शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

कंटाळलेल्या मक्तेदाराने जळगावात हायवेच खोदला...!

By अमित महाबळ | Updated: October 5, 2023 19:38 IST

नाल्यातील पाण्याने गडबड केली...?

जळगाव: शासकीय मुलींचे आयटीआय ते जिल्हा उद्योग केंद्र यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, ते पूर्ण होण्यास आणखी १० दिवस लागणार आहेत. या भागात नाल्याचे पाझरणारे पाणी आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे भराव खचत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण काही का असेना मात्र, नवीन रस्ता झाल्यानंतर एक वर्षाच्या आतच मक्तेदाराला दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

महापालिका हद्दीत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शासकीय मुलींचे आयटीआय ते जिल्हा उद्योग केंद्र या भागातील महामार्गाचा भराव मोठ्या प्रमाणात खचत असल्याचे लक्षात आले होते. त्याची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आली; पण फायदा झाला नाही. दुरुस्ती केल्यावर पुढच्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा खड्डा तयार झालेला असायचा. दरवेळी वेगळा भाग खचलेला असायचा. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पिंप्राळ्यातील दौऱ्यावेळी याच ठिकाणच्या खड्ड्यात एका मालवाहू वाहनाचे मागील चाक निखळले होते. त्यानंतर राजकीय पक्षांनी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.

एक्सकेवेटर, डम्पर आणले

मक्तेदाराने दि. एक ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे; पण यावेळी होणारे काम हे वेगळे आहे. आतापर्यंत पॅचवर्क केले जात होते, आता थेट महामार्ग खोदण्यात येत आहे. पुढील दीड दिवसात खोदाईचे काम संपलेले असेल. यादरम्यान २०० मीटर बाय ८ मीटर भागात ५ फूट खोलीपर्यंत डांबरीकरण, खडी, मुरूम व मातीचा संपूर्ण भराव काढण्यात येत आहे. त्यासाठी एक्सकेवेटर, डम्पर व इतर मशिनरी लावण्यात आली आहे.

आताचे काम असे होणार...

आधीचा सर्व भराव खोदून काढल्यावर रोलरने सपाटीकरण केले जाणार आहे. त्यावर मुरुमाचे ३, जाड खडी व बारीक खडीचा प्रत्येकी १, डांबर व खडीमिश्रित १ थर आणि सर्वांत शेवटी बारीक खडीचा १ थर दिला जाणार आहे. हे काम दि. १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी अंदाजित ४० लाख रुपये खर्च आहे, अशी माहिती साइट इंजिनिअर विशाल यादव यांनी दिली.

नाल्यातील पाण्याने गडबड केली...?

मुलींचे आयटीआयसमोर भराव खोदण्याचे काम सुरू असताना साडेतीन फुटांवर काही ठिकाणी ओल्या मातीचा थर लागला आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या नाल्यातील पाणी पाझरत इथपर्यंत येत असावे. महामार्गाखालून पाण्याचा प्रवाह आणि वरून अवजड वाहनांची वाहतूक यामुळे भराव खचत असल्याचा अंदाज आहे.

वाहतूक कोंडी, प्रचंड धूळ

महामार्गाच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून, प्रचंड धूळही उडत आहे. जळगावकरांना आणखी दहा दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव