यांनी केला आहे.