शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
2
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
4
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
5
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
6
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
7
पदकं फेकली, प्रमाणपत्रं फाडली, भाजपा खासदारांच्या क्रीडा महोत्सवात खेळाडूंचा संताप, कारण काय?
8
"दोषींना शिक्षा झालीच पाहिजे..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येवरून भारताने सुनावलं
9
थरकाप उडवणारा VIDEO! चिनी शस्त्रांची पुन्हा पोलखोल, थायलंड विरोधात वापरताना रॉकेट सिस्टिमचाच स्फोट; कंबोडियाच्या 8 जवानांचा मृत्यू
10
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
11
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
12
भाजपा आमदारांच्या ‘ब्राह्मण भोजना’मुळे उत्तर प्रदेशच्या राजकारणात खळबळ, भाजपामध्ये चाललंय काय? 
13
काही केलं तरी रात्री झोपच येत नाही? मग करा 'हे' एक छोटसं काम; १० मिनिटांत व्हाल डाराडूर
14
Shehnaaz Gill : "इथे सगळे राक्षस, मी खूप स्ट्रगल...", शहनाज गिलची झाली फसवणूक, इंडस्ट्रीबद्दल मोठा खुलासा
15
उद्धव ठाकरेंच्या भेटीत काय ठरले? जागावाटपाबाबत बैठकीत चर्चा झाली का?; जयंत पाटील म्हणाले...
16
अडीच वर्षातील काम जनता विसरणार नाही; शिवसेनेत येताच प्रकाश महाजनांचे शिंदेंबाबत कौतुकोद्गार
17
रिपल इफेक्ट : ग्राहकांच्या सवयी बाजाराच्या हालचालींवर कशा परिणाम करतात?
18
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
19
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
Daily Top 2Weekly Top 5

साठवणुकीची अडचण, त्यात अवकाळी पावसाचा जोर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:12 IST

उत्पादन झालेला कांदा दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी खूप अडचणी येतात. त्यातच जळगाव जिल्ह्याचे तापमान हे उन्हाळ्यात ४० अंशाच्या वरती पोहोचत ...

उत्पादन झालेला कांदा दीर्घकाळ साठवून ठेवण्यासाठी खूप अडचणी येतात. त्यातच जळगाव जिल्ह्याचे तापमान हे उन्हाळ्यात ४० अंशाच्या वरती पोहोचत असते. हे वातावरण कांदा साठवणीसाठी पोषक नसून नाशिक जिल्ह्याच्या शेतकऱ्यांप्रमाणे जळगाव येथील शेतकऱ्यांना कांदा दीर्घकाळ साठवून ठेवता येत नाही. कालांतराने तापमानामुळे हा कांदा खराब होतो. तरीदेखील काही शेतकरी कांदा चाळीच्या माध्यमातून हा कांदा साठवून ठेवतात; परंतु नाशिक जिल्ह्यातील शेतकरी साठवून ठेवलेला कांदा हा पोळा सणानंतर विक्रीस सुरुवात करतात. दुसरीकडे जळगाव जिल्ह्यातील कांदा पोळा सणापर्यंत टिकत नाही; त्यामुळे लवकर हा कांदा बाजारपेठेत न्यावा लागतो आणि बाजारभाव कमी असल्यामुळे उत्पादन आणि खर्चामध्ये तफावत असते. त्यामुळे येथील शेतकरी कांदा लागवडीकडे दुर्लक्ष करत आहेत.

साधारणत: कांदा लागवड डिसेंबर महिन्यात ते जास्तीत जास्त जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत करतात. सुरुवातीला कांद्याच्या फुलांपासून बी धरून ते बी पाण्याचा निचरा होणाऱ्या वाफ्यांमध्ये टाकले जाते. कांद्याच्या बीपासून रोप तयार होण्यासाठी साधारणतः ४५ ते ५० दिवस इतका कालावधी लागतो. कांदा लागवडीनंतर ते काढणीपर्यंत ९० दिवसांचा काळ असतो; परंतु येथील हवामान आणि जमीन यामुळे आपल्याकडील कांद्याला साधारणतः साडेतीन ते चार महिने कालावधी कांदा तयार होण्यासाठी लागत असतो.

एका एकरामध्ये बियाण्यापासून ते काढणीपर्यंत ३५ ते ४० हजार रुपयांपर्यंत खर्च हा कांदा लागवडीसाठी येतो. या परिसरात साधारणत: एका एकरामध्ये ८० ते ९० क्विंटल कांदा शेतकरी पिकवतो. गेल्यावर्षी कोरोनाच्या महामारीमध्ये लॉकडाऊनच्या काळात मातीमोल भावात कांदा विकला होता.

आंतरपीक म्हणून कांद्याला पसंती

गिरणा परिसरात गुढे, कोळगाव, खेडगाव, पथराड, नावरे, सावदे, जुवार्डी, बहाळ तसेच संपूर्ण भडगाव तालुक्यात लिंबूचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. काही प्रमाणात पेरूचेदेखील उत्पादन शेतकरी घेतात. या परिसरातील जमीन काळी कसदार असल्याने शेतकरी लिंबू किंवा पेरू फळबाग लावली की, त्यात तीन ते चार वर्षे आंतरपीक घेतात. त्यामध्ये अनेक शेतकरी कांदा पिकाला आंतरपीक म्हणून पसंती देत असतात.

कांदाचाळ आणि शेतकरी

बरेच शेतकरी यंदा कांदा लावला की पुढच्या वर्षी कांद्याचे पीक घेत नाहीत. त्यामुळे एका वर्षासाठी कांदाचाळीसाठी शेतकरी लाखोंचा खर्च करत नाहीत. म्हणूनच शेतकऱ्यांना साठवण्यासाठी कांदाचाळ उपलब्ध नसल्यामुळे माल निघाल्यावर लगेचच चार ते पाच रुपये प्रतिकिलो दराने विकण्याची वेळ येते. लगेच मार्केटला पाठवला तर बाजारभाव मिळत नाही आणि साठवला तर तो तापमानामुळे जास्त काळ टिकत नाही, अशा दुहेरी संकटात गिरणा पट्ट्यातील शेतकरी सापडतो.

यावर्षी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक जिल्ह्यांत गारपीट, अवकाळी पावसामुळे कांदा खराब झाला. त्यामुळे आज चांगला कांदा दहा रुपयांपासून ते पंधरा, सोळा रुपये प्रतिकिलोपर्यंत विकला जात आहे; परंतु अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे आलेल्या उत्पादनात झालेल्या मोठ्या प्रमाणात घटीमुळे उत्पादन खर्च आणि उत्पादन यामध्ये ताळमेळ बसताना दिसत नाही. जळगाव जिल्ह्यात कांद्याला चांगली बाजारपेठ नसल्यामुळे येथील शेतकऱ्याला आपला माल नाशिक जिल्ह्यातील उमराणा, मुगंशे, चांदवड, मनमाड या बाजारपेठांत घेऊन जावा लागतो.

जळगाव येथे कांदा मार्केट आहे; परंतु तेथे कांदा हा गोण्यांमध्ये भरून घेऊन जावा लागतो. गोण्यांचा खर्च आणि भरण्याची मजुरी न परवडण्यासारखी आहे. चाळीसगाव येथे स्पेशल कांदा मार्केट गेल्या तीन चार वर्षांपासून सुरू करण्यात आले असले तरी उमराणा, मुगंसे, पिंपळगावच्या बाजारभावापेक्षा चारशे, पाचशे रुपये भाव कमी असतो.

कांदा पीक लागवडीसाठी मेहनत आणि खर्च जास्त येतो. उत्पादन आणि खर्च याचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकरी अडचणीत आहेत.

-संकेत जगताप, गुढे

चाळीसगाव कांदा बाजार समितीत इतर बाजार समित्यांप्रमाणे जास्तीत जास्त बाजारभावामध्ये कांदा खरेदी करावा, अशी आम्हा शेतकऱ्यांची मागणी आहे.

-प्रमोद महाजन, गुढे

===Photopath===

270521\27jal_1_27052021_12.jpg

===Caption===

साठवणुकीचा अभाव त्यात अवकाळी पावसाचा जोर