शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन गांभीर्याने करा, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका!

By अमित महाबळ | Updated: October 12, 2023 20:13 IST

विधी महाविद्यालयांचे प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, सहयोगी अधिष्ठाता व शिक्षक प्रतिनिधी यांची बैठक गुरुवारी विद्यापीठात घेण्यात आली.

जळगाव : विधी शाखेच्या विद्यापीठाकडून होणाऱ्या प्रत्येक सत्राच्या परीक्षेआधी महाविद्यालयांनी प्राथमिक पूर्व परीक्षा (प्रिलीम) घ्यावी, तसेच विद्यार्थ्यांची महाविद्यालयात तासिकांना उपस्थिती बंधनकारक करावी असे निर्देश कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी यांच्या मुख्य उपस्थितीत झालेल्या बैठकीत देण्यात आले. प्राध्यापकांनी मूल्यांकन गांभीर्याने करावे, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. विधी महाविद्यालयांचे प्राचार्य, व्यवस्थापन प्रतिनिधी, सहयोगी अधिष्ठाता व शिक्षक प्रतिनिधी यांची बैठक गुरुवारी विद्यापीठात घेण्यात आली.

परीक्षा प्रक्रियेशी संबंधित कामकाज सुरुळीत व्हावे, तसेच कॉपीचे समूळ उच्चाटन व्हावे या हेतूने कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने पुढाकार घेतला असून, त्याचाच एक भाग म्हणून गुरुवारी, विधी शाखेशी निगडीत प्राचार्य, शिक्षक प्रतिनिधी आणि विधी महाविद्यालयांचे व्यवस्थापन प्रतिनिधी यांची बैठक झाली. या बैठकीस कुलगुरु प्रा. व्ही. एल. माहेश्वरी, प्र-कुलगुरु प्रा. एस. टी. इंगळे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक प्रा. योगेश पाटील, कुलसचिव डॉ. विनोद पाटील, माजी संचालक प्रा. दीपक दलाल यांनी मार्गदर्शन केले. यावेळी झालेल्या चर्चेत सहयोगी अधिष्ठाता प्राचार्य डॉ.व्ही.वाय.बहिरम, प्राचार्य डॉ.युवाकुमार रेड्डी, संस्थाचालकांचे प्रतिनिधी ॲड. प्रवीणचंद्र जंगले यांनी भाग घेतला. सूत्रसंचालन डॉ.मुनाफ शेख यांनी केले. व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. महेंद्र रघुवंशी,  डॉ. व्ही. एच. पाटील, डॉ. एन. डी. चौधरी, डॉ. आर. एन. मकासरे, डॉ. विजेता सिंग, डॉ. साजेदा शेख,  एस. जी. गाडगे, डॉ. किर्ती पाटील, प्रा. विद्या पाटील, मिलिंद कुलकर्णी, के. सी. पाटील, वसंत वळवी आदी उपस्थित होते.

गुणवत्तेशी तडजोड करू नकाप्रा. योगेश पाटील यांनी परीक्षेशी निगडीत अध्यादेशाची सविस्तर माहिती बैठकीत दिली. कॉपी केल्यास कोणत्या शिक्षा होऊ शकतात याची माहिती विद्यार्थ्यांना द्यावी. यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन प्रा.दीपक दलाल यांनी केले. समारोपप्रसंगी कुलगुरुंनी गुणवत्तेशी तडजोड न करता शिक्षकांनी सामूहिक जबाबदारीची भावना बाळगून काम करावे. विद्यार्थ्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले.  

 महाविद्यालयांना सूचना - विद्यापीठाच्या परीक्षा होण्याआधी प्रत्येक सत्रात महाविद्यालयांनी प्रिलीम परीक्षा घ्यावी. - सोडवलेली उत्तरपत्रिका विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष दाखवून ती कशी सोडवली व कशी सोडविणे अपेक्षित आहे याची माहिती द्या- तासिकांना पूर्ण वेळ उपस्थित राहणे विद्यार्थ्यांना बंधनकारक करावे. - विद्यार्थ्यांच्या उपस्थितीची नोंदवही महाविद्यालयांनी ठेवावी 

निकाल बदलताहेत, विद्यापीठाची प्रतिमा जपागेल्या काही महिन्यांपासून वारंवार विधी शाखेचे विद्यार्थी निकालाबाबत तक्रारी करीत आहेत. रिड्रेसलमध्ये त्यांच्या निकालात फरक पडत आहे. त्यामुळे या बैठकीत प्राध्यापकांनी मूल्यांकन गांभीर्याने करावे. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नये, विद्यापीठाची प्रतिमा खराब होणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच रिड्रेसल, फोटोकॉपी या विषयीचे नियम आणि विद्यापीठाचे कामकाज याबाबत विद्यार्थ्यांना कल्पना द्यावी, असे आवाहन कुलगुरुंनी या बैठकीत केले. 

टॅग्स :Jalgaonजळगाव