शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
3
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
4
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
5
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
6
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
7
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
8
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
9
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
10
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
11
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
12
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
13
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
14
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
15
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
16
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
17
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
18
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
19
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
20
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'

‘तापी’चे भिजत घोंगडे, वार्षिक गरज २०० कोटीची, मिळाले ४० कोटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 11:30 IST

शिल्लक कामाची किंमत २३०० कोटींवर

जळगाव : राज्याच्या अर्थसंकल्पात जिल्ह्यातील पाणी प्रकल्पांसाठी एकूण ४०८ कोटींचा निधी मिळाला असून यात निम्न तापी प्रकल्पासाठी ४० कोटींचा निधी मिळाला आहे. प्रत्यक्षात या कामाची दरवर्षी किंमत वाढत जात असून याच्या शिल्लक कामाची किंमत आज २३०० कोटींवर पोहचली आहे. त्यामुळे दरवर्षी किमान २०० कोटी रुपये यासाठी मिळणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात केवळ ४० कोटीच मिळाल्याने हा प्रकल्प कसा पूर्ण होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी मंजूर ३२ कोटी पाच लाखाच्या निधीतूनही ३० टक्के रक्कम कपात झाली होती, हे विशेष.जिल्ह्यातील निम्न तापी प्रकल्पासह विविध प्रकल्पांसाठी राज्याच्या अर्थसंकल्पात निधीची घोषणा करण्यात आली. यात निम्न तापी प्रकल्पासाठी ४० कोटी, भागपूर उपसा सिंचन योजनेसाठी १२५ कोटी, वरखेड लोंढेसाठी ५० कोटी शेळगाव बॅरेजसाठी ९३ कोटी बोदवड परिसर उपसा सिंचन योजनेसाठी ५० कोटी तसेच याच प्रकल्पासाठी विदर्भातील तरतुदीतून ५० कोटी निधी घोषित करण्यात आला. या सोबतच धुळे जिल्ह्यातील सुलवाडे, जामफळ, कनोली उपसा सिंचन योजनेसाठी १४३ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली.२० टक्केच मिळतो निधीनिम्न तापी प्रकल्पासाठी दरवर्षी किमान २०० कोटीची तरतूद केली तरच या प्रकल्पाच्या कामाल गती येऊ शकते. मात्र प्रत्यक्षात तसे होत नाही. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात ३२ कोटी ५ लाखाचा निधी यासाठी मिळाला. त्यानंतर आता यंदाही केवळ ४० कोटींचा निधी मिळाला. ४० ते ५० कोटींच्या निधीतून हे काम होणे अशक्य असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.२३०० कोटींचे काम बाकीआज प्रकल्पाची स्थिती पाहिली तर मुख्य धरणाचे काम ३५ टक्के झाले असून यासाठीच्या भूसंपादनाचे काम १० टक्के तर पुनर्वसनाचे काम २० ते २५ टक्के झाले आहे. त्यामुळे उर्वरित कामासाठी आजच्या किंमतीनुसार २३०० कोटींच्या निधीची आवश्यकता आहे. आज करण्यात आलेली तरतूद केवळ ४० कोटी असल्याने त्यात वर्षभरात काय-काय करणार असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यात दरवर्षी प्रकल्पाची किंमत सहा ते सात टक्क्याने वाढत जाते. परिणामी अल्प तरतुदीमुळे प्रकल्प वेग घेऊच शकत नाही, असे जाणकार सांगत आहे.आर्थिक बोझ्याने ३० टक्के कपातगेल्या वर्षी निम्न तापीसाठी ३२ कोटी ५ लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र त्यानंतर दुष्काळी अनुदान, शेतकरी कर्जमाफी अशा योजनांमुळे आर्थिक बोझा वाढल्याने राज्य सरकारने निधीमध्ये कपात करणे सुरू केले. त्यात निम्न तापीच्या तरतूद निधीतून ३० टक्के रक्कम कपात केली होती. त्यामुळे यंदा मंजूर ४० कोटी तर पूर्ण मिळावे, अशी अपेक्षा जिल्हावासीय करीत आहे.मोठ्या योजनांमध्ये समावेश केल्यास गतीनिम्न तापी प्रकल्पाचा समावेश बळीराजा संजीवनी योजना अथवा प्रधानमंत्री सिंचाई योजनेत केल्यास या प्रकल्पाला केंद्राकडूनही निधी मिळून त्यात गती येईल, असे जाणकार सांगत आहे. असे झाल्यास हा प्रकल्प वेग घेईल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव