शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

जळगाव जिल्ह्यात कोरोनावर यशस्वी मात, किती जण झाले बरे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 12:29 IST

दिलासादायक चित्र

जळगाव : जिल्हाभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक सुमारे २०० च्या टप्प्यात सातत्याने वाढत असतानाही बरे होणाऱ्यांचे प्रमाणही गेल्या आठवडाभरात वाढले आहे़ या कालावधीत ९१० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे़ सद्यस्थितीत जिल्ह्यात एकूण रुग्णांपैकी ३५ टक्के रुग्ण उपचार घेत असून ५९ टक्के रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत़जिल्ह्यात उपचार घेणाऱ्यांपेक्षा बरे होणाºयांचे प्रमाण दिवसेंदिवस अधिक होत आहे़ काही दिवसांपूर्वी एका ९० वर्षीय वृद्धांनीही कोरोनावर यशस्वी मात केली होती़ त्यामुळे कोरोना हा बरा होणारा आजार असून लवकर रुग्णालयात गेल्यास यातून रुग्ण बाहेर पडू शकतो, अशी जिल्हाभरात ३३८३ उदाहरणे आहेत़मृत्यूदर साडेपाच टक्क्यांवरजिल्ह्याचा मृत्यूदर हा थेट १२ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता़ मध्यंतरीच्या काळात चाचण्या वाढविण्यात आल्या व रुग्णसंख्या समोर येत गेल्याने हा मृत्यूदर ५.६ टक्क्यांवर आला आहे़ रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे़७५ टक्के निगेटिव्हज्या चाचण्या रोज होत आहेत़ त्यापैकी जवळपास ७५ टक्के अहवाल हे निगेटीव्ह येत आहेत, त्यामुळे हे देखील एक दिलासादायक चित्र आहे़७० टक्के रुग्णांना सौम्य लक्षणेज्यांना लक्षणे नाहीत किंवा अगदी सौम्य लक्षणे आहेत त्यांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल केले जाते़ सद्यस्थितीत उपचार घेणाºया रुग्णांपैकी १४२४ म्हणजेच ७० टक्के रुग्णांना कसलीही लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत. तर त्या खालोखाल १२७ रुग्णांना मध्यम स्वरूपाची लक्षणे आहेत तर ४६९ रुग्णांना आॅक्सिजनची गरज भासत आहे़ २२० रुग्ण अत्यवस्थ आहेत़लवकर चाचणी, लवकर निदान व लवकर उपचार यामुळे आता पुढील गंभीर बाबी टाळता येत असल्याने रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६० टक्क्यांपर्यंत गेलेले आहे़ यामुळे मृत्यूचे प्रमाणही घटले आहे़ शिवाय लवकर हे लोक आयसोलेट झाल्याने पुढील वाढणारा संसर्गही आटोक्यात आला येणार आहे़ रोज चाचण्यांचे प्रमाण वाढले आहेत़ त्यात जास्त अहवाल निगेटीव्ह असून काही पॉझिटीव्ह येत आहेत, मात्र, लवकर निदान होत असल्याने पुढील संसर्ग टळत आहे़- डॉ़ एऩ एस़ चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक, जळगाव.

टॅग्स :Jalgaonजळगाव