शहरं
Join us  
Trending Stories
1
अपघातातील मृत ४२ भारतीयांचे मृतदेह भारतात आणू शकत नाही?; सौदीचा 'हा' नियम ठरतोय अडथळा
2
सौदी अरेबियातील बस अपघातात ४२ भारतीयांचा मृत्यू झाल्याची भीती, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले दु:ख, माहिती गोळा करण्याचे दिले निर्देश
3
भावाचा हातात हात, तोंडावर मास्क, हात उंचावून अभिवादन; आजारपणातही संजय राऊत बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर
4
"बाळासाहेबांची प्रतिमा चोरून हिंदुत्वाचे वारस म्हणून मतं मागणाऱ्यांची..."; राज ठाकरेंचे 'फटकारे', कुणावर डागली तोफ?
5
Rohini Acharya : "कुटुंबात एक विषारी माणूस..."; लालू प्रसाद यादवांची लेक रोहिणी आचार्य यांची आणखी एक पोस्ट
6
"मी हे मान्यच करू शकत नाही..."; टीम इंडियाच्या पराभवानंतर चेतेश्वर पुजाराने चांगलंच सुनावलं
7
५ वर्षांत ५३०० टक्के रिटर्न; आता 'हा' शेअर पुन्हा सुस्साट! सातत्यानं लागतंय अपर सर्किट, कारण काय?
8
भारताचा अमेरिकेसोबत ऐतिहासिक LPG करार; घरगुती गॅस सिलिंडरची किंमत कमी होणार?
9
Protest: आधी ‘शेल्टर’ची व्यवस्था करा, नंतरच श्वानांना हात लावा; प्राणीमित्र संघटना रस्त्यावर!
10
गौतम अदानी आणताहेत देशातील सर्वात मोठा राइट्स इश्यू; ७१६ रुपये स्वस्त मिळतोय शेअर, पाहा डिटेल्स
11
खळबळजनक! थारसाठी पत्नीची हत्या, हुंड्यासाठी पती झाला हैवान; भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
12
SIR च्या कामाचा भार असह्य; वरिष्ठाच्या धमक्यांना कंटाळून शिक्षकाची रेल्वेखाली उडी, एकाच दिवशी दोन कर्मचाऱ्यांचे टोकाचे पाऊल
13
Ritual: पानाच्या टपरीवर का असते शंकराची पितळी मूर्ती? धार्मिक मान्यता की आणखी काही?
14
सौदी अरेबियात भीषण अपघात, ४२ भारतीयांचा मृत्यू; प्रवासी बस डिझेल टँकरला धडकली, आगीचा उडाला भडका
15
सुश्मिता सेनने पूर्ण शुद्धीत राहूनच केलेली अँजिओप्लास्टी, दोन वर्षांपूर्वी आलेला हार्टॲटॅक
16
काँगोमधील तांब्याच्या खाणीत मोठी दुर्घटना; पूल कोसळून ३२ जणांचा मृत्यू, अनेक जण अजूनही बेपत्ता
17
आई वडिलांची एक चूक नडली, मुलाला झाला गंभीर आजार; हाताचे बोट कापावे लागले, कारण काय?
18
टॅक्स भरणे झाले सोपे! बँक, नेट बँकिंगचा झंझट नाही; आता UPI ॲपद्वारे मिनिटांत भरा प्राप्तीकर
19
पालघर साधू हत्याकांडात आरोप केले, त्यालाच पक्षात घेतले? चौफेर टीका होताच भाजपानं दिलं असं स्पष्टीकरण
20
देवेंद्र फडणवीसांना भेटला, सत्कार करून घेतला; पंतप्रधान कार्यालयात सचिव म्हणणारा निघाला...
Daily Top 2Weekly Top 5

नशिराबादकरांवर पाणीटंचाईची टांगती तलवार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 04:43 IST

नशिराबाद: वर्षानुवर्षांपासून नशिराबादकरांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. १६ कोटींची पाणी योजनाही शापितच ठरली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची पातळी ...

नशिराबाद: वर्षानुवर्षांपासून नशिराबादकरांना पाणीटंचाईच्या झळा बसत आहे. १६ कोटींची पाणी योजनाही शापितच ठरली आहे. गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्त्रोताची पातळी खोलवर गेल्याने पाणीटंचाईची झळ दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे हाल होत असून याकडे कोण लक्ष देणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

भूगर्भातील जल पातळी खोलवर जाणे, पुरेशी यंत्रणा नसणे याबाबी कायमच असतात. त्यामुळे येथे ६ दिवसांआड पाणीपुरवठा होतो. वेळप्रसंगी महिन्यातून तीन ते चार वेळेस पाणी मिळते. ग्रामपंचायतने शुद्ध पाण्यासाठी आरो प्रणाली योजना सुरू केली. त्यामुळे ग्रामस्थांना अल्प दरात शुद्ध पाणी मिळू लागले. पण त्याचेही थकीत वीज बिल न भरल्यामुळे शुद्ध पाणीही मिळणे बंद झाले. त्यामुळे आता ग्रामस्थांच्या नशिबी पाण्यासाठी वणवण आहेच. सहा ते सात दिवसांपर्यंत पाण्याची वाट पाहावी लागते. शुद्ध पाणीपुरवठा करणारे आरओ प्रणाली केंद्रही थकबाकीमुळे वीज खंडित केल्याने बंद आहे. पाणीटंचाईचे ग्रहण आता संपणार तरी कधी? मे महिन्यात पाणी मिळेल की नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सुमारे ५० हजार लोकसंख्येचे तालुक्यातील ऐतिहासिक गाव म्हणून नशिराबादची ओळख आहे. मात्र येथे अनेक वर्षांपासून पाणी टंचाईची झळ ग्रामस्थांना बसत आहे. बेळी वाघूर, मुर्दापूर धरणासह गावातील स्थानिक जलस्त्रोतातून गावकऱ्यांची तहान भागविण्यात येते. वर्षानुवर्षापासून होत असलेल्या या टंचाईवर मात करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना नसल्याने ग्रामस्थ हैराण झाले होते. त्यावर मात करण्यासाठी सुमारे १६ कोटी रुपयांची जलशुद्धीकरण योजना करण्यात आली. शेळगाव बॅरेज येथून पाणी नशिराबादला आणून शुद्धीकरण करीत गावाला पुरवठा करण्याची योजना आहे. नियमित शुद्ध व मुबलक पाणीपुरवठा गावाला होईल, असा गाजावाजा करीत मोठ्या थाटात योजना कार्यान्वित करण्यात आली. योजना कार्यान्वित झाल्यापासून अनेक अडचणी, विघ्नांचा सामना करीत गावाला पाणी मिळाले. मात्र योजनेचा काही महिन्यातच फज्जा उडाला.त्यामुळे योजना अपयशी ठरली आहे.

वाघूर बेळी मुर्दापूर धरण केंद्राजवळील जलस्त्रोत मोठ्या प्रमाणात खोलवर गेला आहे.त्यातच मुर्दापूर धरणाजवळील जलस्त्रोताची भूजल पातळी खोल गेल्याने पाणीपुरवठा व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. त्यातच शेळगाव बॅरेज इथून होणारा पाणीपुरवठा जलपातळी खोलवर गेल्याने टंचाईची भीषणता दिवसेंदिवस वाढू लागली आहे. सद्या सहा ते सात दिवसांनी पाणी मिळत आहे आणि टंचाईवर मात करण्यासाठी दरवर्षी वाघूरचे आवर्तन सोडण्यात येते.

आता पाण्याचे खापर कुणाच्या डोक्यावर?

आतापर्यंत मजीप्रा पाणीपुरवठा जलशुद्धीकरण योजनेचा चालवत होती. त्यावेळी अनेकदा अडचणी येऊन शुद्ध पाणीपुरवठा झालाच नाही त्यामुळे अनेकदा लोकप्रतिनिधींनी पाणीपुरवठ्यात येणाऱ्या विघ्नांचे खापर मजीप्रावर फोडले. नियोजनाचा अभाव व अपूर्ण यंत्रणेमुळे पाणी समस्या कायमच राहिली मात्र आता ग्रामपंचायतच्या हातात योजना आली आहे. तरीही शुद्ध पाणीपुरवठा गावकऱ्यांना का मिळत नाही असा उपहासात्मक प्रश्न आता गावात चर्चिला जात आहे. आता पाणी खापर कोणाच्या डोक्यावर? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

विकतचे पाणी...

टंचाईमुळे पाण्यासाठी हाल होत आहे अनेक जण जारचे विकतचे पाणी घेताना दिसत आहे. सुमारे २० ते ३० रुपयांपर्यंत मिळत आहे. पाणी जारला वाढती मागणी आहे

आरो केंद्र बंद...वीज कापली

ग्रामस्थांना शुद्ध व थंड पाणी मिळावे याकरिता ग्रामपंचायतीने पाच रुपयांमध्ये शुद्ध पाण्याची व्यवस्था केली आहे. त्यातही ग्रामपंचायतीच्या आरो प्रणाली केंद्राची वीज बिले थकल्यामुळे गावातील आरो प्रणाली केंद्र बंद अवस्थेत आहे त्यामुळे ग्रामस्थांना अल्पदरात मिळणारे शुद्ध पाणीसुद्धा पुरवण्यात ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे. सुमारे १५ लाखांच्या घरात वीज थकबाकी बिल आहे.

भाग्य उजळणार कधी....

प्रत्येक निवडणुकीत पाणी प्रश्नाला प्राधान्य देऊ, असे आश्वासन देऊन मतांचा जोगवा मागण्यात येतो. निवडून आल्यावर आश्वासन विसरले जाते. पाणीटंचाई आणि नशिराबाद हे समीकरण बदलणार केव्हा? पाणीटंचाईची ओरड लक्षात घेता तत्काळ उपाययोजना व्हावी. अनेकदा पाणी समस्येबाबत आश्वासने मिळाली. मात्र आजपर्यंत टंचाई कायम आहे. मतांचा जोगवा मागणाऱ्यांनो पाणी..... द्या अशी आर्त हाक ग्रामस्थ देत आहे. आतातरी नशिराबादकरांचे भाग्य उजळणार का? हा प्रश्न चर्चिला जात आहे.