शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

सुपरफास्ट गाड्यांना जळगावला थांबा द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 12:36 IST

जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामासाठी व शिक्षणासाठी जिल्हाभरातून हजारो नागरिक जळगावला येत असतात. विशेष म्हणजे चाळीसगाव, ...

जळगाव हे जिल्ह्याचे ठिकाण असल्याने विविध शासकीय कामासाठी व शिक्षणासाठी जिल्हाभरातून हजारो नागरिक जळगावला येत असतात. विशेष म्हणजे चाळीसगाव, पाचोरा, भडगाव या भागातील प्रवाशांची संख्या सर्वांधिक सुरु असते.असे असले तरी, चाळीसगाव व पाचोरा येथे अनेक सुपरफास्ट गाड्यांना थांबा नाही. अलिकडेच महानगरी व सचखंड या गाड्यांना थांबा मिळाला असला तरी, इतरही सुपरफास्ट गाड्यांना थांबा मिळणे गरजेचे आहे.तसेच दैनंदिन धावणारी देवळाली-भुसावळ पॅसेंजर गेल्यानंतर जळगावला येण्यासाठी दुपारी १२ पर्यंत जळगावला येण्यासाठी एकही गाडी राहत नाही. यामुळे जळगावला येणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांचे चांगलेच हाल होतात. त्यामुळे प्रशासनाने पॅसेंजर नंतर मुंबईकडून जळगावकडे जाणाºया एखाद्या सुपरफास्ट गाडीला चाळीसगाव व पाचोरा या ठिकाणी थांबा द्यायला हवा. विशेष म्हणजे यासाठी खासदार उन्मेश पाटील यांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. चाळीसगाव ते जळगाव हे अंतर जास्त असल्याने वाहनाने येणे शक्य नाही. त्यामुळे या सर्व गोष्टींचा विचार करुन, सकाळची पॅसेंजर गेल्यानंतर मधल्या काळात एखादी गाडी जळगावसाठी सोडणे गरजेचे आहे. दरम्यान, खासदारांनी चाकर मान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने, यांच्यासाठी पॅसेंजरला स्वतंत्र डबा जोडणे गरजेचे आहे. यामुळे विशेषत : महिला महिलांचे हाल थांबतील. कारण, अनेकवेळा महिला प्रवाशांना गाडीमध्ये बसायला देखील जागा मिळत नाही.त्यामुळे महिलांना उभे राहुन, प्रवास करावा लागतो. अशा एक ना अनेक समस्या आणि अडचणी आहेत. याबद्दल किती लिहावे, हा पण एक प्रश्नच आहे.- अविनाश पाटील

टॅग्स :Jalgaonजळगाव