शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

अनाथांच्या उन्हाळी सुट्या चार भिंतीच्या आड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 12:20 IST

जिल्हा बालनिरीक्षण गृह

सचिन देवजळगाव : आई-बापाच छत्र हरपल्याने आणि नातलगानींही दूर केल्यामुळे अनाथ मुला-मुलींचे आयुुष्य इतर मुलांपेक्षा वेगळेच असते. जन्मदातेच ठिकाणावर नसल्यामुळे बालपणापासून जिल्हा बालनिरीक्षण गृहात दाखल असलेल्या अनाथांना उन्हाळ््याच्या सुट्टयासह इतर वर्षांतल्या कुठल्याही सुट्टया निरीक्षण गृहाच्या चार भिंतीत घालवाव्या लागतात. यामुळे त्यांच्यात नैराय येऊ शकते हे लक्षात घेऊन या मुलांना उन्हाळी सुट्यांमध्ये विरंगुळा म्हणून प्रशासनातर्फे विविध वस्तू तयार करण्याचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्यात येत आहे.कुठल्या ना कुठल्या कारणात्सव आई-वडिलांचे निधन झालेले असणे व बेवारस आढळून आलेल्या बालकांना पोलिसांमार्फत बालनिरीक्षण गृहात आणले जाते. या ठिकाणी मुलांच्या संगोपनापासून ते शिक्षणापर्यंतची सर्व जबाबदारी जिल्हा बालनिरीक्षण गृहातर्फे पार पाडली जाते. त्यानुसार जळगावातील बालनिरीक्षण गृहात सध्या ४० मुले व ४५ मुली आहेत. ही सर्व मुले १८ वयोगटातील असून, शहारातील विविध शाळांमध्ये या मुलांचे शिक्षण सुरु आहे. निरीक्षण गृहाच्या अधिक्षिका म्हणून जयश्री पाटील काम पाहतात तर बाल हक्क संरक्षण समितीचे सदस्यही मुलांच्या संगोपनाकडे लक्ष देऊन असतात.व्यावसायिक प्रशिक्षणात रमली मुलेना जन्मदाते ना हक्काचे घर... परिणामी या मुलांना बाराही महिने बाल गृहातच रहावे लागते. त्यामुळे या मुलांचे मन कशात तरी रमावे, त्यांना आई-वडिलांची आठवण येऊ नये, यासाठी बाल निरीक्षण गृह प्रशासनातर्फे दरवर्षी उन्हाळी सुट्यांमध्ये या मुलांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. यामध्ये मोबाईल दुरूस्ती, घड्याळ दुरुस्ती, गणपती मूर्ती बनविणे, कापडी बॅगा तयार करणे आदी प्रशिक्षण दिले जाते. तर मुलींसाठी शिवणकाम, ब्युटीपार्लर व विविध कलाकृतीच्या वस्तू तयार करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या प्रशिक्षणात मुलांचा वेळ जात असून, त्यांचे मनही रमत आहे. तसेच विविध संस्थाच्या माध्यमातून मुलांना एमएस सीआयटी व इंग्रजी कोंचीग क्लासच्या माध्यमातुन इंग्रंजी शिकवले जात आहे. या व्यक्तीरिक्त मनोरंजनासाठी गायन स्पर्धा, वादन स्पर्धा, क्रिकेट आदी स्पर्धा घेतल्या जातात.मोजकेच नातेवाईक येतात भेटायलाया ठिकाणी असलेल्या बालनिरीक्षणत आई-वडिल नसल्यामुळे पोलिसांमार्फत नातलगांनी दाखल केलेले आणि पोलिसांनींच कुठल्या ना कुठल्या कारणात्सव दाखल केलेल्या मुला-मुलींचा समावेश आहे. या मुलांमध्ये काही बोटावर मोजण्याइतकेच बालकांचे मामा-मावशी व इतर नातलग वर्षांतून कधी-तरी भेटायला येत असतात. विशेष म्हणजे यामध्ये जवळचे नातलंग दिवाळीच्या किंवा उन्हाळ््याच्या सुट्टीत जिल्हा बालनिरीक्षण गृहाच्या परवानगीने घरी आठ ते दहा दिवस घरी घेऊन जात असतात. मात्र, बहुतांश बालकांच्या नातलगांनी रक्ताच्या नात्यालाही विसरुन, दुर्लक्ष केले असल्याचे लक्षात येते.बालनिरीक्षण गृहातील मुलांना उन्हाळी सुट्यांमध्ये कशात तरी मन रमावे, यासाठी व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते. मनोरंजनासाठी गायन-वादन व अंताक्षरीच्या स्पर्धाही घेतल्या जातात. तसेच या मुलांची दोन ते तीन दिवसांची सहल काढली जाते. पुढच्या आठवड्यात शिर्डी किंवा शेगावला सहल नेण्याचे नियोजन आहे.-जयश्री पाटील, अधीक्षिका, बालनिरीक्षण गृह

टॅग्स :Jalgaonजळगाव