शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

अमृत पाणी योजनेची यशस्वी चाचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:18 IST

-मुख्य जलवाहिनीवरून पाण्याच्या टाकीत ६ मिनिटात पोहचले पाणी - १५ लाख लीटरची टाकी भरते केवळ दीड तासात -केवळ १० ...

-मुख्य जलवाहिनीवरून पाण्याच्या टाकीत ६ मिनिटात पोहचले पाणी

- १५ लाख लीटरची टाकी भरते केवळ दीड तासात

-केवळ १० टक्के व्हॉल्व्ह उघडल्यावरच भरते टाकी

-पंधरा दिवसात दिले गेले १२०० नळ कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव - रात्री-बेरात्री पाण्यासाठी जागणाऱ्या आणि तब्बल १५ दिवसाआड पाणी पुरवठा होणाऱ्या सुप्रीम कॉलनीवासियांच्या पाण्याचा प्रश्न आता ‘अमृत’ मुळे संपणार आहे. कधीकाळी अर्धा महिना पाण्यासाठी तरसणाऱ्या सुप्रीम कॉलनीवासीयांना आता नियमित पाणी मिळणार आहे. सुप्रीम कॉलनी भागात अमृत योजनेंतर्गत नव्याने पाईपलाईन टाकण्यात आली असून जोडणीसह सर्व काम पूर्ण झाले आहे. सोमवारी गणेश जयंतीच्या शुभमुहूर्ताला महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत भूमिगत टाकीत पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली असता ती यशस्वी ठरल्याने सुरळीत पाणी पुरवठ्याचा मार्ग मोकळा झाला आहे. २० रोजी या भागातील पाणी योजनेच्या कामाचे उद‌्घाटन होणार आहे.

सुप्रीम कॉलनीवासीयांना गेल्या १२ वर्षांपासून कधीही नियमित पाणीपुरवठा होत नव्हता, त्यामुळे पावसाळ्यातदेखील या भागातील नागरिकांना पाण्यासाठी रात्री-बेरात्री जागे रहावे लागत होते. गेल्या तीन वर्षांपासून सुरू असलेल्या अमृत पाणीपुरवठा योजनेमुळे सुप्रीम कॉलनीवासीयांना एकप्रकारे नियमित मिळणाऱ्या पाण्याव्दारे अमृतच मिळणार आहे. सोमवारी सुप्रीम कॉलनीत महापौर भारती सोनवणे यांच्या उपस्थितीत भूमिगत टाकीत पाणी सोडण्याची चाचणी घेण्यात आली. यावेळी स्थायी समिती सभापती राजेंद्र पाटील, पाणीपुरवठा सभापती अमित काळे, भाजप महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी, नगरसेवक कैलास सोनवणे, गणेश सोनवणे, रियाज बागवान, चंद्रकांत भापसे, मनपा प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, श्यामकांत भांडारकर, मक्तेदार प्रतिनिधी पंकज बऱ्हाटे आदी उपस्थित होते.

एकही कनेक्शन नसलेल्या भागात झाले १२०० कनेक्शन

नियमित पाणी मिळत नसल्याने या भागातील ९० टक्के नागरिकांनी मनपाचे नळ कनेक्शन घेतलेच नव्हते. मात्र, अमृत अंतर्गत या भागात पाईपलाईन टाकली गेल्यानंतर व आता लवकरच पाणी मिळणार असल्याने या भागात आतापर्यंत १२०० नागरिकांना नळ कनेक्शन देण्यात आले आहे. एका दिवसात १०० ते १५० जणांचे कनेक्शनसाठी अर्ज येत असल्याची माहिती प्रकल्प अभियंता योगेश बोरोले यांनी दिली.

फोर्स प्रचंड कनेक्शन कमी

अमृत योजनेंतर्गत नव्याने पाणीपुरवठा यंत्रणा बसविण्यात आली असून १५ लाख लीटरची भूमिगत पाणी साठवण टाकी तयार करण्यात आली आहे. अमृतची जलवाहिनी वाघूरच्या जलवाहिनीला जोडण्याचे काम संपले असून पंप बसविणे आणि इतर किरकोळ, तांत्रिक कामे देखील पूर्ण झाले आहे. पाण्याचा फोर्स प्रचंड असून, नळ कनेक्शन कमी असल्याने सुरुवातीला कमी दाबाने पाणीपुरवठा केला जाणार आहे. आधी या भागात पाण्याचा दाब कमी असल्याने पाणीपुरवठाच होत नव्हता.

दीड तासात १५ लाख लीटरची टाकी भरली

मुख्य जलवाहिनीवरून पाणी सोडल्यानंतर अवघ्या ६ मिनिटात पाणी भूमिगत टाकीत पोहचले. मुख्य जलवाहिनीचा केवळ १० टक्के व्हॉल्व्ह उघडला तरी भूमिगत टाकी भरायला केवळ दीड तास अवधी लागणार आहे. टाकीची पूर्णत: साफसफाई करून दोन दिवसात नागरिकांच्या नळाला पाणी सोडून चाचणी घेतली जाणार आहे.

शनिवारी शुभारंभ

अमृत अंतर्गत सुप्रीम कॉलनीत पहिल्यांदाच पाणीपुरवठा केला जाणार असून, शनिवारी पालकमंत्र्यांचा हस्ते या कामाचे उद‌्घाटन केले जाणार असून, यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री गिरीश महाजन, खासदार उन्मेष पाटील, आमदार सुरेश भोळे यांच्यासह सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित राहणार असल्याची माहिती महापौर भारती सोनवणे यांनी दिली.

कोट....

सुप्रीम कॉलनीवासीयांची अनेक वर्षांची समस्या आता मार्गी लागणार आहे. रात्री-बेरात्री पाण्यासाठी जागे रहावे लागत होते. विशेष म्हणजे पाण्यासाठी या भागातील महिलांचीच मोठ्या प्रमाणात वणवण होत होती. मात्र, अमृतमुळे सुप्रीम कॉलनीवासीयांची समस्या आता मार्गी लागणार आहे.

-भारती सोनवणे, महापौर