शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
3
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
4
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
5
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
6
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
7
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
8
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
9
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
10
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
11
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
12
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
13
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
14
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
15
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
16
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
17
MPSC Exam 2025: विद्यार्थ्यांच्या मागणीला यश, एमपीएससी परीक्षा पुढे ढकलली! आयोगाकडून नवीन तारीख जाहीर
18
IND vs PAK : भारत-पाक लढाई अन् 'गन' सेलिब्रेशनचा वाद! पाकिस्तानी फलंदाजानं घेतलं धोनी-कोहलीचं नाव
19
'मोदी-पुतीन यांच्यात चर्चा नाही, नाटो प्रमुख खोटं बोलताहेत'; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटलं, "बोलताना जरा..."
20
सोयाबीन शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार मदत द्या; विजय वडेट्टीवारांचे कृषिमंत्र्यांना पत्र

सुप्रीम कॉलनीला मिळणार ‘अमृत’चे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 06:02 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरवासिय गेल्या अडीच वर्षांपासून अमृत योजनेच्या खोदकामामुळे त्रस्त आहेत. अडीच वर्षांपासून अमृत अंतर्गत सुरु ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - शहरवासिय गेल्या अडीच वर्षांपासून अमृत योजनेच्या खोदकामामुळे त्रस्त आहेत. अडीच वर्षांपासून अमृत अंतर्गत सुरु असलेल्या पाणी पुरवठा योजना पुर्ण होण्याची वाट जळगावकर पाहत असून, हे काम अंतिम टप्प्यात आले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून पाण्याच्या समस्येने ग्रस्त असलेल्या सुप्रीम कॉलनीवासियांनी लवकरच अमृत योजनेतंर्गत पाणी उपलब्ध होणार आहे. १५ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीचा मुहूर्त साधत नागरिकांना थेट अमृत योजनेच्या नळ संयोजनद्वारे पाणी मिळण्याची शक्यता महापौर भारती सोनवणे यांनी व्यक्त केली आहे. सुप्रीम कॉलनीवासीयांना सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी महापौर भारती सोनवणे यांनी सोमवारी या भागात पाहणी करून, अमृत योजनेच्या कामाची पाहणी केली.

सुप्रीम कॉलनीतील नागरिकांना आजवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. सुप्रीम कॉलनीतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी परिसरात अमृत योजनेंतर्गत पाण्याची टाकी आणि यंत्रणा उभारण्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. महापौर भारती सोनवणे यांनी वर्षभरात वारंवार आढावा घेत कामाला गती देण्याचा प्रयत्न केला. १ जानेवारीला केलेल्या पाहणीत बांधकाम पूर्ण करण्याची २५ जानेवारी ग्वाही दिली असल्याने सोमवारी महापौरांनी पाहणी केली. यावेळी महापौरांसोबत पाणी पुरवठा सभापती अमित काळे, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, प्रभाग समिती सदस्य विठ्ठल पाटील, चंद्रकांत भापसे, बाबा साळुंखे, योगेश बोरोले यांच्यासह मनपा अधिकारी आणि मक्तेदार प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्य जोडणी लवकरच होणार

अमृत योजनेच्या भूमीगत टाकीत पाणी येण्यासाठी आवश्यक असलेली मुख्य पाईपलाईन टाकण्याचे काम पूर्ण झालेले आहे. महामार्गाजवळून जात असलेल्या वाघूरच्या पाईपलाईनला सुप्रीम कॉलनीची पाईपलाईन जोडणे बाकी असून लवकरच ते काम पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती मनपा अभियंत्यांनी दिली. जलकुंभावर विद्युत पंप बसविण्यासाठी आवश्यक असलेले सर्व बांधकाम आणि प्लास्टर पूर्ण झाले असून मंगळवारपासून पंप बसविण्यास सुरुवात होणार आहे. पंप बसविल्यानंतर विद्युत पुरवठा जोडणी करून त्याची चाचणी घेण्यात येईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी महापौरांना दिली. तसेच जोडणीचे सर्व काम १५ दिवसात पूर्ण करून देण्याचे आश्वासन देखील मक्तेदाराने दिले आहे.

अनेक वर्षांची समस्या मार्गी लागणार

सुप्रीम कॉलनीत आजवर असलेल्या नळ संयोजनातून कधीही सुरळीत आणि नियमित पाणीपुरवठा झालेला नाही. अमृत योजनेंतर्गत नागरिकांना नळ संयोजनची जोडणी देण्यात येत असून सर्व काम पूर्ण झाल्यानंतर जुनी यंत्रणा बंद करून अमृतच्या पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे. अमृतच्या पाण्याचा श्रीगणेशा जळगाव शहरात प्रथमच सुप्रीम कॉलनीत होणार आहे. सर्व काम पूर्ण करून १५ फेब्रुवारी रोजी गणेश जयंतीचा मुहूर्त साधून श्रीगणेशा होऊ शकतो अशी ग्वाही मनपा अधिकाऱ्यांनी महापौर भारती सोनवणे यांना दिली आहे.