शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

कंटाळलेल्या मक्तेदाराने जळगावात हायवेच खोदला...!

By अमित महाबळ | Updated: October 5, 2023 19:38 IST

नाल्यातील पाण्याने गडबड केली...?

जळगाव: शासकीय मुलींचे आयटीआय ते जिल्हा उद्योग केंद्र यादरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून, ते पूर्ण होण्यास आणखी १० दिवस लागणार आहेत. या भागात नाल्याचे पाझरणारे पाणी आणि अवजड वाहनांची वाहतूक यामुळे भराव खचत असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. कारण काही का असेना मात्र, नवीन रस्ता झाल्यानंतर एक वर्षाच्या आतच मक्तेदाराला दुरुस्तीसाठी मोठा खर्च करावा लागत आहे.

महापालिका हद्दीत राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण आणि डांबरीकरण करण्यात आले आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून शासकीय मुलींचे आयटीआय ते जिल्हा उद्योग केंद्र या भागातील महामार्गाचा भराव मोठ्या प्रमाणात खचत असल्याचे लक्षात आले होते. त्याची वेळोवेळी दुरुस्ती करण्यात आली; पण फायदा झाला नाही. दुरुस्ती केल्यावर पुढच्या दोन ते तीन दिवसांत पुन्हा खड्डा तयार झालेला असायचा. दरवेळी वेगळा भाग खचलेला असायचा. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पिंप्राळ्यातील दौऱ्यावेळी याच ठिकाणच्या खड्ड्यात एका मालवाहू वाहनाचे मागील चाक निखळले होते. त्यानंतर राजकीय पक्षांनी महामार्गाच्या दुरुस्तीसाठी आंदोलनाचा इशारा दिला होता.

एक्सकेवेटर, डम्पर आणले

मक्तेदाराने दि. एक ऑक्टोबरपासून पुन्हा एकदा दुरुस्तीच्या कामाला सुरुवात केली आहे; पण यावेळी होणारे काम हे वेगळे आहे. आतापर्यंत पॅचवर्क केले जात होते, आता थेट महामार्ग खोदण्यात येत आहे. पुढील दीड दिवसात खोदाईचे काम संपलेले असेल. यादरम्यान २०० मीटर बाय ८ मीटर भागात ५ फूट खोलीपर्यंत डांबरीकरण, खडी, मुरूम व मातीचा संपूर्ण भराव काढण्यात येत आहे. त्यासाठी एक्सकेवेटर, डम्पर व इतर मशिनरी लावण्यात आली आहे.

आताचे काम असे होणार...

आधीचा सर्व भराव खोदून काढल्यावर रोलरने सपाटीकरण केले जाणार आहे. त्यावर मुरुमाचे ३, जाड खडी व बारीक खडीचा प्रत्येकी १, डांबर व खडीमिश्रित १ थर आणि सर्वांत शेवटी बारीक खडीचा १ थर दिला जाणार आहे. हे काम दि. १५ ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करायचे आहे. त्यासाठी अंदाजित ४० लाख रुपये खर्च आहे, अशी माहिती साइट इंजिनिअर विशाल यादव यांनी दिली.

नाल्यातील पाण्याने गडबड केली...?

मुलींचे आयटीआयसमोर भराव खोदण्याचे काम सुरू असताना साडेतीन फुटांवर काही ठिकाणी ओल्या मातीचा थर लागला आहे. शासकीय तंत्रनिकेतनच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या नाल्यातील पाणी पाझरत इथपर्यंत येत असावे. महामार्गाखालून पाण्याचा प्रवाह आणि वरून अवजड वाहनांची वाहतूक यामुळे भराव खचत असल्याचा अंदाज आहे.

वाहतूक कोंडी, प्रचंड धूळ

महामार्गाच्या कामामुळे वाहतूक कोंडी होत असून, प्रचंड धूळही उडत आहे. जळगावकरांना आणखी दहा दिवस हा त्रास सहन करावा लागणार आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव