शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
6
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
7
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
8
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
9
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
10
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
11
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
12
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
13
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
14
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
15
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
16
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
17
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
18
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
19
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
20
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...

जळगावात उन्हाची तीव्रता कायम, उष्माघाताचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:30 IST

रात्री ८ पर्यंत तापमानाचा पारा राहतोय ४० अंशापर्यंत

जळगाव : महिनाभरापासून प्रचंड तापमानाने जळगावकरांना हैराण करून सोडले असून मंगळवारीदेखील उन्हाच्या तीव्रतेने शहरवासीय घामोघाम होत आहे. सोमवारी देखील पारा ४६ अंशावर स्थिर होता. यंदाच्या एप्रिल महिन्याच्या तापमानाने गेल्या ९ वर्षाचा विक्रम मोडीत काढला. दरम्यान, गेल्या तीन दिवसापासून रात्री आठ वाजेपर्यंत तापमानाचा पारा ४० अंशावर राहत आहे. अजून दोन दिवस अशीच स्थिती राहणार आहेएप्रिल महिन्यात शहराचे कमाल तापमान ४० ते ४१ अंश इतके असते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याची सरासरी ही ४२ अंशापर्यंत गेली होती. तर यावर्षी मात्र, एप्रिल महिन्याचा सरासरीत १ अंशाची वाढ झाली आहे. ४२ ते ४३ अंशावर स्थिर राहिल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे १४ ते १७ एप्रिल दरम्यान शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती. तरीही सरासरीत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. दिवसापेक्षा रात्रीच्या सरासरी तापमानात तब्बल ३ ते ४ अंशाची वाढ झाली असून, भविष्याचा दृष्टीने हे धोकेदायक चित्र आहे.आगामी आठ दिवस धोक्याचेगेल्या आठवड्यात हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजात ५ मे पर्यंत तापमानात कोणतीही घट होण्याची शक्यता नाही. २९ रोजी देखील शहरात उष्णतेची लाट कायम राहणार असून, जळगावकरांनी काम असेल तरच बाहेर जावे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.विशेष करून लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी उन्हाचा फटका बसणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. एप्रिल इतका भयंकर तर मे महिना कसा असेल ? हा विचार करतानाच जळगावकरांच्या पोटात भितीचा गोळा उभा राहत आहे. ५ मे नंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होवून तापमानात काही घट होण्याची शक्यता आहे.रात्रीचा पारा ३० अंशावरसकाळी ८ वाजेपासून तापमान वाढण्याची गती सुरु होत असून रात्री ८ वाजेपर्यंत तापमान ४० अंशापेक्षा जास्त राहत असल्याने उष्ण झळा या कायम असतात. यावर्षी उन्हाळ्याप्रमाणे हिवाळा देखील कडक होता. हिवाळ्यात जळगावचा दिवसाचा पारा २५ ते २६ अंशावर होता. उन्हाळ्यात मात्र रात्रीच्यावेळेस २८ ते ३० अंश सेल्सीअस तापमान राहत असल्याने रात्री देखील मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. रात्री ११ वाजेपर्यंत पारा ३५ अंशावर राहत आहे.आर्द्रतेमध्ये मोठी घटतापमानात वाढ होण्याचे मुख्य उष्ण व कोरड्या वाऱ्यांचा परिणाम हे आहे. शहराच्या आर्द्रतेच्या प्रमाणात मोठी घट झाल्यामुळे तापमानात मोठी वाढ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.तापमानाची वेगवेगळी नोंदसोमवारच्या तापमानाबाबत वेगवेगळी नोंद करण्यात आली असून, भारतीय हवामान खात्याचा अंदाजानुसार सोमवारी ४५.४ अंशाची नोंद झाली. भुसावळ येथील वेलनेस सेंटरच्या अंदाजानुसार ४७ तर स्कायमेट या खासगी संकेतस्थळाच्या नोंदीनुसार ४६ अंशाची नोंद करण्यात आली आहे. राष्टÑीय महामार्ग लगत ४७ अंशाच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. भासमान देखील ४८.३ इतके होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव