शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विद्यार्थ्यांनो ! तांत्रिक व्यत्ययाची बाळगू नका भीती, कारण विंडो कालावधी तीन तासाचा दिला जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2020 21:56 IST

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देतांना ऐनवेळी ...

जळगाव : कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या (बॅकलॉगसह) ऑनलाईन परीक्षेचा पर्याय निवडलेल्या विद्यार्थ्यांनी परीक्षा देतांना ऐनवेळी उदभवणाऱ्या कोणत्याही तांत्रिक व्यत्ययाची भीती बाळगू नये. कारण या विद्यार्थ्यांना विंडो कालावधी तीन तासाचा दिला जाणार आहे.  

            यावर्षी प्रथमच ऑनलाईन परीक्षा होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनात काही शंका आहेत. पदवी परीक्षेसाठी दिड तासाचा तर पद्व्युत्तर परीक्षेसाठी दोन तासांचा कालावधी देण्यात आला आहे. परीक्षा देतांना ऐनवेळी वीज पुरवठा खंडीत झाला अथवा काही तांत्रिक व्यत्यय आला तर कसे होईल अशी भीती विद्यार्थ्यांमध्ये आहे. त्यादृष्टीकोनातून विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक बी.पी. पाटील यांनी काही तांत्रिक बाबींची माहिती विद्यार्थ्यांना दिली आहे. ऑनलाईन परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी https://nmu.unionline.in या लिंक वर जावे  त्याठिकाणी विचारण्यात आलेला यूजर आयडी च्या ठिकाणी पीआरएन क्रमांक टाकावा. पासवर्ड साठी विद्यार्थ्याची जन्मतारीख हाच विद्यार्थ्याचा पासवर्ड  पासवर्ड आहेआहे (उदा. 06/10/1999 ही जन्मतारीख असेल तर पासवर्ड  हा 061099  असा असेल).  त्यानंतर ऍक्टिव्ह टेस्ट वर क्लीक करून आपली विद्याशाखा आणि प्रोग्राम नाव  निवडायचा आहे. तो क्लीक केल्यानंतर शेवटी कोर्स कोड /विषय नाव हे आपल्या वेळापत्रक / हॉल तिकिटावर दिल्याप्रमाणे निवडायचे आहे.   

= पासवर्ड योग्य आहे की नाही याची विद्यार्थीना करावी लागणार तपासण

दरम्यान, लॉगिन  यशस्वी झाल्यानंतर फोटो ओळखपत्राची पडताळणी होईल व या पडताळणी नंतर परीक्षेला प्रारंभ होईल. लॉगिन करतांना अयशस्वी झाल्यास विद्यार्थ्याने आपला पासवर्ड  हा बिनचूक आहे की नाही याची पडताळणी करावी. त्यानंतरही लॉगिन होत नसल्यास संकेतस्थळाच्या प्रशासकाशी परीक्षार्थी हा चाटबोटद्वारे तात्काळ संपर्क साधू शकतो. त्याच्या शंकेचे लगेच निरसन केले जाईल. त्यानंतरही हा प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्याने  ट्रबल लॉगिनचा पर्याय  निवडावा त्यामध्ये विद्यार्थ्याने आपला पी आर एन क्रमांक टाकावा. विद्यार्थ्याने नोंदणी  केलेल्या मोबाईलची नोंद करावी व परीक्षा निवडावी.  त्यानंतर मोबाईलवर ओटीपी प्राप्त होईल. तो ओटीपी  टाकल्यानंतर विद्यार्थी परीक्षेसाठी लॉगिन होईल. हा पर्याय देखील यशस्वी झाला नाही  तर विद्यार्थ्यांनी संबधित महाविद्यालयाच्या असलेल्या आय.टी. समन्वयकाशी तात्काळ संपर्क साधावा त्यांच्याकडून विद्यार्थ्याच्या शंकेचे निरसन केले जाईल,  असे विद्यापीठ कडून  कळविण्यात आले आहे.

= आयटी समन्वयकांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध

महाविद्यालयनिहाय आयटी समन्वयकांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणताही तांत्रिक व्यत्यय आला नाही तर पदवीसाठी परीक्षेचा कालावधी दीड तासांचा व पद्व्युत्तर परीक्षेसाठी दोन तासांचाच कालावधी राहील याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी,  असे विद्यापीठ प्रशासनातर्फे कळविण्यात आले आहे.  तांत्रिक अडचणींमुळे व्यत्यय आला तर विद्यार्थ्यांनी घाबरून जावू नये कारण परीक्षार्थींचा विंडो कालावधी तीन तासांचा असणार आहे. अशी माहिती बी.पी. पाटील यांनी दिली.

 

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रJalgaonजळगाव