शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: हा तर चमत्कारच! भीषण विमान अपघातातून 'तो' एकटाच जिवंत सापडला
2
जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी
3
Ahmedabad Plane Crash: मोठी बातमी! अहमदाबाद विमान अपघातामध्ये २०४ जणांचा मृत्यू, ५० जण जखमी
4
दोन तास मी त्याच विमानात होतो, काहीतरी असमान्य वाटत...; दिल्लीहून अहमदाबादला आलेल्या प्रवाशाचे ट्विट
5
सर्वत्र मृतदेह, ओळख पटवणेही अशक्य; गुजरात सरकारकडून डीएनए सॅम्पल देण्याचं आवाहन
6
एअर इंडियाच्या विमान अपघातातील २५ गंभीर जखमींची यादी आली; विमानाचे प्रवासी की इंटर्न डॉक्टर, रहिवासी...
7
Ahmedabad Plane Crash : पत्नी आणि मुलीला भेटण्यासाठी लंडनला जात होते माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी
8
Ahmedabad Plane Crash: विमानात कोणती सीट सर्वात सुरक्षित? विमानाने प्रवास करण्यापूर्वी या गोष्टी लक्षात ठेवा
9
Air India Plane Crash: ५ महिन्यापूर्वी लग्न, पहिल्यांदाच पतीला भेटायला लंडनला चालली होती पण काळाने घात केला
10
'आम्हाला आत जाऊ द्या', रुग्णालयाबाहेर मृत आणि जखमींच्या नातेवाईकांचा आक्रोश
11
विमानातील कुणीही बचावलं असण्याची शक्यता नाही; सर्वांचा मृत्यू झाल्याची भीती! पोलीस आयुक्त म्हणाले...
12
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
13
Air India Plane Crash: वडिलांचा व्यवसाय सांभाळण्यासाठी केले होते MBA; विमान अपघातात भाऊ-बहिणीचा दुर्दैवी मृत्यू
14
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
15
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
16
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
17
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
18
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
19
Ahmedabad Plane Crash Live Updates: विमान अपघातातील १०० जणांचे मृतदेह मिळाले, २५ जखमींवर उपचार सुरू
20
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले

हरियाणातील मराठेही महाराष्ट्राचेच वंशज; अखिल भारतीय मराठा जागृती मंचचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2022 23:45 IST

हरियाणातील नीरज चोप्रा याने ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं.

- प्रशांत भदाणे

जळगाव- पानिपतच्या युद्धात दोन्ही बाजूकडील सैन्य मारले गेले होते. यात हजारो मराठा सैनिक होते. या युद्धावेळी शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी काही मराठा सैनिक आपल्या कुटुंबाला घेऊन ओळख लपवून जंगलात लपले होते. पुढं त्यांचं रोड मराठा असं नामकरण झालं. हे रोड मराठा दुसरे-तिसरे कुणी नसून महाराष्ट्राचेच वंशज आहेत, असा दावा हरियाणातील अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत-करनाल या संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

शहरातील निंबाजी साळुंखे यांच्या कन्येचा विवाह सोहळ्यात हजेरी लावण्यासाठी हरियाणातील अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत-करनाल या संघटनेचे पदाधिकारी जोगिंदर डुमने, मनीराम चोपडे, भागसिंग बालदे, निवृत्त पोलीस सतबीर खोकरे, हरजित महाले आदी आले आहेत. लोकमतशी संवाद साधताना ते बोलत होते.

पानिपत युद्धाचा असा आहे संबंध-

हरियाणातील नीरज चोप्रा याने ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवलं. त्यानंतर हरियाणातील करनाल पानिपत याचा संबंध थेट महाराष्ट्राशी जोडला जातो. याच अनुषंगाने अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत-करनाल या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी चर्चेला सुरुवात केली. १७ जानेवारी १७६१ साली अफगाणी राजा अहमद शाह अब्दाली व सदाशिवराव भाऊ यांच्यात पानिपत येथे जे युद्ध झाले, त्यात हजारोंच्या संख्येने दोन्ही बाजूकडील सैन्य मारले गेले. यात हजारो मराठा सैन्य होते. यावेळी शत्रू मात करत असताना पाहताच जीव वाचवून काही मराठा सैनिक आपल्या कुटुंबासह जंगलात लपून बसले होते.

या भागात आपली मूळ ओळख लपवून रोड मराठा ही ओळख या कुटुंबीयांनी निर्माण केली. तेव्हापासूनच रोड मराठा असे नामकरण हरियाणातील पानिपतच्या युद्धात मारल्या गेलेल्या मराठ्यांच्या वंशजांना पडले, असे अखिल भारतीय मराठा जागृती मंच पानिपत-करनाल राष्ट्रीय प्रवक्ते जोगिंदर डुमने यांनी सांगितले. आम्ही महाराष्ट्राचेच आहोत, त्यामुळे रोटी-बेटी व्यवहार यासह विवाह समारंभाला आम्ही हजेरी लावत आहोत, असेही जोगिंदर मराठा उर्फ डुमने यांनी सांगितले.

पानिपतच्या लढाईत मराठा हरलेले नाहीत!

पानिपतची लढाई मराठा हरले नव्हते. त्याला काही कारणे होती. त्याचा उहापोह करणे आता उचित होणार नाही. परंतु, पानिपतची लढाई जिंकल्यावर अहमद शाह अब्दाली याने तिथे राज्य न करता तो निघून गेला. याचाच अर्थ अब्दाली याला मराठा सैन्याची गनिमी काव्याने लढाई करण्याची ताकद कळलेली होती. इतिहास चुकीच्या पद्धतीने रचला गेल्याचे डुमने सांगतात. या विषयावर इतिहासाची पाने चाळून सत्य जगासमोर आणण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

हरियाणात ८ लाख मराठा समाजबांधव-

दरम्यान, हरियाणातील पानिपतसह अन्य चार ते पाच जिल्ह्यांमध्ये मराठा समाज असून त्याच्या प्रथा, परंपरा, खानपान अगदी महाराष्ट्रात राहणाऱ्या मराठा समाजाशी सुसंगत आहेत. त्यामुळे आम्ही पानिपत लढाईत धारातीर्थी पडलेल्या मराठा कुटुंबीयांचे वंशज आहोत. सुमारे २६० गावांमध्ये ८ लाख लोकसंख्येने हा मराठा विखुरलेला आहे. मराठा रेजिमेंटमध्ये आमची ३४ मुले कार्यरत आहेत. केंद्र सरकारने २००८ नंतर ही सैन्य भरती बंद केली. त्यामुळे लढवय्या असलेल्या मराठा समाजातील बहुतांशी तरुणांची सैन्यात भरती होण्याची इच्छा असतानाही सरकार त्याची परवानगी देत नाही. सैन्य भरती पुन्हा सुरू करून मराठा समाजाला न्याय द्यावा, अशीही एकमुखी मागणी या सदस्यांनी केली आहे. मराठा समाजातील या लोकांचा तिकडे शेती हाच मूळ व्यवसाय आहे. काही जण लहानसहान व्यावसायिक आहेत. आमची बहुसंख्य मुले नोकरी व्यवसायानिमित्त परदेशात असल्याचं त्यांनी सांगितले.

टॅग्स :marathaमराठाHaryanaहरयाणा