शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

चर्चाच जोरदार, झाकली मूठ गुपिताची; मुख्यमंत्र्यांचा मंगळवारी ‘हवाई’ दौरा!

By अमित महाबळ | Updated: September 11, 2023 15:09 IST

आंदोलनाच्या भीतीमुळे रस्त्याने प्रवास टाळला जात असल्याचे म्हटले जात आहे, तर पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा केला आहे.

जळगाव : राज्यात मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा पेटले असून, मंगळवारी (दि. १२) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जळगाव जिल्ह्यात येत आहेत. संभाव्य दौऱ्यानुसार, ते विमानाने जळगावला येतील आणि येथून हेलिकॉप्टरने पाचोऱ्याकडे रवाना होतील. त्यांनी ३० किमी अंतरासाठी हवाई मार्ग निवडला आहे. त्याची जनतेत चर्चा सुरू झाली आहे. आंदोलनाच्या भीतीमुळे रस्त्याने प्रवास टाळला जात असल्याचे म्हटले जात आहे, तर पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांनी या चर्चेत तथ्य नसल्याचा दावा केला आहे.

‘शासन आपल्या दारी’ या तालुकास्तरीय कार्यक्रमासाठी मुख्यमंत्र्यांचा संभाव्य दौरा प्रशासानाला प्राप्त झाला आहे. त्यानुसार ते जळगावला विमानाने येणार असून, विमानतळावरूनच हेलिकॉप्टरने पाचोऱ्याला रवाना होणार आहेत. त्यांना रस्त्याने जाण्याचा पर्याय उपलब्ध होता. मात्र, त्याचा विचार करण्यात आलेला नाही. अशात मराठा आंदोलन पुन्हा एकदा पेटले असून, त्याचा संदर्भ मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यातील नियोजनाशी जोडला जात आहे.

उगाच रिस्क नको म्हणून?कोणतीही रिस्क नको म्हणून म्हणून विमानतळावरूनच ते थेट पाचोऱ्यातील जातील. रस्त्याने गेले असते, तर त्यांना अर्धा तास लागला असता, पण संपूर्ण मार्गावर बंदोबस्त ठेवण्याची, कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सतर्क राहण्याचे मोठे काम पोलिसांना लागले असते. हवाई मार्ग म्हटला म्हणजे हा ताण हलका होणार आहे, अशी चर्चा सुरू झाली आहे.

असा आहे मार्गमात्र, पाचोऱ्याचे शिंदे गटाचे आमदार व मुख्यमंत्र्यांचे विश्वासू किशोर पाटील यांनी या दौऱ्यात जळगाव ते पाचोरा हा रस्तामार्ग टाळण्यामागील चर्चा फेटाळून लावली आहे. सकाळी ११ वाजता मुख्यमंत्री विमानाने जळगावला येतील. तेथून ते हेलिकॉप्टरने नांद्रा-पाचोरा रस्त्यावरील हडसन या ठिकाणी उतरतील. वाहनाने पाचोऱ्यात आल्यावर त्यांच्या उपस्थितीत दुपारी १२:३० वाजता कार्यक्रम सुरू होईल. दोन वाजेपूर्वी हा कार्यक्रम संपेल, असे आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

- मुख्यमंत्री ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमानंतर आमदार किशोर पाटील यांच्याकडे नवीन फॅक्टरीचे उद्घाटन व जेवण आहे. ते झाल्यावर मुख्यमंत्री हेलिकॉप्टरनेच पुढील प्रवासासाठी जळगावला रवाना होणार आहेत.

मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आमदार म्हणतात...मुख्यमंत्र्यांना जळगावहून हेलिकॉप्टरने यायला १० ते १५ मिनिटे लागतील. यामुळे वाहतुकीचा प्रश्न उद्भवणार नाही. निवेदन देण्यास व भेटण्यास इच्छुक नसतील. रस्त्याने आले असते तर अर्धा तास लागला असता. वेळ वाचावा म्हणून ते हेलिकॉप्टरने येत आहेत. मराठा समाजाला न्याय देण्याची सरकारची भूमिका आहे, असेही आमदार किशोर पाटील यांनी सांगितले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेJalgaonजळगावPoliticsराजकारण