शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

अमळनेर तालुक्यातील १५ गावांना टँकरद्वारे पाणी पुरवठा होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 00:26 IST

अमळनेर तालुक्यातील १५ टंचाईग्रस्त गावांना ५ टँकरद्वारे गो क्षेत्र प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गो शाळा, पळासदडे रोड, अमळनेर व महावीर गोशाळा, शिरुड यांच्या माध्यमातून पाणी पुरवले जाणार आहे.

ठळक मुद्देसुरवातीला १५ टंचाईग्रस्त गावांना पाणी देण्याचे नियोजन गरजेप्रमाणे टँकरची संख्या व गावे वाढविली जातील.

अमळनेर : गो क्षेत्र प्रतिष्ठान संचलित श्रीमती भानुबेन बाबूलाल शाह गो शाळा, पळासदडे रोड, अमळनेर व महावीर गोशाळा, शिरुड यांच्या माध्यमातून टँकरद्वारे मोफत थेट गावांपर्यंत पिण्याचे पाणी वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ ३ रोजी तहसील कार्यालयाच्या परिसरात आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार साहेबराव पाटील व भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या हस्ते करण्यात आला.तालुक्यातील १५ टंचाईग्रस्त गावांना ५ टँकरद्वारे पाणी पुरवले जाणार आहे.श्री वर्धमान संस्कार धाम मुंबई यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबविण्यात येत असून चंद्रशेखर विजयजी म.सा. प्रेरित श्री सहस्रफणा पार्श्वनाथ चॅरिटेबल ट्रस्ट सुरत यांचे अनमोल सहकार्य उपक्रमास लाभत आहे. शुभारंभ प्रसंगी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष सचिन बाळू पाटील, गटनेते प्रविण पाठक, शेतकी संघाचे माजी संचालक संजय पुनाजी पाटील, नगरसेवक निशांत अग्रवाल, माजी उपनगराध्यक्ष अनिल महाजन, मंगरूळ येथील संदीप पाटील, गोक्षेत्र प्रतिष्ठानचे चेतन शाह, महेंद्र श्रीराम पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.यावेळी चेतन शाह यांनी माहिती देताना सांगितले की, अमळनेर तालुक्याची दुष्काळी परिस्थिती पाहता गुरांना पाणी मिळावे यासाठी दोन्ही गोशाळेच्या माध्यमातून व श्री वर्धमान संस्कार धाम मुंबई यांच्या प्रेरणेने हा उपक्रम राबवित आहे. यासाठी तूर्तास ५ टँकरची व्यवस्था करण्यात आली आहे. सद्यस्थितीत टँकरसाठी महिन्याचा खर्च ८० हजार रुपये असून जलपूजन झाल्यानंतर ११ गावांना हे टँकर पोहोचणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी गोक्षेत्र प्रतिष्ठानचे ताराचंद खोना, दिलीप डेरे, गणेश वाणी,पंकज दोधीवाला, भैय्या पाटील, सतीश वाणी, विक्रम पाटील, डॉ. निलेश मोरे, मीना शाह यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

टॅग्स :Waterपाणी