शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
3
IND vs PAK : खूप मजा आली... अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
4
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
5
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
8
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
9
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
10
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
11
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
12
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
13
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
14
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
15
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
16
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
17
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
18
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
19
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
20
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप

लागला टकळा पंढरीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 00:04 IST

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे सर्वच आयाम बदलत आहेत. येणारा काळ हा आपल्या कसोटीचा काळ असणार आहे. समाज, संस्कृती, धर्म, ...

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे सर्वच आयाम बदलत आहेत. येणारा काळ हा आपल्या कसोटीचा काळ असणार आहे. समाज, संस्कृती, धर्म, शिक्षण, राजकारण, अर्थकारण, कुटुंब व्यवस्था अशा सर्व अंगांनी आपली जगण्याची शैली बदलणार आहे. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातल्या बदलाचा एक झटका बसला तो आपल्या वर्षानुवर्षाच्या वारकरी परंपरेच्या श्रीक्षेत्र पंढरपूर वारीला. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पंढरीच्या वाटेवर चालणारा भाविक समाज आज अगतिक होऊन घरी बसला आहे.जावे पंढरीसी आवडी मनासी । कई एकादशी आषाढी हे । अशा आर्त भावाने पंढरीचा टकळा लागलेला पांडुरंगाचा भक्त निराश, उदास अवस्थेत त्या पांडुरंगालाच हे संकट निवारण्यासाठी साकडे घालतो आहे. मोजक्या संख्येने वारीला, कथा, कीर्तनाला परवानगी द्यावी म्हणून शासनाला विनवण्या करतो आहे. हेही दिवस जातील, संकटदेखील निवारण होईल. मळभ दूर होईल. आकाश मोकळे होईल. अंधाराचे जाळे फिटलेले असेल. त्या बदललेल्या काळात या संपूर्ण व्यवस्थेची पुनर्मांडणी करावी लागणार आहे. गेल्या काही वर्षातील वारीचे दिवस आठवा.पंढरपूरला जमलेला माणसांचा महासागर! प्रवासात होणारे अपघात, बळींची आकडे इ. इ. अलिकडे वारी हा ‘इव्हेंट’ होऊन गेला होता. वारीच नव्हे तर विवाह, वाढदिवसापासून मृत्यूपर्यंत तुमच्या-माझ्या घरातल्या कौटुंबिक कार्यक्रमापासून ते मंत्र्यांच्या शपथविधीपासून-सत्संगापर्यंत सर्वच सार्वजनिक कार्यक्रम गर्दी जमवून, गाजावाजा करत भव्यदिव्यतेबाबत स्पर्धा करत साजरे करण्याची फॅशन बनली होती. अगदी कोरोनाचे काही तासांचे लॉकडाऊनही आम्ही टाळ्या, थाळ्या नि फटाके वाजवून साजरे केले, यातच सर्व काही आले.न्यायमूर्ती वासकर यांनी फडपरंपरेच्या पायी वारीची आठवण सांगताना एकदा असे म्हटले होते की, ‘आमच्या बालपणी मोठ्यांच्या खांद्यावर बसून पाहिले तरी माऊलींच्या पालखीतील दिंड्यांचे पहिले आणि शेवटचे टोक सहज दिसत असे! काळासोबत वारी वाढली पण ‘भक्ती’ कमी झाली. इव्हेंट अधिक झाला.गर्दी वाढली गुणवत्ता कमी झाली. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात क्वालिटीपेक्षा क्वांटिटीला आलेले हे महत्व चिंताजनक आहे. आज कोरोनाच्या निमित्ताने का होईना; पन्नास जणांच्या उपस्थितीत विवाह समारंभ होऊ लागले आणि पाच पंचवीस भाऊबंद एखादा मृताला अखेरचा निरोप देऊ लागले आहेत. पायवारीने प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्यापेक्षा मानसवारी करुन दर्शनाचे पुण्य पदरी पाडूया. अनावश्यक आणि अतिरिक्त गर्दी करुन पर्यावरणाचे प्रश्न बिकट करण्यापेक्षा घरी राहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकमेकांच्या संपर्कात राहूया. पांडुरंगाचे दर्शनही मला आॅनलाईन घेता येईल. जवळून घेता येईल. वारंवार घेता येईल. तिथे जाऊनच माझी भक्ती सिद्ध होईल, असे थोडेच आहे? अश्या मानसवारीसाठी सर्वांना रामकृष्ण हरी!!!-प्रा. सी. एस. पाटील, धरणगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव