शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

मानवतेची शिकवण, विश्वशांतीचा संदेश देणारा बौद्ध धम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 01:45 IST

संपूर्ण विश्वामध्ये भारताची उंच मान

संपूर्ण विश्वामध्ये भारताची उंच मान आहे. ती फक्त बौद्ध विचारामुळे येथील शांती, अहिंसा, न्याय, शील, प्रज्ञा या सगळ्यामुळे बौद्ध धर्म श्रेष्ठ आहे. संघमित्रा आणि महेंद्र ही सम्राट अशोकाची मुलं त्यांनी संपूर्ण जगात धम्म प्रसारचे कार्य केले. भगवान गौतम बुद्धांनी बहुजन समाजाच्या हितासाठी बौद्ध धम्माची स्थापना केली. तो मानवतावादी आहे. बौद्धधम्म हा संपूर्ण विज्ञानावर आधारीत आहे. त्याला एक जीवन पद्धती आहे. बौद्ध धम्म समानता, न्याय, एकता, राष्टÑीयता, स्वातंत्र्यता, करूणा, मैत्री, विश्वबंधूता आहे. मानवाला मानसिक गुलामीतून मुक्त करणारा मार्ग बुद्धाने दिला. बुद्धाने बुद्ध धम्माला पारखण्यासाठी एक कसोटी केली आहे. ती अन्य कुठही मिळणार नाही. ते म्हणतात.एखाद्या गोष्टीला मानायचे नाही, त्याला खूप लोक मानतात. एखाद्या गोष्टीला मानायचे नाही कारण त्याला साधू, संत, ब्राह्मण आचार्य इ. पूज्य व्यक्ती मानतात. एखाद्या गोष्टीला मानायचे नाही कारण आपले पूर्वज मानतात. आपल्या विवेकाला कसून त्याची तपासणी करा. आपल्या अनुभूतीवर उतरले का ते पहा नंतरच त्याचा स्वीकार करा. ती गोष्टी तर्कसंगत, बौद्धीसंगत, विज्ञानसंगत, न्यायसंगत आणि बहुजनांच्या हिताची असेल तरच त्याचा स्वीकार करा. ज्याप्रमाणे सोनार सोन तापवून तापवून आपल्या कसोटीवर सोन पारखतो, त्या प्रमाणे याही सोन्याला पारखा असा बुद्धाचा साधा सोपा स्पष्ट धम्म आहे. त्याच कुठेही अंधश्रद्धा नाही. धम्माची संपूर्ण मांडणी ही कृती आणि वाचेतून अहिंसेवर आधारीत आहे. अहिंसा त्याची मुख्य शिकवण आहे.बौद्ध कालिण कौशल देशाची राजधानी वैशाली आणि तिचा राजा प्रसेनजीत हा अतिषय हुशार आणि भाग्यशाली होता, कारण त्याने अनेकदा बुद्धाचे प्रवचन ऐकले होते. प्रसेनजीतची राणी मल्लीका ही अतिश बौद्ध धम्माची निष्ठावान आणि अभ्यासू अशी होती. ती अहिंसावादी होती. एकदा प्रसेनजीत राज्याला एका ब्राह्मण पुरोहिताने सल्ला दिला की, त्याच्या राज्यावरती जे संकट आले ने नष्ट करण्यासाठी हजार पशुंचा बळी देणे अनिवार्य आहे.राजा हा संकल्प मनाला आणि कृतीत आणायला तयार झाला. तेव्हा राणीने राजाला पशुबळी देण्यापासून परावृत्त केले. अशा प्रकारे बळी दिल्या जाणारे प्राण्यांचे जीवन वाचविले होते. राणी वरती बौद्ध धम्मातील अहिंसा या तत्वाचा मोठा पगडा होता. ती स्वत: निर्णय घेणारी होती व ती स्वतंत्र विचाराची होती.मी जीवहिंसेपासून अलिप्त राहण्याची शिकवण ग्रहण करतो. हे राणीचे निर्णयात्मक कर्तव्य अहिंसेच्या मार्गावरती वाटचाल करणारे आहे. कोणाची हिंसा करून नये, किंवा करवून घेवू नये, असे कृत्य करणाऱ्यांचे समर्थन करू नये. प्राणी हत्या करू नये, तो बलवान असो वा निर्बल एखादी व्यक्ती शंभर वर्षे आपले सर्वस्व सर्व देवतांना बळी अर्पणसाठी केंद्रीत करीत असेल तर त्या व्यक्तीची तुलना अशा व्यक्तीशी करू शकत नाही.- सरोजिनी गांजरे- लभाणे, जळगाव

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकJalgaonजळगाव