शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

जळगावात मित्राच्या लग्नासाठी नंदुरबारहून आलेल्या तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2018 12:00 IST

नातेवाईकांना घातपाताचा संशय

जळगाव : मित्राच्या लग्नासाठी नंदुरबार येथून जळगावात आलेल्या दीपक भरत गावंडे (वय २६, मुळ रा. करमाड, ता.जामनेर, ह. मु. नंदुरबार) या तरुणाने हरिविठ्ठल नगरातील स्वत:च्या राहत्या घरात दोरीने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. दरम्यान, दीपक हा आत्महत्या करणार नाही, हा घातपात आहे, असा संशय दीपक याच्या नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.झोक्याच्या दोरीने आवळला फास; इनकॅमेरा शवविच्छेदनाची मागणीनातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार दीपक याच्या घराच्या दरवाजाला आतून कडी लावलेली नव्हती. झोक्याच्या दोरीने फास आवळलेला असल्याने त्याची ही आत्महत्या नाही. हा घातपात आहे, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला, त्यामुळे जिल्हा रुग्णालयात इनकॅमेरा शवविच्छेदन करावे अशी मागणी त्यांनी केली. दरम्यान, याप्रकरणी रामानंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.आरटीओंच्या वाहनावर होता चालकदीपक हा आरटीओ निरीक्षकांच्या वाहनावर चालक म्हणून कामाला होता. मात्र काही दिवसापूर्वीच त्याने काम सोडले होते. नंदुरबार येथे महावितरण कंपनीत कंत्राटी पध्दतीने कार लावून तेथेच स्थायिक होणार होता. त्यासाठी त्याने शुक्रवारी शहरात जुन्या ४ कार बघितल्या. चालक असल्याने स्वत:ची कार घेऊन व्यवसाय करण्याचा निर्णय त्याने घेतला होता. आईचा आक्रोश मन हेलावणारादीपक याच्या मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर आई, वडील व भाऊ दुपारी दीड वाजता जिल्हा रुग्णालयात पोहचले. यावेळी आई आशाबाई यांनी टाहो फोडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थित असलेल्या महिलांनाही अश्रू आवरणे कठीण झाले होते.मित्राच्या लग्नासाठी वाटप केल्या पत्रिकायाबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, दीपक याचा मित्र नवल याचे १८ डिसेंबर रोजी जळगावात लग्न आहे. त्यासाठी तो तीन दिवसापासून जळगावात आला होता. हरिविठ्ठल नगरात त्याचे स्वत:चे घर आहे. त्या घरात तो रहात होता.मोठा भाऊ नीलेश हा नंदुरबार येथे शिक्षक असल्याने पूर्ण कुटुंब नंदुरबारला स्थायिक झाले आहे. शुक्रवारी दुपारी चार वाजेपर्यंत मित्र नवल व दीपक या दोघांनी लग्नपत्रिकांचे वाटप केले. शनिवारी सकाळी शेजारचा मुलगा दीपक याच्याकडे घरी पाण्याचा पंप घ्यायला गेला असता त्याला दीपक गळफास घेतल्याच्या अवस्थेत दिसला.दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर उपनिरीक्षक कांचन काळे, हेडकॉन्स्टेबल अरुण पाटील, वासुदेव मोरे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.पंचनामा करुन मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. तेथे डॉक्टरांनी दीपक याला मृत घोषीत केले.यंदा लग्नाचे नियोजनदीपक हा अविवाहित होता. यंदा लग्न करण्याचे नियोजन कुटुंबाने केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. शहरात मित्रांचा मोठा गोतावळा होता. वडील भरत देवराम गावंडे, आई आशाबाई व भाऊ निलेश हे नंदुरबारला स्थायिक झाले आहेत. करमाड, ता.जामनेर हे त्याचे मुळ गाव आहे. अनेक वर्षापासून ते जळगावातच स्थायिक होते. भाऊ निलेशच्या नोकरीच्या निमित्ताने कुटुंब आता नंदुरबारला स्थायिक झाले.

टॅग्स :Suicideआत्महत्याJalgaonजळगाव