शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
4
BCCI च्या मुंबईतील कार्यालयात चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या मालालवर मारला डल्ला
5
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
6
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
7
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
8
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
9
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
10
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
11
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
12
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
13
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
14
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
15
गर्लफ्रेंडने ठेवला विश्वास, प्रोत्साहन दिल्याने 'तो' झाला मोठा अधिकारी, कोचिंगशिवाय पास केली JPSC
16
ब्रेक पॅडलखाली अडकली पाण्याची बाटली, भरधाव कार ट्रॉलीमध्ये घुसून दोन व्यावसायिकांचा मृत्यू
17
UPI पेमेंटमध्ये पिनची कटकट संपणार? आता चेहरा दाखवा किंवा बोट लावा, पेमेंट होईल झटक्यात!
18
समसप्तक नवमपंचम गजलक्ष्मी राजयोग: ९ राशींना शुभ वरदान काळ, हाती पैसा राहील; अपार लाभच लाभ!
19
'तुम्ही पाकिस्तानसोबत बोलता का...', अखिलेश यादवांनी टोमणा मारताच शहांनी दिले जोरदार प्रत्युत्तर
20
Video: गाढवाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू

साकेगाव हाणामारीप्रकरणी गावात शांततेची दिली ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना १३ रोजी रात्री झाली, यात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भुसावळ : तालुक्यातील साकेगाव येथे किरकोळ कारणावरून दोन गटात हाणामारीची घटना १३ रोजी रात्री झाली, यात दोन्ही गटातील पाच जण जखमी झाले आहे. या पार्श्‍वभूमीवर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दोन्ही गटातील प्रतिष्ठित नागरिकांची बैठक १५ रोजी बोलावली होती. या दोन्ही गटाकडून गावात शांततेची ग्वाही देण्यात आली.

साकेगावात तब्बल ३३ जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने राहतात, मात्र एखादी दुर्दैवी घटना घडल्यास गावात तणाव निर्माण होतो. क्षणिक संतापाच्या भरात भविष्याचे नुकसान होऊन जाते हे जर घटनेच्या वेळीच लक्षात ठेवले तर असा प्रसंग कधीच उद्भवणार नाही. जे लोक हाणामाऱ्यांसाठी इतरांना प्रवृत्त करतात, पण ते कधीच कृतीमध्ये सामील होत नाही, लांबूनच भांडणांचा आनंद घेत असतात अशांच्या नादी लागू नका. अप्रिय घटनेनंतर कोर्टकचेऱ्या, पोलीस ठाण्याच्या चकरा याशिवाय दवाखान्यात लागणारा खर्च, मानसिक तणाव तसेच समाजात बदनामी होते याचे सर्वांनी भान ठेवावे. एखादेवेळेस वादाचा विषय निघाला तर तो सामोपचाराने मिटवून घ्यावा, असे शांतता कमिटीच्या बैठकीत तालुका पोलीस ठाणे ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी दोन्ही गटातील प्रतिष्ठित नागरिकांना उद्देशून सांगितले.

सोशल मीडियावर अफवा पसरवू नका, पोलिसांची राहणार करडी नजर

अनेक भांडण-तंटे गैरसमज हे सोशल मीडियाद्वारे पसरत असतात. कोणीही चुकीची माहिती सोशल मीडियावर टाकू नका, चुकीचे व्हिडिओ व्हायरल करू नका. आपल्या एका चुकीमुळे गावात वाद निर्माण होऊ शकतो. यामुळे सोशल मीडियाचा वापर चांगल्या कार्यासाठी करा. एखाद्याने वाद वाढविण्याच्या इराद्याने काही पोस्ट टाकली तर त्याची गय केली जाणार नाही, अशी तंबीही या वेळी कुंभार यांनी दिली.

याप्रसंगी जि.प. सदस्य रवींद्र पाटील, प्रभारी सरपंच आनंद ठाकरे, याशिवाय ग्रामपंचायत सदस्य, दोन्ही समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या बैठकीस उपस्थित होते.