शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

कंटाळलेल्या मक्तेदाराने जळगावात हायवेच खोदला...!

By अमित महाबळ | Updated: October 5, 2023 19:38 IST

नाल्यातील पाण्याने गडबड केली...?

जळगाव: शासकीय मुलींचे आयटीआय ते जिल्हा उद्योग केंद्र यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, ते पूर्ण होण्यास आणखी १० दिवस लागणार आहेत. या भागात नाल्याचे पाझरणारे पाणी आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे भराव खचत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण काही का असेना मात्र, नवीन रस्ता झाल्यानंतर एक वर्षाच्या आतच मक्तेदाराला दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

महापालिका हद्दीत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शासकीय मुलींचे आयटीआय ते जिल्हा उद्योग केंद्र या भागातील महामार्गाचा भराव मोठ्या प्रमाणात खचत असल्याचे लक्षात आले होते. त्याची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आली; पण फायदा झाला नाही. दुरुस्ती केल्यावर पुढच्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा खड्डा तयार झालेला असायचा. दरवेळी वेगळा भाग खचलेला असायचा. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पिंप्राळ्यातील दौऱ्यावेळी याच ठिकाणच्या खड्ड्यात एका मालवाहू वाहनाचे मागील चाक निखळले होते. त्यानंतर राजकीय पक्षांनी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.

एक्सकेवेटर, डम्पर आणले

मक्तेदाराने दि. एक ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे; पण यावेळी होणारे काम हे वेगळे आहे. आतापर्यंत पॅचवर्क केले जात होते, आता थेट महामार्ग खोदण्यात येत आहे. पुढील दीड दिवसात खोदाईचे काम संपलेले असेल. यादरम्यान २०० मीटर बाय ८ मीटर भागात ५ फूट खोलीपर्यंत डांबरीकरण, खडी, मुरूम व मातीचा संपूर्ण भराव काढण्यात येत आहे. त्यासाठी एक्सकेवेटर, डम्पर व इतर मशिनरी लावण्यात आली आहे.

आताचे काम असे होणार...

आधीचा सर्व भराव खोदून काढल्यावर रोलरने सपाटीकरण केले जाणार आहे. त्यावर मुरुमाचे ३, जाड खडी व बारीक खडीचा प्रत्येकी १, डांबर व खडीमिश्रित १ थर आणि सर्वांत शेवटी बारीक खडीचा १ थर दिला जाणार आहे. हे काम दि. १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी अंदाजित ४० लाख रुपये खर्च आहे, अशी माहिती साइट इंजिनिअर विशाल यादव यांनी दिली.

नाल्यातील पाण्याने गडबड केली...?

मुलींचे आयटीआयसमोर भराव खोदण्याचे काम सुरू असताना साडेतीन फुटांवर काही ठिकाणी ओल्या मातीचा थर लागला आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या नाल्यातील पाणी पाझरत इथपर्यंत येत असावे. महामार्गाखालून पाण्याचा प्रवाह आणि वरून अवजड वाहनांची वाहतूक यामुळे भराव खचत असल्याचा अंदाज आहे.

वाहतूक कोंडी, प्रचंड धूळ

महामार्गाच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून, प्रचंड धूळही उडत आहे. जळगावकरांना आणखी दहा दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव