शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांचे ढिसाळ काम करणाऱ्या ठेकेदारांची बिले रोखली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, मनपाकडून तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्तीची कामे केली जात ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. मात्र, मनपाकडून तात्पुरत्या स्वरुपात दुरुस्तीची कामे केली जात आहेत. पावसाळ्याच्या तोंडावर मनपाकडून जी दुरुस्ती करण्यात आली होती त्यापैकी अनेक रस्त्यांचे पहिल्याच पावसात पितळ उघडे पडले होते. याबाबत मनपा प्रशासनाने नेमलेल्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता, रस्त्यांची दुरुस्ती ही तकलादू स्वरुपाची असल्याचे आढळून आल्यानंतर दोन ठेकेदारांची बिले मनपाकडून रोखण्यात आली आहेत.

मनपा प्रशासनाने संबंधित ठेकेदारांना या रस्त्यांची पुन्हा नव्याने दुरुस्ती करण्याचा सूचना दिल्या आहेत. महापालिकेकडून ९ कोटी ५० लाख रुपयांच्या निधीची तरतूद करून, शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, त्यापैकी ४ ते ५ कोटी रुपयांच्या निधीतून कामे झाल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे. त्यात ज्या ठिकाणी दुरुस्तीची कामे झाली आहेत. त्या ठिकाणची कामेदेखील तकलादू स्वरुपातील आहेत. त्यामुळे मनपाचा ९ कोटींचा निधी अक्षरश: पाण्यातच गेल्याचे दिसून येत आहे.

या ठेकेदारांची रोखण्यात आली बिले

१. सुशील डोंगरे

२. राजकिरण चौधरी

३. मनपाकडून काही ठेकेदारांच्या बिलांचे प्रस्तावदेखील लेखा विभागाकडे पाठविण्यात आलेले नाहीत.

मनपा करणार रस्त्यांचे ऑडिट

मनपाकडून लवकरच शहरातील दुरुस्ती कामांचे ऑडिट करण्यात येणार आहे. हे ऑडिटचे काम एका त्रयस्थ संस्थेला दिले जाणार आहे. तसेच यासाठी मनपातील काही अधिकारीदेखील नेमण्यात येणार आहेत. ऑडिटनंतर ज्या मक्तेदारांचे काम दर्जाहीन आढळून येणार अशा ठेकेदारांसह मनपा अभियंत्यांवरदेखील कठोर कारवाई करण्याचे संकेत मनपा प्रशासनाने दिले आहेत. शहरातील कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचेही मनपाकडून सांगण्यात आले.

९ कोटींच्या कामांचे काय ?

शहरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनपाने प्रभागनिहाय प्रत्येकी ५० लाख रुपयांप्रमाणे ९ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली होती. मात्र, त्यापैकी ४ ते ५ कोटींच्या निधीतून दुरुस्ती झाल्याचा दावा मनपाकडून केला जात आहे. प्रत्यक्षात मात्र रस्त्यांवर कामेच झालेली दिसून येत नाहीत. तसेच आता या कामांची मुदतदेखील संपली आहे. त्यामुळे मुदतीत काम न करणाऱ्या ठेकेदारांवर मनपा प्रशासन कारवाई करणार का, असा प्रश्न आता निर्माण होत आहे.

कोट...

काही कामांबाबत मनपा अधिकाऱ्यांनी गुणवत्ता नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे तीन अभियंत्यांची बिलांची रक्कम रोखण्यात आली आहे. तसेच ज्या ठिकाणी कामांची गुणवत्ता चांगली नाही अशा ठिकाणी पुन्हा नव्याने कामे करण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत.

-अरविंद भोसले, शहर अभियंता, मनपा