शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

रेल्वेत सुरक्षा, सुविधा व स्वच्छता या त्रिसूत्रीची कठोर अमंलबजावणी करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:19 IST

जळगाव : भारतीय रेल्वेने सुरुवातीपासून प्रवाशांच्या आणि त्यांच्या सामानाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे यापुढेही भुसावळ विभागात डीआरएम म्हणून ...

जळगाव : भारतीय रेल्वेने सुरुवातीपासून प्रवाशांच्या आणि त्यांच्या सामानाच्या सुरक्षेला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे यापुढेही भुसावळ विभागात डीआरएम म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर प्रवाशांच्या सुरक्षेला पहिले प्राधान्य आहे. या सोबतच प्रवाशांना मिळणाऱ्या सुविधा व स्वच्छतेवर भर देऊन या त्रिसूत्रीची रेल्वे प्रशासनात कठोर अमंलबजावणी करणार असल्याची माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाचे नवनियुक्त डीआरएम शंभू शरद केडिया यांनी ‘लोकमत’शी बोलतांना दिली. यावेळी त्यांनी वीजबिलापोटी रेल्वेलाही कोट्यवधी रुपये खर्च येतो. त्यामुळे हा खर्च वाचविण्यासाठी येत्या काळात सौर ऊर्जा आणि पवन उर्जेची केंद्रे उभारण्यात येणार असल्याचेही केडिया यांनी सांगितले.

प्रश्न : डीआरएमपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर, पुढील दोन वर्षांचे आपले व्हिजन काय?

जळगाव : मध्य रेल्वे मार्गावरील भुसावळ विभाग हा सर्वात मोठा असून, सध्या भुसावळ विभागात रेल्वेची अनेक विकास कामे सुरू आहेत. ती कामे वेळेत आणि लवकरात लवकर प्रवाशांच्या सुविधेसाठी कशी पूर्ण होतील. या बाबत संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन, त्यांच्या काही अडचणी असतील, तर त्या सोडवून ही विकास कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार आहे.

प्रश्न : सुरक्षा, सुविधा व स्वच्छतेच्या निर्णयाची अंमलबजावणी कशी करणार आहात?

उत्तर : सुरक्षेबाबत सांगायचे म्हणजे, गाड्यांना कुठे अपघात होणार नाही, रुळावरून गाडी उतरणार नाही, आगीच्या घटना कुठे घडणार नाही, या घटनांबाबत कर्मचाऱ्यांना सतत दक्ष राहण्याच्या सूचना करणार आहोत. दुसरा मुद्दा म्हणजे स्टेशनवर ज्या सुविधा आहेत, त्या सुविधा प्रवाशांना मिळत आहेत का नाही, याबाबत अधिकाऱ्यांना लक्ष देण्याबाबत सूचना करणार आहे. महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे स्वत:ची आणि कार्यालयाचींही स्वच्छता ठेवण्यासाठी आग्रह धरणार आहे. यासाठी भुसावळला आल्यापासून दोन दिवसात अनेक विभागांच्या कार्यालयात जाऊन तेथील स्वच्छतेची पाहणी केली.

प्रश्न: गेल्या आठवड्यात प्रवाशावर चाकू हल्ला झाल्याची घटना घडली, या घटनेनंतर प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे काय निर्णय घेतला.?

उत्तर : अशा घटना पुन्हा घडू नये, यासाठी आरपीएफ आणि जीआरपी मिळून प्रवाशांच्या सुरक्षेकडे लक्ष देत आहेत. गाडीत बसल्यानंतर प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि आरामदायी होण्यासाठी रेल्वे प्रशासन सतत कटिबद्ध असते. त्यामुळे यापुढच्या काळातही प्रवाशांच्या सुरक्षेकडे आम्ही अधिक लक्ष देणार आहोत.

प्रश्न : जळगाव ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम संथगतीने सुरू आहे, या कामाला वेग येण्यासाठी काय निर्णय घेणार आहात?

जळगाव : या प्रकल्पाची मी अजून माहिती घेतलेली नाही. माहिती घेतल्यानंतर पुढील निर्णय घेऊ. मनमाड ते इगतपुरी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाला मंजुरी मिळाली असून, याचा डीपीआर तयार करण्याचे सुरू आहे. तसेच जळगाव ते भुसावळ दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम झाले असून, चौथ्या मार्गाचेही काम सुरू झाले असल्याचे संबंधित विभागातर्फे सांगण्यात आले.

प्रश्न : सौर ऊर्जा वापरण्याबाबत रेल्वे मंत्रालयाकडून वेळोवेळी आवाहन करण्यात येत आहे, भुसावळ विभागात सौर ऊर्जा निर्मिती केंद्र उभारण्याचा विचार आहे का?

उत्तर : भुसावळ विभागात सौर उर्जेच्या निर्मितीबाबत नुकतीच विद्युत विभागाची बैठक घेतली. त्यांच्याकडून सौर ऊर्जा निर्मिती केंद्र उभारण्याचे काम पूर्वीपासून सुरू झाले असल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे आगामी काळात सौर उर्जेसोबत पवन उर्जा वीजनिर्मिती केंद्रही सुरू करण्याचा विचार आहे. या विजेमुळे रेल्वेचा विजेवरील खर्चही कमी होणार आहे. कारण, कोरोनामुळे रेल्वेच्याही उत्पन्नावर परिणाम झाल्यामुळे, विजेचा खर्च कसा कमी होईल, याचा आम्ही विचार करत आहोत.