शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

महामंडळांकडील वसुली थांबवा - सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 11:41 IST

वर्षभर नोटीस न देण्याचा सूचना

जळगाव : सामाजिक न्याय व अल्पसंख्याक विकास विभागाअंतर्गत असलेल्या विविध आर्थिक महामंडळांकडील थकबाकीदारांना वसुलीसाठी नोटीस देऊ नका, वर्षभर वसुलीसाठीही जाऊ नका, अशा सूचना सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी बुधवार, १२ डिसेंबर रोजी अजिंठा विश्राम गृहावर आयोजित आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या.कांबळे यांनी यावेळी अल्पसंख्याक विकास विभागाच्या कामकाजाचा आढावा घेतला. तसेच महात्मा फुले विकास महामंडळ, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, महाराष्ट्र राज्य अपंग व वित्त व विकास महामंडळ, ओबीसी विकास महामंडळ, वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळाचा सविस्तर आढावा घेतला. या महामंडळांना दिलेले उद्दिष्ट साध्य करावे. बँकेत प्रलंबित प्रकरणांचा पाठपुरावा करुन लाभार्थ्यांना लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. या बैठकीत जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय मस्कर, समाजकल्याण विभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त योगेश पाटील यांच्यासह विविध विभाग व महामंडळांचे अधिकारी उपस्थित होते.अपंग वित्तीय महामंडळाने अर्ज स्विकारणे परस्पर थांबविलेया आढावा बैठकीत अपंग वित्तीय महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांना राज्यमंत्री कांबळे यांनी चांगलेच धारेवर धरलेले पहायला मिळाले. वित्तीय महामंडळात किती उद्दीष्ट होते? किती पूर्ण झाले? याबाबत विचारणा केली. त्यावर मुदत कर्ज योजनेत १० विद्यार्थ्यांना १० लाख ९० हजारांचे कर्जवाटप केल्याचे सांगितले. त्यावर नव्याने किती अर्ज आले? याची विचारणा केली असता अर्ज घेणे थांबविले असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर या विषयाबाबत पूर्णपणे अनभिज्ञ असलेल्या राज्यमंत्री कांबळे यांनी कुणाच्या सांगण्यावरून अर्ज घेणे थांबविले? याची विचारणा केली असता महामंडळाच्या कार्यकारी संचालकांचे तसे लेखी आदेश आले असल्याचे सांगण्यात आले. मात्र कार्यकारी संचालक कोण? हे जिल्हा व्यवस्थापकांना व राज्यमंत्र्यांनाही माहिती नव्हते. कांबळे यांनी स्वीयसहाय्यकांना मुंबईत फोन लावण्याची सूचना केली. मात्र कार्यकारी संचालकांशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे महाव्यवस्थापकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तो देखील होऊ शकला नाही. एकंदारीत अर्ज घेणे थांबवून योजनेचा लाभ देणेच बंद करण्याचा निर्णयच खात्याच्या मंत्र्यांना अंधारात ठेवून घेतला असल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :Jalgaonजळगाव