शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

पाचोरा येथे वर्षश्राद्धाऐवजी गरिबांना दिले गोड भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2019 18:06 IST

अलीकडच्या काळात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची वृत्ती विकसित होत असताना कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या मृत्यूनंतरही वर्षभर विविध विधी केले जातात, त्यासाठीही प्रचंड पैसा व वेळ खर्ची घातला जातो, परंतु येथील मोरे कुटुंबीयांनी प्रा.हिंमत मोरे यांचा वर्षश्राद्ध विधी आणि भोजन यासाठी खर्च न करता त्या पैशातून आधारवड केंद्रात गोरगरीब व भुकेल्यांना मिष्टान्न भोजन दिले.

ठळक मुद्देमोरे कुटुंबियांचा स्तुत्य उपक्रमवर्षभर होणाऱ्या विविध विधींना दिला फाटाआधारवड केंद्रात दिले मिष्ठान्न

पाचोरा, जि.जळगाव : अलीकडच्या काळात विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून आपल्या श्रीमंतीचे प्रदर्शन करण्याची वृत्ती विकसित होत असताना कुटुंबातील एखाद्या सदस्यांच्या मृत्यूनंतरही वर्षभर विविध विधी केले जातात, त्यासाठीही प्रचंड पैसा व वेळ खर्ची घातला जातो, परंतु येथील मोरे कुटुंबीयांनी प्रा.हिंमत मोरे यांचा वर्षश्राद्ध विधी आणि भोजन यासाठी खर्च न करता त्या पैशातून आधारवड केंद्रात गोरगरीब व भुकेल्यांना मिष्टान्न भोजन दिले. या उपक्रमाचे कौतुक होत आहे.येथील एम.एम.कनिष्ठ महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्रा.हिंमत मोरे यांचे गेल्या वर्षी निधन झाले होते. १९ रोजी त्यांचे वर्ष श्राध्द होते. त्यांच्या कुटुंबीयांनी वर्षा श्राद्धानिमित्ताने पितरांना भोजन व इतर कोणत्याही विधीसाठी पैसा खर्च न करता त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून आधारवड केंद्रात गोरगरिबांना वरण-भात, पुरी, उसळ, जिलेबी, शेव असे भोजन दिले. यावेळी आशा मोरे, भाग्येश मोरे, प्रमिला मोरे, प्रा.कल्पना जंगम, प्रा.अरविंद जंगम यांच्यासह आधारवड केंद्राचे प्रवीण पाटील, महेंद्र अग्रवाल, भूषण देशमुख, राहुल पाटील, मतीन संदानशिव, रवी देवरे, बबलू पाटील, लक्ष्मण पाटील, गणेश सोनार, गजेंद्र गुढेकर आदी उपस्थित होते. मोरे कुटुंबियांच्या या आदर्श उपक्रमाचे कौतुक होत आहे. 

टॅग्स :SocialसामाजिकPachoraपाचोरा