शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: रशियाच्या समुद्राखाली शक्तीशाली भूकंप! कुरील आयलंडवर त्सुनामी; अमेरिका, जपान, न्यूझीलंडसह जगाला धोका
2
मुख्यमंत्री अतिशय उद्विग्न, मंत्र्यांना सज्जड दम; बेशिस्त खपवून घेणार नाही, २० मिनिटे खडेबोल
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारताने लवकर व्यापार करार करावा, अन्यथा २५% टॅरिफ लादू! डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा धमकी
5
लाडकी बहीण योजनेत पुरुष कसे काय घुसले?: मुख्यमंत्री, ‘लोकमत’च्या वृत्ताचे मंत्रिमंडळ बैठकीत पडसाद
6
एकही चूक न करायच्या अटीवर कोकाटेंना अभय, मंत्रिपद टेम्पररी, दर १५ दिवसांनी आढावा: अजित पवार
7
‘ऑपरेशन सिंदूर’ थांबवा, असे जगातील कोणत्याही नेत्याने सांगितले नाही: पंतप्रधान नरेंद्र मोदी
8
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका टप्प्याटप्प्याने घेणार; आधी जिल्हा परिषद, नंतर मनपा होणार
9
ठाकरे बंधुंना सलामी दिली, प्रो-गोविंदा स्पर्धेतून बाहेर; जय जवान पथक व्यवस्थापकांचा आरोप
10
गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याविरूद्ध अनिल परबांनी दिले पुरावे; CM फडणवीसांकडे सादर
11
आजी-माजी खासदार आमने-सामने; विचारेंना मानसोपचार तज्ज्ञांची गरज; तर म्हस्के ‘वाचाळ रत्न’!
12
गणेशोत्सवासाठी ST सज्ज; ५,२०० जादा बस उपलब्ध करून देण्याचे नियोजन सुरू, मुंबईतून ६०० बस
13
उंचीच्या सक्तीमुळे उडणार मंडळांची धांदल; दोन विसर्जनस्थळे गाठण्यासाठी कसरत
14
वसई-विरार पालिकेचे माजी आयुक्त ईडीच्या कचाट्यात; सोमवारी निरोपाचा सत्कार, मंगळवारी धाड
15
लोकलमध्ये बसल्यावर मिळते तिकीट; UTSचा गैरवापर, QR कोड सुविधा बंद करण्यासाठी रेल्वेला पत्र
16
AI, कॉम्प्युटर इंजिनीअरिंगच्या साडेचार हजार जागा वाढल्या; प्रवेशासाठी १ लाख ७६ हजार जागा
17
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
18
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
19
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
20
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी

कापूस उत्पादक अडकला फरडच्या मोहात

By ram.jadhav | Updated: January 15, 2018 00:35 IST

दरवाढीने अपेक्षा वाढल्या : कृषी विभागाच्या आदेशाला शेतकºयांचा हरताळ

ठळक मुद्देवाढत्या भावाची लागली आसशासनाच्या मदतीपेक्षा स्वत:च्याच शेतात काहीतरी मिळण्याची अपेक्षापुढील वर्षी फरदड घेण्याचा हाच निर्णय शेतकºयांसाठी त्रासदायक ठरणार आहे

राम जाधवआॅनलाईन लोकमत दि़ १५, जळगाव : यावर्षी अपुºया पावसातही कसाबसा कापसाचा हंगाम आला; मात्र गुलाबी बोंडअळीने कैºया पोखरल्याने कापसाचे उत्पादन घटले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आता कापसाच्या दरात तेजी येत असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी फरदडच्या उत्पनांच्या मोहात अडकला आहे. त्यामुळे शेतात उभे असलेले कपाशीचे पीक कृषी विभागाकडून उपटण्याचे आदेश येऊनही शेतकºयांना उपटण्याची इच्छा होत नसल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस वाढणाºया कापसाच्या दराने शेतकºयांना अशा नुकसानीच्या व दुष्काळी परिस्थिती असलेल्या वर्षात उभे पीक काढण्याचेही धाडस होत नाहीये. म्हणूनच खालावणाºया आर्थिक परिस्थितीत आता फरदड घेण्याचा निर्धार जिल्ह्यातील बहुतेक शेतकºयांनी केल्याचे दिसत आहे.बोंडअळीचे संकट वाढणारशेतकºयांचा हा निर्णय त्यांनाच पुढील वर्षासाठी घातक ठरणार आहे. फरदड घेतल्यामुळे गुलाबी बोंडअळीला जास्त काळ जीवन जगता येणार आहे. त्यामुळे या अळीचे जीवनचक्र पूर्ण होऊन पुढील हंगामात मोठ्या प्रमाणावर या अळीचा प्रादुर्भाव वाढून गुलाबी बोंडअळीचे संकट वाढणार आहे. म्हणूनच कृषी विभागाकडून कपाशीचे पीक लवकरात लवकर नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र शेतकºयांनी ते जुमानले नाहीत.शेतकºयांकडे पैसाच नाहीवर्षभरापासून मिळणारी कर्जमाफी अजूनही मिळत नाही. काहींना तोकडी रक्कम मिळाली तर अनेकजण अजूनही यादीच्याच प्रतीक्षेत आहेत. त्यातही मिळालेला पैसा विकास सोसायट्या १४ टक्के व्याजदराने जिल्हा बँकेच्या मदतीने लाटण्याच्या कामाला लागलेल्या आहेत़ त्रस्त झालेल्या शेतकºयांकडे आता पर्याय उरलेला नाही, म्हणून जे मिळतील ते आपले असे म्हणून शेतकरी फरदडीच्या कापसाची प्रतीक्षा करीत आहे; मात्र फरदडीच्या या कपाशीचीही सर्व बोंडे अळीग्रस्त झालेली आहेत. यापासून अनेक शेतकरी अद्यापही अनभिज्ञच आहेत. याच अळ्या पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर त्रास देणार आहेत़४गेल्या महिन्यात राज्याच्या कृषी आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत शेतकºयांना कपाशीचे पीक उपटण्यासाठी आदेश देण्याचे ठरले होते. त्यानुसार राज्यभर कृषी अधिकाºयांनी शेतकºयांना कपाशी उपटण्याचे सांगितले.४त्यानुसार काही शेतकºयांनी कपाशी उपटलीसुद्धा, मात्र त्यातही ज्याच्याकडे काही रब्बी पिके घेण्यासाठी पाण्याची सोय होती, अशाच शेतकºयांनी तत्काळ कपाशीचे पीक काढून गहू, हरभरा, मका, दादर किंवा इतर काही भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड केली. ज्यांच्याकडे फारशी पाण्याची व्यवस्था नाही, अशा शेतकºयांनी कपाशीची फरदड घेण्याचे ठरवले आहे.शेतकºयांनी फरदडचा कापूस घेण्याच्या नांदात ना पडता लवकरात-लवकर कपाशीवर ग्रामोझोम या औषधाची फवारणी करून मिळेल तो कापूस वेचून घ्यावा. जास्त कालावधीच्या कपाशीच्या वाणाची लागवड करू नये. डिसेंबर महिनाअखेर पर्यंत कपाशीचे पीक संपवावे. शेतात अळीग्रस्त बोंडे ठेवू नये, अशी बोंडे व कपाशी जाळून नष्ट करावी.- बी. डी. जडे, वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ, जळगाव.भाव वाढले आहेत; मात्र यावर्षी मिळणाºया काही हजारोंच्या उत्पन्नासाठी शेतकºयांनी पुढील वर्षीचे लाखोंचे उत्पन्न बुडवू नये. पुढील हंगामात जर कपाशीचे उत्पादन घ्यायचे असेल तर आhttp://www.lokmat.com/akola/bt-cotton-pink-bollworm-attack-cotton-crop/ताच शेतकºयांनी कपाशीचे पीक नष्ट करावे.- अनिल भोकरे कृषी उपसंचालक, जळगाव.या हंगामात कापसाचे उत्पादन घटले, जो आला त्याला ही सुरुवातीला दर मिळाला नाही. त्यामुळे आतातरी जगण्यासाठी काहीतरी दोन पैसे मिळतील, अशी अपेक्षा असल्याने फरदड घेत आहे़सुधाकर पाटील, शेतकरी वाकोद, ता. जामनेर.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcottonकापूस