शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
3
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
4
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
5
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
6
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
7
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
8
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'
9
अंबानींना टक्कर देऊ शकतील का मस्क? स्टारलिंकच्या इंटरनेटच्या किंमतीवरूनच येईल अंदाज
10
जळगाव जिल्ह्यात वादळी पावसाने केळी बागांना तडाखा; मोठे वृक्ष उन्मळून पडले, रस्ता रात्री ९ पासून बंद
11
प्राजक्ताच्या 'मदनमंजिरी'वर युरोपीयन्सचा डान्स, लावणीवर महिलांसह पुरुषांनीही धरला ठेका, अभिनेत्री म्हणाली...
12
भारतासोबत अतिशय घाणेरडा खेळ...! आसिम मुनीरच्या प्रेमात पडली अमेरिका, हे काय बोलले टॉप लष्करी कमांडर...?
13
३००० रुपयांवरील UPI पेमेंट वर शुल्क लागणार का, सरकारनं काय म्हटलं? जाणून घ्या डिटेल्स
14
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी : पंढरीच्या वाटेत दर पाच किलोमीटरवर आपला दवाखाना, दहा खाटांचे आयसीयू
15
मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!
16
RCB वर मोठी कारवाई होणार? BCCI बैठकीत काय निर्णय घेणार? समोर आली खास अपडेट
17
निवृत्तीचे वय ६० करण्यास होतोय विरोध, दुसरीकडे ६५ पर्यंत काम करण्याची मुभा
18
मुंबईत १६ वर्षाच्या मुलीवर अत्याचार, गर्भवती राहिल्यानंतर धक्कादायक प्रकार उघड, गुन्हा दाखल
19
Swami Samartha: राग, चिडचिड, नैराश्य घालवण्याचा रामबाण उपाय म्हणजे 'हा' स्वामी संदेश!
20
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार

कापूस उत्पादक अडकला फरडच्या मोहात

By ram.jadhav | Updated: January 15, 2018 00:35 IST

दरवाढीने अपेक्षा वाढल्या : कृषी विभागाच्या आदेशाला शेतकºयांचा हरताळ

ठळक मुद्देवाढत्या भावाची लागली आसशासनाच्या मदतीपेक्षा स्वत:च्याच शेतात काहीतरी मिळण्याची अपेक्षापुढील वर्षी फरदड घेण्याचा हाच निर्णय शेतकºयांसाठी त्रासदायक ठरणार आहे

राम जाधवआॅनलाईन लोकमत दि़ १५, जळगाव : यावर्षी अपुºया पावसातही कसाबसा कापसाचा हंगाम आला; मात्र गुलाबी बोंडअळीने कैºया पोखरल्याने कापसाचे उत्पादन घटले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आता कापसाच्या दरात तेजी येत असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी फरदडच्या उत्पनांच्या मोहात अडकला आहे. त्यामुळे शेतात उभे असलेले कपाशीचे पीक कृषी विभागाकडून उपटण्याचे आदेश येऊनही शेतकºयांना उपटण्याची इच्छा होत नसल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस वाढणाºया कापसाच्या दराने शेतकºयांना अशा नुकसानीच्या व दुष्काळी परिस्थिती असलेल्या वर्षात उभे पीक काढण्याचेही धाडस होत नाहीये. म्हणूनच खालावणाºया आर्थिक परिस्थितीत आता फरदड घेण्याचा निर्धार जिल्ह्यातील बहुतेक शेतकºयांनी केल्याचे दिसत आहे.बोंडअळीचे संकट वाढणारशेतकºयांचा हा निर्णय त्यांनाच पुढील वर्षासाठी घातक ठरणार आहे. फरदड घेतल्यामुळे गुलाबी बोंडअळीला जास्त काळ जीवन जगता येणार आहे. त्यामुळे या अळीचे जीवनचक्र पूर्ण होऊन पुढील हंगामात मोठ्या प्रमाणावर या अळीचा प्रादुर्भाव वाढून गुलाबी बोंडअळीचे संकट वाढणार आहे. म्हणूनच कृषी विभागाकडून कपाशीचे पीक लवकरात लवकर नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र शेतकºयांनी ते जुमानले नाहीत.शेतकºयांकडे पैसाच नाहीवर्षभरापासून मिळणारी कर्जमाफी अजूनही मिळत नाही. काहींना तोकडी रक्कम मिळाली तर अनेकजण अजूनही यादीच्याच प्रतीक्षेत आहेत. त्यातही मिळालेला पैसा विकास सोसायट्या १४ टक्के व्याजदराने जिल्हा बँकेच्या मदतीने लाटण्याच्या कामाला लागलेल्या आहेत़ त्रस्त झालेल्या शेतकºयांकडे आता पर्याय उरलेला नाही, म्हणून जे मिळतील ते आपले असे म्हणून शेतकरी फरदडीच्या कापसाची प्रतीक्षा करीत आहे; मात्र फरदडीच्या या कपाशीचीही सर्व बोंडे अळीग्रस्त झालेली आहेत. यापासून अनेक शेतकरी अद्यापही अनभिज्ञच आहेत. याच अळ्या पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर त्रास देणार आहेत़४गेल्या महिन्यात राज्याच्या कृषी आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत शेतकºयांना कपाशीचे पीक उपटण्यासाठी आदेश देण्याचे ठरले होते. त्यानुसार राज्यभर कृषी अधिकाºयांनी शेतकºयांना कपाशी उपटण्याचे सांगितले.४त्यानुसार काही शेतकºयांनी कपाशी उपटलीसुद्धा, मात्र त्यातही ज्याच्याकडे काही रब्बी पिके घेण्यासाठी पाण्याची सोय होती, अशाच शेतकºयांनी तत्काळ कपाशीचे पीक काढून गहू, हरभरा, मका, दादर किंवा इतर काही भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड केली. ज्यांच्याकडे फारशी पाण्याची व्यवस्था नाही, अशा शेतकºयांनी कपाशीची फरदड घेण्याचे ठरवले आहे.शेतकºयांनी फरदडचा कापूस घेण्याच्या नांदात ना पडता लवकरात-लवकर कपाशीवर ग्रामोझोम या औषधाची फवारणी करून मिळेल तो कापूस वेचून घ्यावा. जास्त कालावधीच्या कपाशीच्या वाणाची लागवड करू नये. डिसेंबर महिनाअखेर पर्यंत कपाशीचे पीक संपवावे. शेतात अळीग्रस्त बोंडे ठेवू नये, अशी बोंडे व कपाशी जाळून नष्ट करावी.- बी. डी. जडे, वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ, जळगाव.भाव वाढले आहेत; मात्र यावर्षी मिळणाºया काही हजारोंच्या उत्पन्नासाठी शेतकºयांनी पुढील वर्षीचे लाखोंचे उत्पन्न बुडवू नये. पुढील हंगामात जर कपाशीचे उत्पादन घ्यायचे असेल तर आhttp://www.lokmat.com/akola/bt-cotton-pink-bollworm-attack-cotton-crop/ताच शेतकºयांनी कपाशीचे पीक नष्ट करावे.- अनिल भोकरे कृषी उपसंचालक, जळगाव.या हंगामात कापसाचे उत्पादन घटले, जो आला त्याला ही सुरुवातीला दर मिळाला नाही. त्यामुळे आतातरी जगण्यासाठी काहीतरी दोन पैसे मिळतील, अशी अपेक्षा असल्याने फरदड घेत आहे़सुधाकर पाटील, शेतकरी वाकोद, ता. जामनेर.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcottonकापूस