शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

लागला टकळा पंढरीचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2020 00:04 IST

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे सर्वच आयाम बदलत आहेत. येणारा काळ हा आपल्या कसोटीचा काळ असणार आहे. समाज, संस्कृती, धर्म, ...

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर जीवनाचे सर्वच आयाम बदलत आहेत. येणारा काळ हा आपल्या कसोटीचा काळ असणार आहे. समाज, संस्कृती, धर्म, शिक्षण, राजकारण, अर्थकारण, कुटुंब व्यवस्था अशा सर्व अंगांनी आपली जगण्याची शैली बदलणार आहे. धार्मिक, अध्यात्मिक क्षेत्रातल्या बदलाचा एक झटका बसला तो आपल्या वर्षानुवर्षाच्या वारकरी परंपरेच्या श्रीक्षेत्र पंढरपूर वारीला. दरवर्षी लाखोंच्या संख्येने पंढरीच्या वाटेवर चालणारा भाविक समाज आज अगतिक होऊन घरी बसला आहे.जावे पंढरीसी आवडी मनासी । कई एकादशी आषाढी हे । अशा आर्त भावाने पंढरीचा टकळा लागलेला पांडुरंगाचा भक्त निराश, उदास अवस्थेत त्या पांडुरंगालाच हे संकट निवारण्यासाठी साकडे घालतो आहे. मोजक्या संख्येने वारीला, कथा, कीर्तनाला परवानगी द्यावी म्हणून शासनाला विनवण्या करतो आहे. हेही दिवस जातील, संकटदेखील निवारण होईल. मळभ दूर होईल. आकाश मोकळे होईल. अंधाराचे जाळे फिटलेले असेल. त्या बदललेल्या काळात या संपूर्ण व्यवस्थेची पुनर्मांडणी करावी लागणार आहे. गेल्या काही वर्षातील वारीचे दिवस आठवा.पंढरपूरला जमलेला माणसांचा महासागर! प्रवासात होणारे अपघात, बळींची आकडे इ. इ. अलिकडे वारी हा ‘इव्हेंट’ होऊन गेला होता. वारीच नव्हे तर विवाह, वाढदिवसापासून मृत्यूपर्यंत तुमच्या-माझ्या घरातल्या कौटुंबिक कार्यक्रमापासून ते मंत्र्यांच्या शपथविधीपासून-सत्संगापर्यंत सर्वच सार्वजनिक कार्यक्रम गर्दी जमवून, गाजावाजा करत भव्यदिव्यतेबाबत स्पर्धा करत साजरे करण्याची फॅशन बनली होती. अगदी कोरोनाचे काही तासांचे लॉकडाऊनही आम्ही टाळ्या, थाळ्या नि फटाके वाजवून साजरे केले, यातच सर्व काही आले.न्यायमूर्ती वासकर यांनी फडपरंपरेच्या पायी वारीची आठवण सांगताना एकदा असे म्हटले होते की, ‘आमच्या बालपणी मोठ्यांच्या खांद्यावर बसून पाहिले तरी माऊलींच्या पालखीतील दिंड्यांचे पहिले आणि शेवटचे टोक सहज दिसत असे! काळासोबत वारी वाढली पण ‘भक्ती’ कमी झाली. इव्हेंट अधिक झाला.गर्दी वाढली गुणवत्ता कमी झाली. जीवनाच्या सर्वच क्षेत्रात क्वालिटीपेक्षा क्वांटिटीला आलेले हे महत्व चिंताजनक आहे. आज कोरोनाच्या निमित्ताने का होईना; पन्नास जणांच्या उपस्थितीत विवाह समारंभ होऊ लागले आणि पाच पंचवीस भाऊबंद एखादा मृताला अखेरचा निरोप देऊ लागले आहेत. पायवारीने प्रत्यक्ष पंढरपूरला जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेण्यापेक्षा मानसवारी करुन दर्शनाचे पुण्य पदरी पाडूया. अनावश्यक आणि अतिरिक्त गर्दी करुन पर्यावरणाचे प्रश्न बिकट करण्यापेक्षा घरी राहून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने एकमेकांच्या संपर्कात राहूया. पांडुरंगाचे दर्शनही मला आॅनलाईन घेता येईल. जवळून घेता येईल. वारंवार घेता येईल. तिथे जाऊनच माझी भक्ती सिद्ध होईल, असे थोडेच आहे? अश्या मानसवारीसाठी सर्वांना रामकृष्ण हरी!!!-प्रा. सी. एस. पाटील, धरणगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव