शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

शासनाने अधिग्रहीत केलेली मंदिरे भक्तांच्या ताब्यात द्यावीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 19:32 IST

यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ द्यायचे नाही. तसेच आजवर जी मंदिरे शासनाने अधिग्रहित केली आहेत, तीसुद्धा भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी शासनाला भाग पाडायचे, असा निर्धार उत्तर महाराष्ट्रातील मंदिरांच्या विश्वस्तांनी एकमुखाने केला.

ठळक मुद्देउत्तर महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांच्या बैठकीत एकमुखाने मागणीबैठकीत ठराव - यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ देणार नाही आणि आजवर शानसाने अधिग्रहित केलेली मंदिरे भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी शासनाला भाग पाडणार!

अमळनेर, जि.जळगाव : आजवर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरात ज्या ज्या मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे, त्या मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे पुराव्यानिशी बाहेर आले आहे. तसेच सरकारीकरण झालेल्या मंदिरांमध्ये हिंदू परंपरांचीही पायमल्ली होण्याचे संतापजनक प्रकार घडत आहेत. त्यामुळे यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ द्यायचे नाही. तसेच आजवर जी मंदिरे शासनाने अधिग्रहित केली आहेत, तीसुद्धा भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी शासनाला भाग पाडायचे, असा निर्धार उत्तर महाराष्ट्रातील मंदिरांच्या विश्वस्तांनी एकमुखाने केला.हिंदू जनजागृती समितीच्या पुढाकारातून उत्तर महाराष्ट्रातील मंदिरांच्या विश्वस्तांच्या एकत्रित बैठकीचे आयोजन अमळनेर येथील श्री मंगळदेव ग्रह मंदिरात करण्यात आले होते. या बैठकीला संत-महंत, वारकरी संप्रदायातील महाराज, उत्तर महाराष्ट्रातील विविध मंदिरांचे विश्वस्त, हिंदुत्ववादी तसेच सनदी लेखापाल आदी मान्यवर उपस्थित होते.या बैठकीला सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरू नंदकुमार जाधव, प्रसिद्ध सनदी लेखापाल गोवर्धन मोदी तसेच हिंदू जनजागृती समितीचे महाराष्ट्र व छत्तीसगड राज्य संघटक सुनील घनवट यांनी मार्गदर्शन केले.घनवट म्हणाले, 'भारत हा जगाचा आध्यात्मिक गुरु आहे. जगात कुठेही नसतील, इतकी अनेक प्राचीन मंदिरे आणि तीर्थक्षेत्रे भारतात आहेत. या तीर्थक्षेत्रांमधील चैतन्य आणि सात्त्विकता यांमुळेच आज भारतात सात्त्विकता टिकून आहे. असे असले, तरी वर्तमान परिस्थितीत मंदिरांची स्थिती चिंताजनक आहे. धर्मांधांकडून मंदिरांच्या जागांवर अतिक्रमण होणे, मूर्तींची तोडफोड करणे, दानपेट्या तोडणे, मंदिरांच्या उत्सवांमध्ये व्यत्यय आणणे आदी आघातांसोबतच काही ठिकाणी प्रशासकीय अधिकाऱ्यांकडूनही मोठ्या प्रमाणात मंदिर विश्वस्तांना, मंदिराची देखरेख करणाऱ्यांना त्रास देण्याचा भाग होतो. काही वेळा पुरोगामी लोकांकडून मंदिरांच्या वर्षानुुवर्षे चालत आलेल्या परंपरांविषयी वाद निर्माण करून त्या परंपरा मोडित काढण्यासाठी दबाव निर्माण केला जातो किंवा मंदिराची/मंदिर विश्वस्तांची अपकिर्ती केली जाते. अशा कठीण प्रसंगांना मंदिराचे विश्वस्त मंडळ आणि मंदिराशी जोडलेले काही भाविक हेच तोंड देत असल्याने ते एकटे पडतात. ही परिस्थिती पालटण्यासाठी तसेच संघटितपणे या आघातांना सामोरे जाण्यासाठी मंदिर विश्वस्तांचे एकीकरण होणे आवश्यक आहे.या बैठकीला अमळनेर येथील श्री मंगळग्रह सेवा संस्थान, इच्छापूर्ती गणेश मंदीर चांदवड, बालवीर हनुमान मंदिर चोपडा, श्री नवग्रह मंदिर चोपडा, कपिलेश्वर महादेव मंदिर मुडावद, श्री क्षेत्र शिवधाम रत्नपिंप्री, श्रीक्षेत्र ममलेश्वर मंदिर, रोकडोबा मारुती मंदिर धुळे, स्वामीनारायण मंदिर अमळनेर, श्रीराम मंदिर संस्थान शिरपूर, श्री नवनाथ मंदिर रत्नपिंप्री, पाचपावली मंदिर अमळनेर आदी विविध मंदिरांचे विश्वस्त तसेच वारकरी संप्रदाय, सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समिती आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.मंदिरांचे एकिकरण असल्याने या बैठकीत 'उत्तर महाराष्ट्र मंदिर-संस्कृती रक्षा कृती समिती'ची स्थापना करण्यात आली. यापुढील उत्तर महाराष्ट्रातील मंदिर विश्वस्तांची बैठक १९ एप्रिल रोजी अमळनेर येथे कपिलेश्वर महादेव मंदिरात सकाळी ११ वाजता होईल.बैठकीत एकमुखाने संमत झालेले ठराव-यापुढे एकाही मंदिराचे सरकारीकरण होऊ देणार नाही आणि आजवर शानसाने अधिग्रहित केलेली मंदिरे भक्तांच्या ताब्यात देण्यासाठी शासनाला भाग पाडणार!मंदिरांकडील एकही पैसा अन्य धर्मियांसाठी खर्च करू देणार नाही!मंदिरे ही हिंदूंना धर्मशिक्षण मिळण्याचे केंद्र बनवण्यासाठी मंदिरांच्या माध्यमातून धर्मप्रसार करणार!देशभरात कुठेही मंदिरावर आघात झाल्यास त्याला संवैधानिक मार्गाने विरोध करणार आणि राष्ट्रीय स्तरावर मंदिर-संस्कृती रक्षणासाठी कृतीशील रहाणार! 

टॅग्स :TempleमंदिरAmalnerअमळनेर