शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
5
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
6
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
7
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
8
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
9
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
10
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
11
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
12
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
13
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
14
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
15
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
16
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
17
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
18
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
19
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
20
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...

जनसेवा आणि पक्षकारांनी दिलेल्या संधीनेच यश - अ‍ॅड. अजय तल्हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 13:13 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केले मोठे काम

जनसेवा आणि पक्षकारांनी सातत्याने मला जी सेवेची संधी दिली, त्यामुळेच आज मला यश मिळाले असल्याचे केंद्र सरकारचे नवे असिस्टंट सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया अ‍ॅड. अजय तल्हार यांनी म्हटले आहे. अ‍ॅड. तल्हार हे मुळचे जळगावचे आहेत. सध्या ते औरंगाबाद खंडपीठात वकिली करतात. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात मुंबई उच्च न्यायालयात मार्च १९९६ मध्ये केली. नंतर वर्षभराने ते औरंगाबादला आले. आणि येथेच काम करु लागले. या काळात त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा दिला. त्यासोबतच त्यांनी अनेक जनहित याचिकांमध्ये काम पाहिले.प्रश्न : या पदापर्यंत तुम्ही कसे पोहचलात, आणि नंतर कुटुंबियांची प्रतिक्रीया काय होती.अ‍ॅड.तल्हार : हे पद म्हणजे, केंद्र सरकारच्या कायदेशीर सल्लागाराचे आहे. त्याचे कार्यक्षेत्र उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ हे आहे. त्याअंतर्गत येणाºया जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारची जी काही न्यायीक प्रकरणे असतील. त्यावर सल्ला देणे आणि बाजु मांडणे हे काम आहे.केंद्र सरकारकडूनच त्यासाठी नामाकंन केले जाते आणि मग नियुक्ती होते. कुटुंबाला आनंद झाला. पण सोबतच जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे. आता आणखी जोमाने काम करावे लागेल.प्रश्न : अनेक जनहित याचिका किंवा गरिबांच्या प्रकरणांमध्ये तुम्ही अल्प फी घेतात, त्यावर काय सांगाल.अ‍ॅड.तल्हार : मी स्वत: जन या संकल्पनेचा भाग आहे. जनहित याचिका ही सर्वांच्या फायद्याची असते. त्यामुळे मी त्यात फी घेत नाही.गरिबांच्या अनेक केसेसमध्ये तर मी त्याचा खर्च देखील करतो. त्याची क्षमता बघुनच पैसे घेतो किंवा घेतच नाही.तुम्ही शेतकरी समस्यांवर काम केले आहे. त्यांच्या आवाज उठवला आहे. त्यात नेमके कसे कार्य केले ?अ‍ॅड. तल्हार : भारताच्या घटनेतच तरतुद आहे की शेतकरी, ग्राहक आणि शासन यांचे म्हणणे मान्य करून शेतमाला भाव ठरवावा.मात्र तसे होत नाही. शेतमालावर नियंत्रण असावे,यासाठी किसान संघाने लढा उभारला. त्यात मी काम केले. हा लढा कायदेशीर पद्धतीने सोडवण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. त्याचा निकाल लागला आणि त्याचाच परिपाक म्हणून निती आयोगानेही प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारने दोन अध्यादेशही काढले आहेत.शेतकºयांच्या आणि गरिबांच्या प्रश्नांवर जे मांडले. त्याचा फायदा झाला. आता कामही वाढले आहे आणि जबाबदारी देखील.शेतकºयांच्या प्रश्नांवर काम केले.तसेच अनेक मोठमोठ्या प्रकरणात प्रसिद्ध राजकारणी, नेते, उद्योजक यांचीही बाजु मांडली. उद्योग क्षेत्राशी संबधीत एका प्रकरणात बाजु मांडली होती. त्यात मोठे यश मिळाले त्याचा फायदा कारकिर्दीत पुढे झाला - अ‍ॅड. अजय तल्हार, असिस्टंट सॉलिसिटर जनरल

टॅग्स :Jalgaonजळगाव