शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

रस्त्यांचे ढिसाळ काम करणाऱ्या ठेकेदारांची बिले रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, मनपाकडून तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्तीची कामे केली जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, मनपाकडून तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्तीची कामे केली जात आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर मनपाकडून जी दुरुस्ती करण्यात आली होती त्यापैकी अनेक रस्त्यांचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले होते. याबाबत मनपा प्रशासनाने नेमलेल्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, रस्त्यांची दुरुस्ती ही तकलादू स्वरुपाची असल्याचे आढळून आल्यानंतर दोन ठेकेदारांची बिले मनपाकडून रोखण्यात आली आहेत.

मनपा प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना या रस्त्यांची पुन्हा नव्याने दुरुस्ती करण्याचा सूचना दिल्या आहेत. महापालिकेकडून ९ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून, शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, त्यापैकी ४ ते ५ कोटी रुपयांच्या निधीतून कामे झाल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे. त्यात ज्या ठिकाणी दुरुस्तीची कामे झाली आहेत. त्या ठिकाणची कामेदेखील तकलादू स्वरुपातील आहेत. त्यामुळे मनपाचा ९ कोटींचा निधी अक्षरश: पाण्यातच गेल्याचे दिसून येत आहे.

या ठेकेदारांची रोखण्यात आली बिले

१. सुशील डोंगरे

२. राजकिरण चौधरी

३. मनपाकडून काही ठेकेदारांच्या बिलांचे प्रस्तावदेखील लेखा विभागाकडे पाठविण्यात आलेले नाहीत.

मनपा करणार रस्त्यांचे ऑडिट

मनपाकडून लवकरच शहरातील दुरुस्ती कामांचे ऑडिट करण्यात येणार आहे. हे ऑडिटचे काम एका त्रयस्थ संस्थेला दिले जाणार आहे. तसेच यासाठी मनपातील काही अधिकारीदेखील नेमण्यात येणार आहेत. ऑडिटनंतर ज्या मक्तेदारांचे काम दर्जाहीन आढळून येणार अशा ठेकेदारांसह मनपा अभियंत्यांवरदेखील कठोर कारवाई करण्याचे संकेत मनपा प्रशासनाने दिले आहेत. शहरातील कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही मनपाकडून सांगण्यात आले.

९ कोटींच्या कामांचे काय ?

शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाने प्रभागनिहाय प्रत्येकी ५० लाख रुपयांप्रमाणे ९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. मात्र, त्यापैकी ४ ते ५ कोटींच्या निधीतून दुरुस्ती झाल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र रस्त्यांवर कामेच झालेली दिसून येत नाहीत. तसेच आता या कामांची मुदतदेखील संपली आहे. त्यामुळे मुदतीत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर मनपा प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

कोट...

काही कामांबाबत मनपा अधिकाऱ्यांनी गुणवत्ता नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे तीन अभियंत्यांची बिलांची रक्कम रोखण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी कामांची गुणवत्ता चांगली नाही अशा ठिकाणी पुन्हा नव्याने कामे करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

-अरविंद भोसले, शहर अभियंता, मनपा