शहरं
Join us  
Trending Stories
1
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
2
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
3
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
4
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
5
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
6
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
7
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
8
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
9
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय
10
त्र्यंबकेश्वर: पत्रकारांवर हल्ला करणाऱ्या गुंडांचा तातडीने बंदोबस्त करा; काँग्रेसची मागणी
11
अवघ्या युरोपच्या विमानतळांवर मोठा सायबर हल्ला; विमाने अडकली, प्रवाशांच्या गर्दीने एअरपोर्ट खचाखच भरले...
12
याला म्हणतात धमाका शेअर...! केवळ 2 वर्षांत दिला 900 टक्के परतावा, आजही करतोय मालामाल; तुमच्याकडे आहे का?
13
सचिन तेंडुलकरसोबत अफेअरची चर्चा, आता अनेक वर्षांनंतर शिल्पा शिरोडकर सोडलं मौन, म्हणाली...
14
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
15
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यासाठी कर्णधार सूर्याने टीम इंडियाला दिला असा सल्ला, म्हणाला फोन बंद करा आणि...  
16
Scuba Diving : १०, २० की ३० मीटर? पाण्यात नेमके किती खोलवर जातात स्कूबा डायव्हर्स?
17
Navratri 2025: नवरात्रीत का घ्यावा सात्त्विक आहार? त्यामुळे शरीराला कोणते लाभ होतात?
18
VIDEO: माकडाने अचानक महिलेच्या डोक्यावरून हिसकावला गॉगल.. पुढे जे झालं ते पाहून व्हाल थक्क
19
"मी पुन्हा सांगतो, भारताकडे एक कमकुवत पंतप्रधान", H-1B व्हिसा प्रकरणावरून राहुल गांधींचा हल्लाबोल
20
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!

कापूस उत्पादक अडकला फरडच्या मोहात

By ram.jadhav | Updated: January 15, 2018 00:35 IST

दरवाढीने अपेक्षा वाढल्या : कृषी विभागाच्या आदेशाला शेतकºयांचा हरताळ

ठळक मुद्देवाढत्या भावाची लागली आसशासनाच्या मदतीपेक्षा स्वत:च्याच शेतात काहीतरी मिळण्याची अपेक्षापुढील वर्षी फरदड घेण्याचा हाच निर्णय शेतकºयांसाठी त्रासदायक ठरणार आहे

राम जाधवआॅनलाईन लोकमत दि़ १५, जळगाव : यावर्षी अपुºया पावसातही कसाबसा कापसाचा हंगाम आला; मात्र गुलाबी बोंडअळीने कैºया पोखरल्याने कापसाचे उत्पादन घटले. मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे. आता कापसाच्या दरात तेजी येत असल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी फरदडच्या उत्पनांच्या मोहात अडकला आहे. त्यामुळे शेतात उभे असलेले कपाशीचे पीक कृषी विभागाकडून उपटण्याचे आदेश येऊनही शेतकºयांना उपटण्याची इच्छा होत नसल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस वाढणाºया कापसाच्या दराने शेतकºयांना अशा नुकसानीच्या व दुष्काळी परिस्थिती असलेल्या वर्षात उभे पीक काढण्याचेही धाडस होत नाहीये. म्हणूनच खालावणाºया आर्थिक परिस्थितीत आता फरदड घेण्याचा निर्धार जिल्ह्यातील बहुतेक शेतकºयांनी केल्याचे दिसत आहे.बोंडअळीचे संकट वाढणारशेतकºयांचा हा निर्णय त्यांनाच पुढील वर्षासाठी घातक ठरणार आहे. फरदड घेतल्यामुळे गुलाबी बोंडअळीला जास्त काळ जीवन जगता येणार आहे. त्यामुळे या अळीचे जीवनचक्र पूर्ण होऊन पुढील हंगामात मोठ्या प्रमाणावर या अळीचा प्रादुर्भाव वाढून गुलाबी बोंडअळीचे संकट वाढणार आहे. म्हणूनच कृषी विभागाकडून कपाशीचे पीक लवकरात लवकर नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र शेतकºयांनी ते जुमानले नाहीत.शेतकºयांकडे पैसाच नाहीवर्षभरापासून मिळणारी कर्जमाफी अजूनही मिळत नाही. काहींना तोकडी रक्कम मिळाली तर अनेकजण अजूनही यादीच्याच प्रतीक्षेत आहेत. त्यातही मिळालेला पैसा विकास सोसायट्या १४ टक्के व्याजदराने जिल्हा बँकेच्या मदतीने लाटण्याच्या कामाला लागलेल्या आहेत़ त्रस्त झालेल्या शेतकºयांकडे आता पर्याय उरलेला नाही, म्हणून जे मिळतील ते आपले असे म्हणून शेतकरी फरदडीच्या कापसाची प्रतीक्षा करीत आहे; मात्र फरदडीच्या या कपाशीचीही सर्व बोंडे अळीग्रस्त झालेली आहेत. यापासून अनेक शेतकरी अद्यापही अनभिज्ञच आहेत. याच अळ्या पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर त्रास देणार आहेत़४गेल्या महिन्यात राज्याच्या कृषी आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत शेतकºयांना कपाशीचे पीक उपटण्यासाठी आदेश देण्याचे ठरले होते. त्यानुसार राज्यभर कृषी अधिकाºयांनी शेतकºयांना कपाशी उपटण्याचे सांगितले.४त्यानुसार काही शेतकºयांनी कपाशी उपटलीसुद्धा, मात्र त्यातही ज्याच्याकडे काही रब्बी पिके घेण्यासाठी पाण्याची सोय होती, अशाच शेतकºयांनी तत्काळ कपाशीचे पीक काढून गहू, हरभरा, मका, दादर किंवा इतर काही भाजीपाला वर्गीय पिकांची लागवड केली. ज्यांच्याकडे फारशी पाण्याची व्यवस्था नाही, अशा शेतकºयांनी कपाशीची फरदड घेण्याचे ठरवले आहे.शेतकºयांनी फरदडचा कापूस घेण्याच्या नांदात ना पडता लवकरात-लवकर कपाशीवर ग्रामोझोम या औषधाची फवारणी करून मिळेल तो कापूस वेचून घ्यावा. जास्त कालावधीच्या कपाशीच्या वाणाची लागवड करू नये. डिसेंबर महिनाअखेर पर्यंत कपाशीचे पीक संपवावे. शेतात अळीग्रस्त बोंडे ठेवू नये, अशी बोंडे व कपाशी जाळून नष्ट करावी.- बी. डी. जडे, वरिष्ठ कृषी विद्या शास्त्रज्ञ, जळगाव.भाव वाढले आहेत; मात्र यावर्षी मिळणाºया काही हजारोंच्या उत्पन्नासाठी शेतकºयांनी पुढील वर्षीचे लाखोंचे उत्पन्न बुडवू नये. पुढील हंगामात जर कपाशीचे उत्पादन घ्यायचे असेल तर आhttp://www.lokmat.com/akola/bt-cotton-pink-bollworm-attack-cotton-crop/ताच शेतकºयांनी कपाशीचे पीक नष्ट करावे.- अनिल भोकरे कृषी उपसंचालक, जळगाव.या हंगामात कापसाचे उत्पादन घटले, जो आला त्याला ही सुरुवातीला दर मिळाला नाही. त्यामुळे आतातरी जगण्यासाठी काहीतरी दोन पैसे मिळतील, अशी अपेक्षा असल्याने फरदड घेत आहे़सुधाकर पाटील, शेतकरी वाकोद, ता. जामनेर.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रcottonकापूस