शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
3
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
4
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
5
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
6
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
7
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
8
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
10
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
11
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
12
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
13
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
14
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
15
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
16
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...
17
प्राध्यापकानेच रचला विभागप्रमुखाच्या हत्येचा कट, माजी विद्यार्थ्यांना दिली सुपारी, विमानाने बोलावले शूटर, अखेर...  
18
Gulabjamun Recipe: ना मावा, ना मिल्कपावडर; घरच्या साहित्यात १५ मिनिटांत करा फर्स्ट क्लास गुलाबजाम 
19
आसिफ अली झरदारींनी काश्मीरबाबत ओकली गरळ; पाकिस्तानी स्वातंत्र्यदिनी भारताला तोडण्याची भाषा
20
“नाल्यांमुळे RSS गंगा प्रदुषित झाली”; भाजपात आयाराम संस्कृतीवर स्वामी गोविंददेवगिरींची टीका

जनसेवा आणि पक्षकारांनी दिलेल्या संधीनेच यश - अ‍ॅड. अजय तल्हार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 13:13 IST

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केले मोठे काम

जनसेवा आणि पक्षकारांनी सातत्याने मला जी सेवेची संधी दिली, त्यामुळेच आज मला यश मिळाले असल्याचे केंद्र सरकारचे नवे असिस्टंट सॉलिसिटर जनरल आॅफ इंडिया अ‍ॅड. अजय तल्हार यांनी म्हटले आहे. अ‍ॅड. तल्हार हे मुळचे जळगावचे आहेत. सध्या ते औरंगाबाद खंडपीठात वकिली करतात. त्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरूवात मुंबई उच्च न्यायालयात मार्च १९९६ मध्ये केली. नंतर वर्षभराने ते औरंगाबादला आले. आणि येथेच काम करु लागले. या काळात त्यांनी सातत्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर लढा दिला. त्यासोबतच त्यांनी अनेक जनहित याचिकांमध्ये काम पाहिले.प्रश्न : या पदापर्यंत तुम्ही कसे पोहचलात, आणि नंतर कुटुंबियांची प्रतिक्रीया काय होती.अ‍ॅड.तल्हार : हे पद म्हणजे, केंद्र सरकारच्या कायदेशीर सल्लागाराचे आहे. त्याचे कार्यक्षेत्र उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ हे आहे. त्याअंतर्गत येणाºया जिल्ह्यांमध्ये केंद्र सरकारची जी काही न्यायीक प्रकरणे असतील. त्यावर सल्ला देणे आणि बाजु मांडणे हे काम आहे.केंद्र सरकारकडूनच त्यासाठी नामाकंन केले जाते आणि मग नियुक्ती होते. कुटुंबाला आनंद झाला. पण सोबतच जबाबदारीची आम्हाला जाणीव आहे. आता आणखी जोमाने काम करावे लागेल.प्रश्न : अनेक जनहित याचिका किंवा गरिबांच्या प्रकरणांमध्ये तुम्ही अल्प फी घेतात, त्यावर काय सांगाल.अ‍ॅड.तल्हार : मी स्वत: जन या संकल्पनेचा भाग आहे. जनहित याचिका ही सर्वांच्या फायद्याची असते. त्यामुळे मी त्यात फी घेत नाही.गरिबांच्या अनेक केसेसमध्ये तर मी त्याचा खर्च देखील करतो. त्याची क्षमता बघुनच पैसे घेतो किंवा घेतच नाही.तुम्ही शेतकरी समस्यांवर काम केले आहे. त्यांच्या आवाज उठवला आहे. त्यात नेमके कसे कार्य केले ?अ‍ॅड. तल्हार : भारताच्या घटनेतच तरतुद आहे की शेतकरी, ग्राहक आणि शासन यांचे म्हणणे मान्य करून शेतमाला भाव ठरवावा.मात्र तसे होत नाही. शेतमालावर नियंत्रण असावे,यासाठी किसान संघाने लढा उभारला. त्यात मी काम केले. हा लढा कायदेशीर पद्धतीने सोडवण्यासाठी जनहित याचिका दाखल केली. त्याचा निकाल लागला आणि त्याचाच परिपाक म्हणून निती आयोगानेही प्रस्ताव दिला आहे. केंद्र सरकारने दोन अध्यादेशही काढले आहेत.शेतकºयांच्या आणि गरिबांच्या प्रश्नांवर जे मांडले. त्याचा फायदा झाला. आता कामही वाढले आहे आणि जबाबदारी देखील.शेतकºयांच्या प्रश्नांवर काम केले.तसेच अनेक मोठमोठ्या प्रकरणात प्रसिद्ध राजकारणी, नेते, उद्योजक यांचीही बाजु मांडली. उद्योग क्षेत्राशी संबधीत एका प्रकरणात बाजु मांडली होती. त्यात मोठे यश मिळाले त्याचा फायदा कारकिर्दीत पुढे झाला - अ‍ॅड. अजय तल्हार, असिस्टंट सॉलिसिटर जनरल

टॅग्स :Jalgaonजळगाव