रिक्षाचालकांनी आग विझविल्याने मोठा अनर्थ टळलाभुसावळ (जि. जळगाव) : नवी मुंबईहून ऑईल बनविण्यासाठी लागणारे ज्वलनशील रसायन घेऊन निघालेल्या टँकरने नाहाटा चौफुलीवरच पेट घेतल्याने परिसरातील नागरिकांसह पोलीस व अग्निशमन यंत्रणेची मोठी धावपळ उडाली. मात्र सतर्क रिक्षा चालकांनी तातडीने आग विझविण्यात यश मिळवल्याने मोठी दुर्घटना टळली व नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला़नवी मुंबईहून कोलकत्ताकडे ऑईल बनविण्यासाठी लागणारे रसायन घेऊन निघालेला टँकर आशिया महामार्गावरुन भुसावळ नाहाटा चौफुली येथून जात असताना ट्रकचे लायनर अचानक जाम झाले व ट्रकने पेट घेतला़ पाहता-पाहता आगीच्या ज्वाला भडकू लागताच ट्रक चालक अमर बहादुरसिंग (सुलतानपूर, उत्तरप्रदेश) याने ट्रकबाहेर उडी घेतली. या ठिकाणच्या शहिद भगतसिंग ॲटो रिक्षा स्टॉपवरील चालकांच्या ही बाब लक्षात येताच त्यांनी पाणपोईवरील पाण्याची नळी घेत आग विझविण्यासाठी धडपड केली़
सतर्कतेमुळे टळला टँंकरचा स्फोट
By admin | Updated: May 3, 2014 19:16 IST