शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
2
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
3
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
4
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
5
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
6
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
7
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
8
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
9
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
10
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
11
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
12
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
13
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
14
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
15
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
16
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
17
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
18
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
19
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
20
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा

लागला टकळा पंढरीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 00:04 IST

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे सर्वच आयाम बदलत आहेत. येणारा काळ हा आपल्या कसोटीचा काळ असणार आहे. समाज, संस्कृती, धर्म, ...

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे सर्वच आयाम बदलत आहेत. येणारा काळ हा आपल्या कसोटीचा काळ असणार आहे. समाज, संस्कृती, धर्म, शिक्षण, राजकारण, अर्थकारण, कुटुंब व्यवस्था अशा सर्व अंगांनी आपली जगण्याची शैली बदलणार आहे. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातल्या बदलाचा एक झटका बसला तो आपल्या वर्षानुवर्षाच्या वारकरी परंपरेच्या श्रीक्षेत्र पंढरपूर वारीला. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पंढरीच्या वाटेवर चालणारा भाविक समाज आज अगतिक होऊन घरी बसला आहे.जावे पंढरीसी आवडी मनासी । कई एकादशी आषाढी हे । अशा आर्त भावाने पंढरीचा टकळा लागलेला पांडुरंगाचा भक्त निराश, उदास अवस्थेत त्या पांडुरंगालाच हे संकट निवारण्यासाठी साकडे घालतो आहे. मोजक्या संख्येने वारीला, कथा, कीर्तनाला परवानगी द्यावी म्हणून शासनाला विनवण्या करतो आहे. हेही दिवस जातील, संकटदेखील निवारण होईल. मळभ दूर होईल. आकाश मोकळे होईल. अंधाराचे जाळे फिटलेले असेल. त्या बदललेल्या काळात या संपूर्ण व्यवस्थेची पुनर्मांडणी करावी लागणार आहे. गेल्या काही वर्षातील वारीचे दिवस आठवा.पंढरपूरला जमलेला माणसांचा महासागर! प्रवासात होणारे अपघात, बळींची आकडे इ. इ. अलिकडे वारी हा ‘इव्हेंट’ होऊन गेला होता. वारीच नव्हे तर विवाह, वाढदिवसापासून मृत्यूपर्यंत तुमच्या-माझ्या घरातल्या कौटुंबिक कार्यक्रमापासून ते मंत्र्यांच्या शपथविधीपासून-सत्संगापर्यंत सर्वच सार्वजनिक कार्यक्रम गर्दी जमवून, गाजावाजा करत भव्यदिव्यतेबाबत स्पर्धा करत साजरे करण्याची फॅशन बनली होती. अगदी कोरोनाचे काही तासांचे लॉकडाऊनही आम्ही टाळ्या, थाळ्या नि फटाके वाजवून साजरे केले, यातच सर्व काही आले.न्यायमूर्ती वासकर यांनी फडपरंपरेच्या पायी वारीची आठवण सांगताना एकदा असे म्हटले होते की, ‘आमच्या बालपणी मोठ्यांच्या खांद्यावर बसून पाहिले तरी माऊलींच्या पालखीतील दिंड्यांचे पहिले आणि शेवटचे टोक सहज दिसत असे! काळासोबत वारी वाढली पण ‘भक्ती’ कमी झाली. इव्हेंट अधिक झाला.गर्दी वाढली गुणवत्ता कमी झाली. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात क्वालिटीपेक्षा क्वांटिटीला आलेले हे महत्व चिंताजनक आहे. आज कोरोनाच्या निमित्ताने का होईना; पन्नास जणांच्या उपस्थितीत विवाह समारंभ होऊ लागले आणि पाच पंचवीस भाऊबंद एखादा मृताला अखेरचा निरोप देऊ लागले आहेत. पायवारीने प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्यापेक्षा मानसवारी करुन दर्शनाचे पुण्य पदरी पाडूया. अनावश्यक आणि अतिरिक्त गर्दी करुन पर्यावरणाचे प्रश्न बिकट करण्यापेक्षा घरी राहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकमेकांच्या संपर्कात राहूया. पांडुरंगाचे दर्शनही मला आॅनलाईन घेता येईल. जवळून घेता येईल. वारंवार घेता येईल. तिथे जाऊनच माझी भक्ती सिद्ध होईल, असे थोडेच आहे? अश्या मानसवारीसाठी सर्वांना रामकृष्ण हरी!!!-प्रा. सी. एस. पाटील, धरणगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव