शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

‘तापी’चे भिजत घोंगडे, वार्षिक गरज २०० कोटीची, मिळाले ४० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 11:30 IST

शिल्लक कामाची किंमत २३०० कोटींवर

जळगाव : राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांसाठी एकूण ४०८ कोटींचा निधी मिळाला असून यात निम्न तापी प्रकल्पासाठी ४० कोटींचा निधी मिळाला आहे. प्रत्यक्षात या कामाची दरवर्षी किंमत वाढत जात असून याच्या शिल्लक कामाची किंमत आज २३०० कोटींवर पोहचली आहे. त्यामुळे दरवर्षी किमान २०० कोटी रुपये यासाठी मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ४० कोटीच मिळाल्याने हा प्रकल्प कसा पूर्ण होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी मंजूर ३२ कोटी पाच लाखाच्या निधीतूनही ३० टक्के रक्कम कपात झाली होती, हे विशेष.जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पासह विविध प्रकल्पांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची घोषणा करण्यात आली. यात निम्न तापी प्रकल्पासाठी ४० कोटी, भागपूर उपसा सिंचन योजनेसाठी १२५ कोटी, वरखेड लोंढेसाठी ५० कोटी शेळगाव बॅरेजसाठी ९३ कोटी बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेसाठी ५० कोटी तसेच याच प्रकल्पासाठी विदर्भातील तरतुदीतून ५० कोटी निधी घोषित करण्यात आला. या सोबतच धुळे जिल्ह्यातील सुलवाडे, जामफळ, कनोली उपसा सिंचन योजनेसाठी १४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली.२० टक्केच मिळतो निधीनिम्न तापी प्रकल्पासाठी दरवर्षी किमान २०० कोटीची तरतूद केली तरच या प्रकल्पाच्या कामाल गती येऊ शकते. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात ३२ कोटी ५ लाखाचा निधी यासाठी मिळाला. त्यानंतर आता यंदाही केवळ ४० कोटींचा निधी मिळाला. ४० ते ५० कोटींच्या निधीतून हे काम होणे अशक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.२३०० कोटींचे काम बाकीआज प्रकल्पाची स्थिती पाहिली तर मुख्य धरणाचे काम ३५ टक्के झाले असून यासाठीच्या भूसंपादनाचे काम १० टक्के तर पुनर्वसनाचे काम २० ते २५ टक्के झाले आहे. त्यामुळे उर्वरित कामासाठी आजच्या किंमतीनुसार २३०० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. आज करण्यात आलेली तरतूद केवळ ४० कोटी असल्याने त्यात वर्षभरात काय-काय करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यात दरवर्षी प्रकल्पाची किंमत सहा ते सात टक्क्याने वाढत जाते. परिणामी अल्प तरतुदीमुळे प्रकल्प वेग घेऊच शकत नाही, असे जाणकार सांगत आहे.आर्थिक बोझ्याने ३० टक्के कपातगेल्या वर्षी निम्न तापीसाठी ३२ कोटी ५ लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर दुष्काळी अनुदान, शेतकरी कर्जमाफी अशा योजनांमुळे आर्थिक बोझा वाढल्याने राज्य सरकारने निधीमध्ये कपात करणे सुरू केले. त्यात निम्न तापीच्या तरतूद निधीतून ३० टक्के रक्कम कपात केली होती. त्यामुळे यंदा मंजूर ४० कोटी तर पूर्ण मिळावे, अशी अपेक्षा जिल्हावासीय करीत आहे.मोठ्या योजनांमध्ये समावेश केल्यास गतीनिम्न तापी प्रकल्पाचा समावेश बळीराजा संजीवनी योजना अथवा प्रधानमंत्री सिंचाई योजनेत केल्यास या प्रकल्पाला केंद्राकडूनही निधी मिळून त्यात गती येईल, असे जाणकार सांगत आहे. असे झाल्यास हा प्रकल्प वेग घेईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव