शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

जळगावात उन्हाचा रेकॉर्डब्रेक तडाखा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 20:20 IST

जळगावात तीन वर्षात मार्चमध्ये पहिल्यांदाच पारा ४२ अंशावर

ठळक मुद्देजळगावात आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहणारजळगावात किमान तापमानातही वाढ२०१० व २०१५ मध्ये मार्च महिन्यात होता पारा ४२ अंशावर

आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.२८ : एप्रिल महिना सुरु व्हायला अजून तीन दिवस बाकी असतानाच मार्च अखेरीसच जळगावच्या तापमानाने चाळीशी ओलांडली असून, बुधवारी शहराचा पारा ४२ अंशापर्यंत पोहचला. २०१५ नंतर पहिल्यांदाच जळगावच्या तापमानाने मार्च महिन्यात ४२ अंशाची मजल गाठली आहे. दरम्यान, आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या आठवड्याभरापासून जळगावसह महाराष्टÑात उष्णतेची लाट पसरली आहे. या वाढत्या तापमानाचा परिणाम दैनंदिन जीवनावर दिसून येत असून, दुपारच्या वेळी रस्ते निर्मनुष्य दिसू लागले आहेत. सकाळी ११ पासून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. दुपारच्या वेळी रस्त्यांवर सामसूम दिसून येत आहे. नागरिक सायंकाळी ६ वाजेनंतरच घराबाहेर निघत आहेत.जळगावाचा पारा मार्च मध्ये सरासरी ३९ अंशापर्यंत कायम असतो. २०१० मध्ये शहराचा पारा मार्च महिन्यात ४२ अंशापर्यंत पोहचला होता. त्यानंतर २९ मार्च २०१५ रोजी शहरात ४२.४ अंशाची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर २८ मार्च, बुधवारी ४२ अंश तापमानाची नोंद झाली आहे. स्कायमेट व भुसावळ वेलनेस वेदर या संकेतस्थळावरुन ही नोंद घेण्यात आली आहे.शहराच्या कमाल तापमानाप्रमाणेच किमान तापमानातही वाढ झाली असून, बुधवारी २१ अंश कमाल तापमानाची नोंद झाली आहे. यामुळे रात्री १० वाजेपर्यंत वातावरणात उकाडा जाणवत आहे.तापमान वाढीसह वाऱ्यांचा वेग देखील जास्त असल्याने नागरिकांना उन्हाच्या झळा देखील बसत आहे. शहरात गेल्या दोन दिवसांपासून १६ किमी प्रती तास या वेगाने वारे वाहत आहेत. तसेच वातावरणातील आर्द्रता देखील ५२ टक्कयांवर आली आहे.गेल्या आठवड्याभरापासून गुजरात, राजस्थानकडून येणाºया ‘लु’ वाºयांचे प्रमाण वाढल्यामुळे तापमानात सारखी वाढ होत आहे. तसेच अजुन आठवडाभर ‘लु’ वाºयांचा प्रकोप कायम राहणार असल्याने तापमानाचा पारा ४४ अंशापर्यंत जाण्याचा आंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे.

टॅग्स :JalgaonजळगावTemperatureतापमान