शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

भोवतालच्या वास्तवाने लिहिता झालो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2018 17:46 IST

‘लोकमत’च्या ‘वीकेण्ड स्पेशल’मध्ये ‘माझी लेखन प्रेरणा’ या सदरात साहित्यिक प्रा.डॉ.रमेश माने यांनी सांगितलेला आपला लेखन प्रवास.

आम्हाला कोळगावच्या गोपीचंद पुना पाटील माध्यमिक शाळेत मराठी शिकवायला डी.एस.पाटील नावाचे शिक्षक होते. ते कविता खूप छान शिकवायचे. छंदोबद्ध कविता असेल तर ते अतिशय सुंदर चाल लावून ऐकवायचे, शिकवायचे. मग आम्ही मुलं त्या कविता पाठ करायचो. चाल लावून म्हणायचो. त्यानंतर कवितेचा नादच लागला होता. तेव्हापासून कविता मनात रुंजी घालत होती. घरी रेडिओ असल्यामुळे आकाशवाणीवरील मराठी कवितांचा कार्यक्रम, मराठी गाणी वगैरे यांचाही लळा लागला होता. हे सारे संस्कार मला समृद्ध करणारेच होते.पदवीच्या प्रथम वर्षाला असताना माझ्या घुसर्डी गावातील मित्रांसोबत पावसाळी दिवसात पन्हाळा, सिंहगड अशा ठिकाणी फिरायला गेलो होतो. तेथील निसर्ग सौंदर्यांने मी भारावलो होतो. खूप आकर्षित झालो होतो. त्या निसर्गाच्या विविध छटांनंतर कवितेच्या माध्यमातून शब्दबद्ध केल्या होत्या.प्रारंभी माझ्या लेखनाची सुरुवात निसर्गकवितेने झाली होती. पुढे पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतल्यावर निसर्ग कविता आपोआपच मागे पडत गेली.पदव्युत्तर शिक्षण घेताना मराठी साहित्याचा इतिहास बऱ्यापैकी समजून घेण्याचा प्रयत्न केला. शिवाय साठोत्तरी मराठी वाङ्गमयीन प्रवाहांनी माझे लक्ष वेधून घेतले. त्यात दलित, ग्रामीण, स्त्रीवादी, आदिवासी इत्यादी वास्तववादी साहित्य प्रवाहांनी मला झपाटून टाकले होते. कवी नामदेव ढसाळ, नारायण सुर्वे, त्र्यंबक सपकाळे, केशव मेश्राम इत्यादी कवींनी तर अस्वस्थ केले होते. शिवाय ग्रामीण साहित्यिकांनीही अंतर्मुख केले होते. खरं म्हणजे दलित साहित्यानं जगणं शिकवलं अन, ग्रामीण साहित्यानं लिहिणं.मी स्वत: ग्रामीण भागातला, शेतकरी कुटुंबातला असल्यामुळे ग्रामीण साहित्यात प्रकटलेले जीवन मला अधिक जवळचे वाटू लागले होते. म्हणून मी पुढे ग्रामीण साहित्य झपाटल्यासारखे वाचू लागलो. म.फुले यांच्यापासून तर गो.नि. दांडेकर, श्री.ना.पेंडसे, व्यंकटेश माडगुळकर, बहिणाबाई चौधरी, उद्धव शेळके, बी.रघुनाथ, आनंद यादव, रा.रं. बोराडे, ना.धों. महानोर, विठ्ठल वाघ, उत्तम कोळगावकर, रंगनाथ पठारे, राजन गवस, भास्कर चंदनशिव, देशमुख, इंद्रजीत भालेराव, ग्रामीण साहित्यिकांचे लेखन आस्थेने वाचू लागलो.कारण त्या साहित्यातले जगणे, त्यातील दु:खवेणा मला माझ्या, माझ्या कुटुंबाच्या आणि एकूणच तमाम ग्रामीण-शेतकरी वर्गाच्या वाटू लागल्या होत्या. ते वाचून आपणही आपले जगलेले, भोगलेले अनुभव शब्दबद्ध करू शकतो ही प्रबळ जाणीव निर्माण झाली. पुढे त्यातून मला लेखनाची प्रेरणा मिळत गेली.- प्रा.डॉ.रमेश माने, अमळनेर, जि.जळगाव

टॅग्स :literatureसाहित्यAmalnerअमळनेर