शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?
4
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
5
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, चंद्रकांतदादांच्या 'त्या' व्हिडीओवर म्हणाली..
6
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
7
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
8
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
9
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
10
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
11
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
12
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
13
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
14
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
15
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
16
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
17
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
18
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
19
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
20
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स

भुसावळ तालुक्यातील कु-हे पानाचे येथे पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या तलाठ्यास घेराव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 12:50 IST

पावसाने ६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान

भुसावळ, जि. जळगाव : अवकाळी पावसामुळे जिल्ह्यात पिकांचे मोठे नुकसान झाले असून शनिवारी भुसावळ तालुक्यातील कुºहे पानाचे येथे पिकांचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या तलाठ्यास संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी घेराव घातला.जिल्ह्यात २१ ते २९ आॅक्टोबर २०१९ या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे १४६८ गावांमधील ५ लाख ५ हजार ८७७ शेतकऱ्यांचे ५ लाख ९९ हजार ८३० हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने जिल्हाधिकारी व शासनास सादर केला आहे. सर्वाधिक फटका जामनेर, चाळीसगाव व चोपडा तालुक्याला बसला आहे.जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षाही अधिक म्हणजेच सरासरीच्या १४० टक्के पाऊस झाला आहे. २१ ते २९आॅक्टोबर या कालावधीत तर संपूर्ण जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. त्यामुळे शेतकºयांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. शासनाने याबाबत तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दिवाळीच्या सुट््यांमुळे त्यात अडचण निर्माण झाली होती. अखेर बुधवारपासून पंचनामे सुरू झाले आहेत. तसेच जिल्ह्यातील नुकसानीचा प्राथमिक अहवालही कृषी विभागाने सादर केला आहे.सर्वात कमी नुकसान रावेरमध्येतर सर्वात कमी नुकसान रावेर व बोदवड तालुक्यात झाले आहे. रावेर तालुक्यातील १२० गावांमधील १६ हजार ८३७ शेतकºयांचे १५ हजार ८२० हेक्टरचे नुकसान झाले आहे. तर बोदवड तालुक्यात ५२ गावांमधील १७ हजार ४५६ शेतकºयांचे १८ हजार ३७१ हेक्टरचे नुकसान झाले आहे.कोरडवाहूचे ४ लाख ६१ हजार हेक्टरचे नुकसानजिल्ह्यातील कोरडवाहू पिकांचे ४ लाख ६१ हजार १५९ हेक्टरचे तर बागायतीचे १ लाख ३६ हजार ८०४ हेक्टरचे व बहुवार्षिक पिकांचे १८६७ हेक्टरचे नुकसान झाले आहे. नुकसान झालेल्या पिकांमध्ये कोरडवाहू मध्ये खरीप ज्वारी ३८ हजार २८८ हेक्टर, कापूस ३ लाख १७ हजार ८९३ हेक्टर, मका ७७ हजार ३५६ हेक्टर, बाजरी ८ हजार ७६९ हेक्टर, सोयाबीन १७ हजार १०१ हेक्टर, तूर १११४ हेक्टर, तीळ ३ हेक्टर, भुईमूग ३०५ हेक्टर तर इतर पिके ३३० हेक्टर, बागायती पिकांपैकी चार पिके २३० हेक्टर, कापूस १ लाख २३ हजार ९८६ हेक्टर, ऊस ११७६ हेक्टर, भाजीपाला २२३३ हेक्टर, पपई २९९ हेक्टर, कांदा ३२८५ हेक्टर, केळी ५५९५ हेक्टर तर बहुवार्षिक पिके- १८६७ हेक्टरचा समावेश असल्याची माहिती मिळाली.जामनेर तालुक्यात सर्वाधिक नुकसानजिल्ह्यातील एकूण ५ लाख ९९ हजार ८३० हेक्टरवरील शेतीचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. त्यात सर्वाधिक ८५ हजार १६६ हेक्टरचे नुकसान जामनेर तालुक्यात झाले आहे. त्यापाठोपाठ चाळीसगाव तालुक्यात ७७ हजार ८२० हेक्टरचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :Jalgaonजळगाव