शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली लाल किल्ला स्फोट: कारमधून ब्लास्ट घडवून आणणाऱ्या उमरचा पहिला फोटो आला समोर
2
दिल्लीच्या स्फोटाची पाकिस्ताननं घेतली धास्ती; रात्रीच बोलावली तातडीची बैठक, NOTAM जारी अन्...
3
VIDEO: स्फोटकांनी भरलेली कार ३ तास एकाच ठिकाणी उभी; स्फोट घडवणाऱ्याने एका मिनिटासाठीही गाडी सोडली नाही
4
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
5
गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! निफ्टीमध्ये आणखी १४% तेजीची शक्यता; गोल्डमॅन सॅक्सने सांगितलं कारण
6
टॅरिफमुळे प्रत्येक अमेरिकन नागरिकाला मिळणार २००० डॉलर्स, याच्या विरोधात बोलणारा मुर्ख; काय म्हणाले ट्रम्प?
7
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांच्या प्रकृतीत होतेय सुधारणा, हेमा मालिनी आणि ईशा देओलने दिली हेल्थ अपडेट; म्हणाल्या...
8
कंटेनर शिरला थेट वारकऱ्यांच्या दिंडीत, १० जखमी, एका महिलेचा चिरडून मृत्यू, जुन्या पुणे मुंबई हायवे मार्गावरील घटना
9
५ वर्षांच्या आत हे 'काम' पूर्ण झालं पाहिजे; केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी अधिकाऱ्यांना दिलं टार्गेट
10
दिल्लीत 'फिदायिन' हल्ला?; लाल किल्ल्याजवळ स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
11
Share Market Update: शेअर बाजार आपटला; सेन्सेक्समध्ये २५० अंकांची घसरण, 'हे' प्रमुख स्टॉक्स धडाम
12
रोहित शर्मा-विराट कोहलीच्या दमदार खेळीनंतर गौतम गंभीरने अजिबात सेलिब्रेशन केलं नाही; कारण..
13
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये मिळेल दरमहा ₹५५०० चं फिक्स व्याज; किती करावी लागेल गुंतवणूक, पटापट करा चेक
14
"थोड्या वेळात घरी येतोय..."; दिल्ली स्फोटाने बस कंडक्टर अशोक कुमारचा घेतला बळी; आईला अजूनही माहिती नाही
15
पकडले जाण्याच्या भीतीने उमरने उडवली स्फोटकांनी भरलेली कार; पुलवामा हल्ल्याच्या दिवशी विकली गाडी
16
भाजप, काँग्रेसची नगराध्यक्ष उमेदवारांची यादी ५ दिवसांत, आज भाजपची तर उद्या काँग्रेसची मुंबईत होणार महत्त्वपूर्ण बैठक
17
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
18
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
19
दिल्लीतील स्फोटात आतापर्यंत १० खुलासे समोर; फरीदाबाद मॉड्यूलशी काय आहे कनेक्शन?
20
दिल्लीत स्फोट; मुंबईत अलर्ट, मुंबईच्या पाचही प्रवेशद्वारांसह सागरी सुरक्षेत वाढ; रेल्वे स्थानके, महत्त्वाच्या ठिकाणी नाकाबंदी

तापी-गिरणा पट्ट्याला वादळी पावसाचा तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2019 12:34 IST

केळीचे प्रचंड नुकसान

जळगाव : तालुक्यातील गिरणा-तापी नदीच्या काठावरील भोकर, कठोरा, किनोद, आमोदा, सावखेडा, पळसोद भागात शुक्रवारी पुन्हा झालेल्या वादळीपावसामुळे केळी उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. ३ जून रोजी झालेल्या वादळी पावसामुळे देखील या भागातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. आठवड्याभरातच दोनवेळा वादळी पावसाने शेतकºयांचे कंबरडे मोडले आहे.यंदा दुष्काळ असल्याने गिरणा-तापी नदीलगतच्या गावांना देखील पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. दुष्काळामुळे अनेक ट्युबवेल्स आटल्या असल्याने केळीला पाणी देणे देखील कठीण झाले आहे. अशा परिस्थितीत जेमतेम तग धरलेल्या केळीच्या कांदेबागाचे वादळी पावसामुळे नुकसान झाल्याने केळी उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. तसेच गेल्या वर्षी देखील जून महिन्यात झालेल्या वादळी पावसाची अद्याप देखील नुकसान भरपाई मिळाली नसताना त्यात यंदा झालेल्या नुकसानाची भर पडली आहे.३ जूनच्या वादळात वाचलेली केळीही भुईसपाटशुक्रवारी दुपारी ४ ते साडे चार दरम्यान अर्धातास झालेल्या वादळी पावसामुळे केळीचे नुकसान झाले आहे. ३ जून रोजी झालेल्या वादळी पावसात ज्या केळी बागांचे नुकसान झाले नव्हत्या त्या बागांचेही नुकसान या पावसात झाले आहे. ४० ते ४५ किमीच्या वेगाने वाहत जाणाºया वाºयांमुळे केळीसह चाºयाचेही नुकसान झाले आहे. काही भागात विजेचे खांब पडल्यामुळे वीजपुरवठा खंडीत झाला होता.पंचनाम्यासाठी थांबावे की खरीपाची तयारी करावी ?भोकर महसुल मंडळात १४ एप्रिल रोजी देखील वादळी पाऊस झाला होता. तसेच आता आठवड्यात दोन वेळा वादळाचा तडाखा बसला आहे. शेतकºयांनी केळी पिक विमा काढला असला तरी वादळानंतर ४८ तासात विमा कंपनीला कळवून पंचनामा करून घेणे गरजेचे आहे.खरीपाची तयारी करावी कशी...दरम्यान, आता शेतकरी खरीप हंगामाच्या तयारीला लागला आहे. अशा परिस्थितीत पंचनाम्यासाठी थांबावे की खरीपाची तयारी करावी असा प्रश्न शेतकºयांसमोर उभा ठाकला आहे. या भागातील एकूण नुकसान पाहता सरसकट केळी विमा धारकांना विम्याचा लाभ मिळावा अशी मागणी कठोरा येथील केळी उत्पादक शेतकरी डॉ.सत्वशील पाटील यांनी केली आहे.खेडी, आव्हाणे येथे तीन तास वीज पुरवठा खंडितजळगाव : शुक्रवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसामुळे खेडी, आव्हाणे व फुपनगरी या गावातील वीज पुरवठा सायंकाळी साडेसात पासून खंडित होता. काही ठिकाणी विद्युत खांब व वीज तारा कोसळ््यामुळे हा वीज पुरवठा खंडित झाल्याचे महावितरणच्या नियंत्रण कक्षातर्फे सांगण्यात आले. घटनेची माहिती मिळताच विद्युत पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कर्मचारी संबंधित गावांना रवाना झाले होते. रात्री उशिरापर्यंत महावितरणच्या कर्मचाºयांनी काम करुन, वीज पुरवठा सुरळीत केला. दरम्यान, ऐन उन्हाळ््यात वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे, नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागला.

टॅग्स :Jalgaonजळगाव