शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

कहाणी लॉर्ड्स विजयाची, आक्रमता, धैर्य आणि चिवटपणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:20 IST

लॉर्डस कसोटीत भारताने मिळवलेला विजय हा कधीही पराभव न पत्करण्याची वृत्ती, सर्वोत्कृष्ठ वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी, विराट कोहलीचे आक्रमक ...

लॉर्डस कसोटीत भारताने मिळवलेला विजय हा कधीही पराभव न पत्करण्याची वृत्ती, सर्वोत्कृष्ठ वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी, विराट कोहलीचे आक्रमक नेतृत्व यांच्यामुळे झाला. विशेषत: शेवटच्या दोन सत्रांमध्ये भारताने इंग्लंडला जसे बाद केले तो त्यांच्यासाठी तर अपमानच होता.

भारतीय संघाने दाखवलेल्या धैर्यामुळे खूप काही झाले. जसप्रीत बुमराहने अँडरसनवर बाऊन्सर फेकले. मला वाटते की अकराव्या क्रमांकावरील फलंदाज हा या गोष्टींसाठी तयार नसतो. मात्र बुमराह आणि कोहली हे त्यामुळे गुन्हेगार ठरत नाहीत.

इंग्लंडचे खेळाडूदेखील भारतीय खेळाडूंना नडत होते. त्यामुळे तणाव वाढत होता. शिवाय अँडरसनला फेकलेल्या ८-१० बाऊन्सरच्या बदल्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी जवळपास संपूर्ण सत्रच भारताच्या तळाच्या फलंदाजांना तशीच गोलंदाजी केली. मग हेच त्यांच्यावर बुमरँगप्रमाणे उलटले.

कशी असेल पुढची मालिका?

लॉर्ड्सवर विजय मिळवताना भारताने गेल्या काही वर्षांत अडचणीच्या ठरलेल्या गोष्टी दूर केल्या आहेत. त्यात सलामीची जोडी आणि सातत्याने संघाच्या विजयात योगदान देणारे गोलंदाज पुढे आलेत.

कोहली कर्णधार झाल्यापासून भारतीय संघाला त्याची कमतरता भासत होती. त्यामुळे परदेश दौऱ्यांमध्ये भारताला धक्के बसले. कोहली आणि शास्त्री यांनी आक्रमक रणनीती अवलंबली आणि पाच गोलंदाज खेळवले.

दक्षिण आफ्रिका (२०१७), इंग्लंड (२०१८), न्यूझीलंड (२०१९)मध्ये हे बुमरँग ठरले. कारण सलामीवीर अपयशी ठरले आणि तळाचे फलंदाज लवकरच बाद झाले. यावेळी इंग्लंडमध्ये हे कसे असेल.

रोहित शर्मा इंग्लंडमधील स्विंग आणि सीम कंडिशन हाताळू शकेल की नाही, अशी भीती होती. २०१९च्या विश्वचषकात शर्माने विक्रमी पाच शतके केली होती. पण कसोटी क्रिकेट हा एकदिवसीय आणि टी२०पेक्षा वेगळा खेळ आहे.

शर्माने टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अजून दोन कसोटींमध्ये त्याने फक्त वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या स्थितीतच नाही तर आक्रमक फटके मारून गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. लॉर्ड्सवर शतक पूर्ण न होणे हे दुर्दैवी होते.

सलामीच्या जोडीत सर्वात महत्त्वाची भूमिका ही के.एल. राहुल याची आहे. चौथ्या पसंतीचा सलामीवीर म्हणून त्याने दौऱ्याची सुरुवात केली. शुभमन गिल आणि मयांक अग्रवाल यांच्या दुखापतींनी दौऱ्यात निवडकर्ते राहुलकडे वळले आणि त्याने या संधीचे सोने केले. सध्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू आहे. त्याचे लॉर्ड्सवरील शतक उत्कृष्ठ होते.

भारताचे तळाचे फलंदाज हे लवकर बाद होण्यासाठीच कुप्रसिद्ध होते. मात्र या मालिकेने हा बदलदेखील घडवला. ट्रेंट ब्रिजवर पहिल्या डावातील आघाडी ही तळाच्या फलंदाजांमुळेच मिळाली होती. आणि लॉर्ड्सवर तर शमी आणि बुमराहने अक्षरश: मोठा बदल घडवला.

न्यूझीलंड विरोधात डब्लुटीसी फायनलसह या दौऱ्यात मधल्या फळीवर लक्ष केंद्रित केले आहे. पुजारा आणि रहाणे यांनी शतकी भागीदारी केली, मात्र ते त्यांच्या सर्वोत्तम फॉर्मपासून अजून दूर आहेत. ऋषभ पंतदेखील अजून चमकलेला नाही.

सर्वात निराश केले ते विराट कोहली याने. त्याने २०१८ मध्ये जवळपास ६०० धावा केल्या होत्या. तेव्हाच्या त्याच्या फॉर्मपेक्षा हे खूप खाली आहे. तो नेतृत्व उत्तम करतो. पण गोलंदाजांची मेहनत आणि मालिकेतील आघाडी वाया जाणार नाही हे मधल्या फळीला बघावे लागेल.