शहरं
Join us  
Trending Stories
1
"तो गौरीला म्हणायचा की, स्वतः मरेन आणि तुलाही यात अडकवेल"; गौरी यांच्या मामाचे अनंत गर्जेबद्दल स्फोटक दावे, दोघांमध्ये काय घडलं?
2
'न बोलण्यासारखं काही घडलेलं नाही'; CM फडणवीसांकडून महायुतीतील दुराव्याच्या चर्चांना पूर्णविराम
3
शेअर बाजारात पैशांचा पाऊस! टॉप १० पैकी ७ कंपन्यांना १.२८ लाख कोटींचा फायदा; सर्वाधिक कमाई कोणाची?
4
VIDEO : "मजाक बना रखा है टेस्ट क्रिकेट को..." अंपायरनं घड्याळ दाखवलं; मग कुलदीपवर भडकला पंत
5
बापरे! आईच्या दुधात आढळलं युरेनियम, ६ जिल्ह्यांत ४० केस; नवजात बाळांना कॅन्सरचा मोठा धोका
6
बिहार निवडणूक निकाल २०२५ वर प्रशांत किशोर पुन्हा बोलले; म्हणाले, “महिलांना १० हजार...”
7
Senuran Muthusamy Maiden Test Century : मुथुसामीचा मोठा पराक्रम! ऐतिहासिक कसोटीत ठोकली पहिली सेंच्युरी
8
तुमच्या PAN कार्डवर कुणी कर्ज तर घेतले नाही ना? टीव्ही अभिनेत्यासोबत झाली मोठी फसवणूक; इथे तपासा
9
निवडणूक आयोगाचा चमत्कार; SIR अभियानाच्या एका फोन कॉलने जुळली ३७ वर्षांपूर्वी तुटलेली नाती
10
१६ वर्षांची साथ एका क्षणात सुटली... तेजस क्रॅशमधील विंग कमांडरच्या मृत्यूने पत्नीला मोठा धक्का
11
"मी घाबरून ३१व्या मजल्यावरील खिडकीतून..."; पत्नी गौरी पालवेंनी आयुष्य संपवले, गंभीर आरोपांवर अनंत गर्जे काय म्हणाले?
12
Sushma Andhare : "प्रिय उदयभाऊ, उपमुख्यमंत्री पदाची तुमची सुप्त महत्वकांक्षा मी..."; सुषमा अंधारेंचा खोचक टोला
13
टीम इंडियाचा स्टार खेळाडू पुन्हा मैदानात ! तब्बल १ वर्षानंतर खेळताना दिसणार क्रिकेट सामना
14
मार्गशीर्ष विनायक चतुर्थी २०२५: वरदान देईल गणपती, अर्पण करा ५ गोष्टी; कसा कराल व्रत विधी?
15
शिंदेसेनेचे आमदार निलेश राणेंची BJP प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांवर आगपाखड, संतापून म्हणाले...
16
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना हवे तसे यश, कामे होतील; उसनवारी परत मिळेल, कोणाला कठीण काळ?
17
IND vs SA 2nd Test : जड्डूची चतुराई अन् पंतची चपळाई! सेट झालेली जोडी फुटली, पण... (VIDEO)
18
"बिकिनीपेक्षा तरी मी खूप जास्त कपडे घातले होते...", 'आशिक बनाया आपने' गाण्याबद्दल तनुश्री दत्ताचं वक्तव्य, म्हणाली...
19
शेअर मार्केट, रियल इस्टेट क्रॅश येणार? रॉबर्ट कियोसाकींचा मोठा इशारा; 'या' क्षेत्रात गुंतवणुकीचा सल्ला
20
भाजपा नगराध्यक्ष उमेदवाराच्या घरात मुस्लीम मतदार कुठून आले?; निलेश राणेंचा खळबळजनक दावा
Daily Top 2Weekly Top 5

लागला टकळा पंढरीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 00:04 IST

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे सर्वच आयाम बदलत आहेत. येणारा काळ हा आपल्या कसोटीचा काळ असणार आहे. समाज, संस्कृती, धर्म, ...

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे सर्वच आयाम बदलत आहेत. येणारा काळ हा आपल्या कसोटीचा काळ असणार आहे. समाज, संस्कृती, धर्म, शिक्षण, राजकारण, अर्थकारण, कुटुंब व्यवस्था अशा सर्व अंगांनी आपली जगण्याची शैली बदलणार आहे. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातल्या बदलाचा एक झटका बसला तो आपल्या वर्षानुवर्षाच्या वारकरी परंपरेच्या श्रीक्षेत्र पंढरपूर वारीला. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पंढरीच्या वाटेवर चालणारा भाविक समाज आज अगतिक होऊन घरी बसला आहे.जावे पंढरीसी आवडी मनासी । कई एकादशी आषाढी हे । अशा आर्त भावाने पंढरीचा टकळा लागलेला पांडुरंगाचा भक्त निराश, उदास अवस्थेत त्या पांडुरंगालाच हे संकट निवारण्यासाठी साकडे घालतो आहे. मोजक्या संख्येने वारीला, कथा, कीर्तनाला परवानगी द्यावी म्हणून शासनाला विनवण्या करतो आहे. हेही दिवस जातील, संकटदेखील निवारण होईल. मळभ दूर होईल. आकाश मोकळे होईल. अंधाराचे जाळे फिटलेले असेल. त्या बदललेल्या काळात या संपूर्ण व्यवस्थेची पुनर्मांडणी करावी लागणार आहे. गेल्या काही वर्षातील वारीचे दिवस आठवा.पंढरपूरला जमलेला माणसांचा महासागर! प्रवासात होणारे अपघात, बळींची आकडे इ. इ. अलिकडे वारी हा ‘इव्हेंट’ होऊन गेला होता. वारीच नव्हे तर विवाह, वाढदिवसापासून मृत्यूपर्यंत तुमच्या-माझ्या घरातल्या कौटुंबिक कार्यक्रमापासून ते मंत्र्यांच्या शपथविधीपासून-सत्संगापर्यंत सर्वच सार्वजनिक कार्यक्रम गर्दी जमवून, गाजावाजा करत भव्यदिव्यतेबाबत स्पर्धा करत साजरे करण्याची फॅशन बनली होती. अगदी कोरोनाचे काही तासांचे लॉकडाऊनही आम्ही टाळ्या, थाळ्या नि फटाके वाजवून साजरे केले, यातच सर्व काही आले.न्यायमूर्ती वासकर यांनी फडपरंपरेच्या पायी वारीची आठवण सांगताना एकदा असे म्हटले होते की, ‘आमच्या बालपणी मोठ्यांच्या खांद्यावर बसून पाहिले तरी माऊलींच्या पालखीतील दिंड्यांचे पहिले आणि शेवटचे टोक सहज दिसत असे! काळासोबत वारी वाढली पण ‘भक्ती’ कमी झाली. इव्हेंट अधिक झाला.गर्दी वाढली गुणवत्ता कमी झाली. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात क्वालिटीपेक्षा क्वांटिटीला आलेले हे महत्व चिंताजनक आहे. आज कोरोनाच्या निमित्ताने का होईना; पन्नास जणांच्या उपस्थितीत विवाह समारंभ होऊ लागले आणि पाच पंचवीस भाऊबंद एखादा मृताला अखेरचा निरोप देऊ लागले आहेत. पायवारीने प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्यापेक्षा मानसवारी करुन दर्शनाचे पुण्य पदरी पाडूया. अनावश्यक आणि अतिरिक्त गर्दी करुन पर्यावरणाचे प्रश्न बिकट करण्यापेक्षा घरी राहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकमेकांच्या संपर्कात राहूया. पांडुरंगाचे दर्शनही मला आॅनलाईन घेता येईल. जवळून घेता येईल. वारंवार घेता येईल. तिथे जाऊनच माझी भक्ती सिद्ध होईल, असे थोडेच आहे? अश्या मानसवारीसाठी सर्वांना रामकृष्ण हरी!!!-प्रा. सी. एस. पाटील, धरणगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव