शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

विद्यार्थ्यांनो ! तांत्रिक व्यत्ययाची बाळगू नका भीती, कारण विंडो कालावधी तीन तासाचा दिला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 21:56 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देतांना ऐनवेळी ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देतांना ऐनवेळी उदभवणाऱ्या कोणत्याही तांत्रिक व्यत्ययाची भीती बाळगू नये. कारण या विद्यार्थ्यांना विंडो कालावधी तीन तासाचा दिला जाणार आहे.  

            यावर्षी प्रथमच ऑनलाईन परीक्षा होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात काही शंका आहेत. पदवी परीक्षेसाठी दिड तासाचा तर पद्व्युत्तर परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात आला आहे. परीक्षा देतांना ऐनवेळी वीज पुरवठा खंडीत झाला अथवा काही तांत्रिक व्यत्यय आला तर कसे होईल अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यादृष्टीकोनातून विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी काही तांत्रिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://nmu.unionline.in या लिंक वर जावे  त्याठिकाणी विचारण्यात आलेला यूजर आयडी च्या ठिकाणी पीआरएन क्रमांक टाकावा. पासवर्ड साठी विद्यार्थ्याची जन्मतारीख हाच विद्यार्थ्याचा पासवर्ड  पासवर्ड आहेआहे (उदा. 06/10/1999 ही जन्मतारीख असेल तर पासवर्ड  हा 061099  असा असेल).  त्यानंतर ऍक्टिव्ह टेस्ट वर क्लीक करून आपली विद्याशाखा आणि प्रोग्राम नाव  निवडायचा आहे. तो क्लीक केल्यानंतर शेवटी कोर्स कोड /विषय नाव हे आपल्या वेळापत्रक / हॉल तिकिटावर दिल्याप्रमाणे निवडायचे आहे.   

= पासवर्ड योग्य आहे की नाही याची विद्यार्थीना करावी लागणार तपासण

दरम्यान, लॉगिन  यशस्वी झाल्यानंतर फोटो ओळखपत्राची पडताळणी होईल व या पडताळणी नंतर परीक्षेला प्रारंभ होईल. लॉगिन करतांना अयशस्वी झाल्यास विद्यार्थ्याने आपला पासवर्ड  हा बिनचूक आहे की नाही याची पडताळणी करावी. त्यानंतरही लॉगिन होत नसल्यास संकेतस्थळाच्या प्रशासकाशी परीक्षार्थी हा चाटबोटद्वारे तात्काळ संपर्क साधू शकतो. त्याच्या शंकेचे लगेच निरसन केले जाईल. त्यानंतरही हा प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्याने  ट्रबल लॉगिनचा पर्याय  निवडावा त्यामध्ये विद्यार्थ्याने आपला पी आर एन क्रमांक टाकावा. विद्यार्थ्याने नोंदणी  केलेल्या मोबाईलची नोंद करावी व परीक्षा निवडावी.  त्यानंतर मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी  टाकल्यानंतर विद्यार्थी परीक्षेसाठी लॉगिन होईल. हा पर्याय देखील यशस्वी झाला नाही  तर विद्यार्थ्यांनी संबधित महाविद्यालयाच्या असलेल्या आय.टी. समन्वयकाशी तात्काळ संपर्क साधावा त्यांच्याकडून विद्यार्थ्याच्या शंकेचे निरसन केले जाईल,  असे विद्यापीठ कडून  कळविण्यात आले आहे.

= आयटी समन्वयकांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

महाविद्यालयनिहाय आयटी समन्वयकांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणताही तांत्रिक व्यत्यय आला नाही तर पदवीसाठी परीक्षेचा कालावधी दीड तासांचा व पद्व्युत्तर परीक्षेसाठी दोन तासांचाच कालावधी राहील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी,  असे विद्यापीठ प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.  तांत्रिक अडचणींमुळे व्यत्यय आला तर विद्यार्थ्यांनी घाबरून जावू नये कारण परीक्षार्थींचा विंडो कालावधी तीन तासांचा असणार आहे. अशी माहिती बी.पी. पाटील यांनी दिली.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रJalgaonजळगाव