शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

कहाणी लॉर्ड्स विजयाची, आक्रमता, धैर्य आणि चिवटपणाची

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 04:20 IST

लॉर्डस कसोटीत भारताने मिळवलेला विजय हा कधीही पराभव न पत्करण्याची वृत्ती, सर्वोत्कृष्ठ वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी, विराट कोहलीचे आक्रमक ...

लॉर्डस कसोटीत भारताने मिळवलेला विजय हा कधीही पराभव न पत्करण्याची वृत्ती, सर्वोत्कृष्ठ वेगवान गोलंदाजी आणि फलंदाजी, विराट कोहलीचे आक्रमक नेतृत्व यांच्यामुळे झाला. विशेषत: शेवटच्या दोन सत्रांमध्ये भारताने इंग्लंडला जसे बाद केले तो त्यांच्यासाठी तर अपमानच होता.

भारतीय संघाने दाखवलेल्या धैर्यामुळे खूप काही झाले. जसप्रीत बुमराहने अँडरसनवर बाऊन्सर फेकले. मला वाटते की अकराव्या क्रमांकावरील फलंदाज हा या गोष्टींसाठी तयार नसतो. मात्र बुमराह आणि कोहली हे त्यामुळे गुन्हेगार ठरत नाहीत.

इंग्लंडचे खेळाडूदेखील भारतीय खेळाडूंना नडत होते. त्यामुळे तणाव वाढत होता. शिवाय अँडरसनला फेकलेल्या ८-१० बाऊन्सरच्या बदल्यात इंग्लंडच्या वेगवान गोलंदाजांनी जवळपास संपूर्ण सत्रच भारताच्या तळाच्या फलंदाजांना तशीच गोलंदाजी केली. मग हेच त्यांच्यावर बुमरँगप्रमाणे उलटले.

कशी असेल पुढची मालिका?

लॉर्ड्सवर विजय मिळवताना भारताने गेल्या काही वर्षांत अडचणीच्या ठरलेल्या गोष्टी दूर केल्या आहेत. त्यात सलामीची जोडी आणि सातत्याने संघाच्या विजयात योगदान देणारे गोलंदाज पुढे आलेत.

कोहली कर्णधार झाल्यापासून भारतीय संघाला त्याची कमतरता भासत होती. त्यामुळे परदेश दौऱ्यांमध्ये भारताला धक्के बसले. कोहली आणि शास्त्री यांनी आक्रमक रणनीती अवलंबली आणि पाच गोलंदाज खेळवले.

दक्षिण आफ्रिका (२०१७), इंग्लंड (२०१८), न्यूझीलंड (२०१९)मध्ये हे बुमरँग ठरले. कारण सलामीवीर अपयशी ठरले आणि तळाचे फलंदाज लवकरच बाद झाले. यावेळी इंग्लंडमध्ये हे कसे असेल.

रोहित शर्मा इंग्लंडमधील स्विंग आणि सीम कंडिशन हाताळू शकेल की नाही, अशी भीती होती. २०१९च्या विश्वचषकात शर्माने विक्रमी पाच शतके केली होती. पण कसोटी क्रिकेट हा एकदिवसीय आणि टी२०पेक्षा वेगळा खेळ आहे.

शर्माने टीकाकारांचा चांगलाच समाचार घेतला आहे. अजून दोन कसोटींमध्ये त्याने फक्त वेगवान गोलंदाजांना अनुकूल असलेल्या स्थितीतच नाही तर आक्रमक फटके मारून गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. लॉर्ड्सवर शतक पूर्ण न होणे हे दुर्दैवी होते.

सलामीच्या जोडीत सर्वात महत्त्वाची भूमिका ही के.एल. राहुल याची आहे. चौथ्या पसंतीचा सलामीवीर म्हणून त्याने दौऱ्याची सुरुवात केली. शुभमन गिल आणि मयांक अग्रवाल यांच्या दुखापतींनी दौऱ्यात निवडकर्ते राहुलकडे वळले आणि त्याने या संधीचे सोने केले. सध्या मालिकेत भारताकडून सर्वाधिक धावा करणारा तो खेळाडू आहे. त्याचे लॉर्ड्सवरील शतक उत्कृष्ठ होते.

भारताचे तळाचे फलंदाज हे लवकर बाद होण्यासाठीच कुप्रसिद्ध होते. मात्र या मालिकेने हा बदलदेखील घडवला. ट्रेंट ब्रिजवर पहिल्या डावातील आघाडी ही तळाच्या फलंदाजांमुळेच मिळाली होती. आणि लॉर्ड्सवर तर शमी आणि बुमराहने अक्षरश: मोठा बदल घडवला.

न्यूझीलंड विरोधात डब्लुटीसी फायनलसह या दौऱ्यात मधल्या फळीवर लक्ष केंद्रित केले आहे. पुजारा आणि रहाणे यांनी शतकी भागीदारी केली, मात्र ते त्यांच्या सर्वोत्तम फॉर्मपासून अजून दूर आहेत. ऋषभ पंतदेखील अजून चमकलेला नाही.

सर्वात निराश केले ते विराट कोहली याने. त्याने २०१८ मध्ये जवळपास ६०० धावा केल्या होत्या. तेव्हाच्या त्याच्या फॉर्मपेक्षा हे खूप खाली आहे. तो नेतृत्व उत्तम करतो. पण गोलंदाजांची मेहनत आणि मालिकेतील आघाडी वाया जाणार नाही हे मधल्या फळीला बघावे लागेल.