शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात उन्हाची तीव्रता कायम, उष्माघाताचा धोका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 12:30 IST

रात्री ८ पर्यंत तापमानाचा पारा राहतोय ४० अंशापर्यंत

जळगाव : महिनाभरापासून प्रचंड तापमानाने जळगावकरांना हैराण करून सोडले असून मंगळवारीदेखील उन्हाच्या तीव्रतेने शहरवासीय घामोघाम होत आहे. सोमवारी देखील पारा ४६ अंशावर स्थिर होता. यंदाच्या एप्रिल महिन्याच्या तापमानाने गेल्या ९ वर्षाचा विक्रम मोडीत काढला. दरम्यान, गेल्या तीन दिवसापासून रात्री आठ वाजेपर्यंत तापमानाचा पारा ४० अंशावर राहत आहे. अजून दोन दिवस अशीच स्थिती राहणार आहेएप्रिल महिन्यात शहराचे कमाल तापमान ४० ते ४१ अंश इतके असते. गेल्या वर्षी एप्रिल महिन्याची सरासरी ही ४२ अंशापर्यंत गेली होती. तर यावर्षी मात्र, एप्रिल महिन्याचा सरासरीत १ अंशाची वाढ झाली आहे. ४२ ते ४३ अंशावर स्थिर राहिल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे १४ ते १७ एप्रिल दरम्यान शहरात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमानात मोठी घट झाली होती. तरीही सरासरीत वाढ झाल्याचे पहायला मिळत आहे. दिवसापेक्षा रात्रीच्या सरासरी तापमानात तब्बल ३ ते ४ अंशाची वाढ झाली असून, भविष्याचा दृष्टीने हे धोकेदायक चित्र आहे.आगामी आठ दिवस धोक्याचेगेल्या आठवड्यात हवामान खात्याकडून वर्तविण्यात आलेल्या अंदाजात ५ मे पर्यंत तापमानात कोणतीही घट होण्याची शक्यता नाही. २९ रोजी देखील शहरात उष्णतेची लाट कायम राहणार असून, जळगावकरांनी काम असेल तरच बाहेर जावे असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांकडून दिला जात आहे.विशेष करून लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनी उन्हाचा फटका बसणार नाही याची दक्षता घेणे गरजेचे आहे. एप्रिल इतका भयंकर तर मे महिना कसा असेल ? हा विचार करतानाच जळगावकरांच्या पोटात भितीचा गोळा उभा राहत आहे. ५ मे नंतर जिल्ह्यात ढगाळ वातावरण निर्माण होवून तापमानात काही घट होण्याची शक्यता आहे.रात्रीचा पारा ३० अंशावरसकाळी ८ वाजेपासून तापमान वाढण्याची गती सुरु होत असून रात्री ८ वाजेपर्यंत तापमान ४० अंशापेक्षा जास्त राहत असल्याने उष्ण झळा या कायम असतात. यावर्षी उन्हाळ्याप्रमाणे हिवाळा देखील कडक होता. हिवाळ्यात जळगावचा दिवसाचा पारा २५ ते २६ अंशावर होता. उन्हाळ्यात मात्र रात्रीच्यावेळेस २८ ते ३० अंश सेल्सीअस तापमान राहत असल्याने रात्री देखील मोठ्या प्रमाणात उकाडा जाणवत आहे. रात्री ११ वाजेपर्यंत पारा ३५ अंशावर राहत आहे.आर्द्रतेमध्ये मोठी घटतापमानात वाढ होण्याचे मुख्य उष्ण व कोरड्या वाऱ्यांचा परिणाम हे आहे. शहराच्या आर्द्रतेच्या प्रमाणात मोठी घट झाल्यामुळे तापमानात मोठी वाढ झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.तापमानाची वेगवेगळी नोंदसोमवारच्या तापमानाबाबत वेगवेगळी नोंद करण्यात आली असून, भारतीय हवामान खात्याचा अंदाजानुसार सोमवारी ४५.४ अंशाची नोंद झाली. भुसावळ येथील वेलनेस सेंटरच्या अंदाजानुसार ४७ तर स्कायमेट या खासगी संकेतस्थळाच्या नोंदीनुसार ४६ अंशाची नोंद करण्यात आली आहे. राष्टÑीय महामार्ग लगत ४७ अंशाच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. भासमान देखील ४८.३ इतके होते.

टॅग्स :Jalgaonजळगाव