शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
4
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
5
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
6
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
7
Dahi Handi 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
8
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
9
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
10
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
11
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
12
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
13
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
14
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
15
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
16
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
17
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
18
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
19
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
20
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द

वादळाने केले १३ हजार १०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात झालेल्या जोरदार वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १३ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात झालेल्या जोरदार वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १३ हजार १०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. त्यात आठ तालुक्यात २४७ गावांमधील २० हजार १५९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. भडगाव, जामनेर, चाळीसगाव आणि एरंडोल या गावांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने त्याचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पाठवला आहे. यात बागायत पिके ज्वारी, गहू, मका, बाजरी, हरभरा, कांदा, तीळ, सूर्यफुल, शेवगा, इतर भाजापीला, यांच्यासोबतच फळपिके केळी, पपई, लिंबू व इतर फळांच्या बागांचे देखील नुकसान झाले आहे. यात जळगाव तालुक्यात ४, भडगावला ५०, पाचोरा २४, जामनेर ५०, चाळीसगाव ४८. पारोळा १५, एरंडोळ ५५ आणि धरणगाव तालुक्यात एका गावात नुकसान झाले आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हा मका या पिकाला बसला आहे. या आठ तालुक्यांमध्ये ३ हजार ९६९ हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले आहे. तर त्यासोबतच बाजरी, हरभरा आणि कांद्यालादेखील मोठा फटका बसला आहे. एरंडोल तालुक्यात तीळ आणि सूर्यफुल या दोन तेलबियांच्या पिकांना या वादळाने साफ आडवे केले. एरंडोल तालुक्यात ४३ हेक्टरवरील तीळ आणि ७७ हेक्टरवरील सूर्यफुलाचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे आणि पावसाने या नुकसानीचा पंचनामा तातडीने कृषी विभागाने केला आणि गुरुवारी याचा अहवाल जिल्हाधिकारी राऊत यांना सादर करण्यात आला आहे.