शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

वादळाने केले १३ हजार १०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात झालेल्या जोरदार वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १३ हजार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : मंगळवारी सायंकाळी जिल्ह्यात झालेल्या जोरदार वादळी वारे आणि अवकाळी पावसाने जिल्ह्यातील १३ हजार १०६ हेक्टरवरील पिकांचे नुकसान केले आहे. त्यात आठ तालुक्यात २४७ गावांमधील २० हजार १५९ शेतकऱ्यांना फटका बसला आहे. भडगाव, जामनेर, चाळीसगाव आणि एरंडोल या गावांना त्याचा सर्वाधिक फटका बसला आहे.

जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने त्याचा अहवाल जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना पाठवला आहे. यात बागायत पिके ज्वारी, गहू, मका, बाजरी, हरभरा, कांदा, तीळ, सूर्यफुल, शेवगा, इतर भाजापीला, यांच्यासोबतच फळपिके केळी, पपई, लिंबू व इतर फळांच्या बागांचे देखील नुकसान झाले आहे. यात जळगाव तालुक्यात ४, भडगावला ५०, पाचोरा २४, जामनेर ५०, चाळीसगाव ४८. पारोळा १५, एरंडोळ ५५ आणि धरणगाव तालुक्यात एका गावात नुकसान झाले आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका हा मका या पिकाला बसला आहे. या आठ तालुक्यांमध्ये ३ हजार ९६९ हेक्टरवरील मक्याचे नुकसान झाले आहे. तर त्यासोबतच बाजरी, हरभरा आणि कांद्यालादेखील मोठा फटका बसला आहे. एरंडोल तालुक्यात तीळ आणि सूर्यफुल या दोन तेलबियांच्या पिकांना या वादळाने साफ आडवे केले. एरंडोल तालुक्यात ४३ हेक्टरवरील तीळ आणि ७७ हेक्टरवरील सूर्यफुलाचे नुकसान झाले आहे.

मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वारे आणि पावसाने या नुकसानीचा पंचनामा तातडीने कृषी विभागाने केला आणि गुरुवारी याचा अहवाल जिल्हाधिकारी राऊत यांना सादर करण्यात आला आहे.