शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

‘जलयुक्त’च्या बंधाऱ्यांना पहिल्याच पावसात गळती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2019 20:57 IST

  अमळनेर : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट बंधाऱ्यांची कामे निकृष्ट दजार्ची झाली आहेत. अनेक बंधाºयांना पहिल्या पावसातच गळती ...

 

अमळनेर : तालुक्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत सिमेंट बंधाऱ्यांची कामे निकृष्ट दजार्ची झाली आहेत. अनेक बंधाºयांना पहिल्या पावसातच गळती लागली आहे. सिमेंट बंधाºयांसह बांधबंदिस्ती, खोलीकरण आदी कामेही निकृष्ट दर्जाची झाली आहेत. विधानसभा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी पावसाळी अधिवेशनात केलेल्या आदेशानुसार अमळनेर तालुक्यातील जलयुक्त कामांच्या गैरव्यवहाराची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करावी, अशी मागणी भाजपच्या अमळनेर शहराध्यक्ष शीतल देशमुख यांनी केली आहे.याबाबत त्यांनी पत्रात म्हटले आहे की, जलयुक्त शिवार योजनेंतर्गत तालुक्यातील अनेक गावांत जुन्या सिमेंट बंधाºयांची दुरुस्ती व खोलीकरणाच्या नावाने फक्त आजूबाजूला मातीचा भराव टाकला आहे. ग्रामस्थांनी काम सुरू असताना संबंधित अधिकारी, ठेकेदारास वारंवार निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. मात्र, तरीही त्यांनी हेतुपुरस्सर त्याकडे दुर्लक्ष केले आहे.पिंगळवाडे येथेही असाच प्रकार घडला. सिमेंट बंधाºयाचे ४ लाख ३२ हजार ४८६ रुपये (पहिला टप्पा), २ लाख ५ हजार ३५५ रुपये (दुसरा टप्पा) व ६ लाख ३७ हजार ८४१ रुपये (तिसरा टप्पा) एवढी रक्कम ठेकेदारास अदा करण्यात आली आहे. मात्र, सुरवातीच्या पावसात बंधाºयांना गळती लागून माती वाहून गेली आहे. याबाबत तेथील सरपंचांनी तक्रार केल्यानंतर माती टाकून डागडुजी करण्यात आली. प्रत्यक्षात हे काम देखील थातूरमातूर आणि चुकीच्या पद्धतीने केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.कृषी विभाग होतोय बेदखलजलयुक्त मोहिमेंतर्गत शासनाने कोट्यवधींचा निधी खर्च केला. मात्र तालुक्यातील अमळगाव, पातोंडा, जानवे, मारवड, मांडळ, मुडी, जवखेडा आदी गावांतील कामेही निकृष्ट दर्जाची झाली आहेत. ही जबाबदारी कृषी विभागाची असून अधिकारी, कृषी सहायक व पर्यवेक्षकांनी याकडे सोईस्कररीत्या दुर्लक्ष केले आहे.कृषी सहायकांची व्हावी चौकशीअमळनेर येथील अनेक कृषी सहायकांनीच तालुक्यातील जलयुक्तच्या कामांचे ठेके घेतल्याची ओरड शेतकºयांमध्ये आहे. काही कृषी सहायकांनी नातेवाइकांच्या नावाने ठेके घतले. जेसीबी आदी यंत्रांचे आवास्तव बिल कृषी विभागाशी संगनमत करून लाटल्याचा शेतकºयांचा आरोप आहे.राज्यातील जलयुक्तच्या कामाबाबत आलेल्या तक्रारींवरून या गैरव्यवहाराची लाचलुचपत विभागातर्फे चौकशी करण्यात येईल, असे आदेश विधानसभा सभापती रामराजे निंबाळकर यांनी प्रश्नोत्तराच्या तासात पावसाळी अधिवेशनात दिले आहेत. जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांनीदेखील सभापतींच्या निर्देशानुसार चौकशी करण्यात येईल, असे जाहीर केले आहे. या अनुषंगाने अमळनेर तालुक्यात सदरील कामांची त्वरित चौकशी करावी. यासंदर्भात जलसंधारणमंत्री तसेच मुख्यमंत्र्यांना निवेदन देणार आहोत. या प्रश्नी आंदोलन उभे करण्याची तयारी आहे. गैरव्यवहार करणाºया ठेकेदार, कृषी सहायक व इतर अधिकाºयांची नावे जनतेसमोर उघड करू, असा इशारा देशमुख यांनी दिला आहे.