शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

सटासट सटासट...; घरोघरी ‘ॲलर्जी’ची बाधा! व्हायरल नसल्याने औषधांचा उतारा फिका, डॉक्टरांची माहिती

By अमित महाबळ | Updated: February 26, 2023 17:08 IST

एकामागून एक सटासट-सटासट येणाऱ्या शिंका आणि खोकला यांमुळे जळगावकर बेजार झाले आहेत. यातून भयानक अंगदुखीही होत आहे.

 जळगाव : शहरातील प्रदूषण, धूळ आणि वातावरणातील बदल यांमुळे जळगाव शहरात घरोघरी ‘ॲलर्जी’ची बाधा झाली आहे. एकामागून एक सटासट-सटासट येणाऱ्या शिंका आणि खोकला यांमुळे जळगावकर बेजार झाले आहेत. यातून भयानक अंगदुखीही होत आहे.

गेल्या महिन्यात जळगावमध्ये व्हायरल फिव्हरची मोठी साथ आली होती. सर्दी, खोकला व तापाचे असंख्य रुग्ण दिसून येत होते. त्यानंतर आता ॲलर्जिक सर्दी व खोकला जळगावकरांच्या मागे लागला आहे. दिवसा गरम आणि रात्री थंड वातावरणामुळे नागरिकांच्या रोगप्रतिकार शक्तीवर परिणाम होत आहे. रस्त्यांच्या कामांमुळे जळगाव शहराची हवा प्रदूषित झाली आहे. धुळीचे प्रमाण वाढले आहे. व्हायरल असल्यास सर्दी व खोकल्याच्या सोबत ताप देखील असतो पण ॲलर्जी असल्यास ताप येत नाहीत. सध्या हेच रुग्ण मोठ्या संख्येने आढळून येत आहेत. दवाखान्याच्या ओपीडीत येणारे १० पैकी आठ रुग्ण हेच आहेत. 

घरात शिरकाव झाला म्हणजे कठीणच घरात एकाला सर्दी व खोकला झाला म्हणजे त्याचा संसर्ग कुटुंबातील इतर सदस्यांना होणार हे नक्की असते. ॲलर्जीचा सर्दी व खोकला किमान आठ ते १० दिवस पाठ सोडत नाही. त्याला नमविण्यात औषधे फिक्की पडत आहेत.    

डॉक्टर म्हणतात...

हिवाळ्यातील थंड वातावरणात शरीरात कफ तयार होतो. हिवाळ्यात तो घट्ट असतो. उन्हाळ्याकडे वाटचाल होताना म्हणजे ऋतु बदलाच्या टप्प्यात रात्री थंड व दिवसा गरम वातावरणामुळे शरीरातील कफ पातळ होऊन सर्दी व खोकला होतो. वसंत ऋतूत वमन करावे, शक्य नसेल तर खूप थंड पाणी, दही व दूधाचे पदार्थ घेऊ नका. रात्री गरम पाणी प्या. घरगुती उपायांमध्ये क‌फ व खोकल्यावर सुंठ, वेखंड, हळद, गूळ व आले या गोष्टींचा वापर करा. उन्हात जाताना काळजी घ्या. एसी व थंड वारा टाळा. जेवताना पाणी प्या, दुपारी झोपू नका. ऋतू बदल होताना प्रतिकार शक्ती वाढविणे आवश्यक असते. त्या दृष्टीने योग्य आहाराचे सेवन, व्यायाम यावर भर द्या. 

- श्रीरंग छापेकर, आयुर्वेदाचार्य

जळगाव शहरात प्रदूषण, रस्त्यांच्या कामामुळे धुळीचे प्रमाण खूप आहे. या धुळीमुळे ॲलर्जिक सर्दीचे रुग्ण अधिक संख्येने आढळून येत आहेत. धुळीचे प्रमाण कमी झाल्यावर सर्दीची रुग्णसंख्या उतरणीला लागलेली दिसेल. ॲलर्जिक व व्हायरलमध्ये फरक आहे. व्हायरलमध्ये सर्दी व खोकला यासोबत ताप देखील असतो मात्र, ॲलर्जिकमध्ये रुग्णाला ताप येत नाही. ॲलर्जिक सर्दी व खोकला ८ ते १० दिवस राहतो. औषधांचा फारसा परिणाम त्याच्यावर होत नाही. घरगुती उपायांमध्ये गरम पाण्यात मीठ टाकून गुळण्या कराव्यात, साधे पाणी गरम करून त्याची वाफ नाकातून घ्यावी. 

- डॉ. अविनाश महाजन, अधिष्ठाता, शासकीय होमिओपॅथी महाविद्यालय व रुग्णालय 

टॅग्स :Jalgaonजळगावdoctorडॉक्टर