शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
5
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
6
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
7
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
8
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
9
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
10
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
11
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
12
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
13
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
14
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
15
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
16
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
17
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
18
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
19
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
20
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका

पर्यायी रस्त्यासाठी २७ रोजी रेल्वे रोको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:11 IST

शिवाजीनगर बचाव समितीच्या सभेत रहिवासी एकटवले

ठळक मुद्देआता संघर्षाची वेळ :

जळगाव : शिवाजीनगर उड्डाणपूलाच्या कामाला आमचा विरोध नाही, प्रशासनाने पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देणे, ही आमची मागणी आहे. या यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांपासून ते पंतप्रधानांपर्यंत पत्रव्यवहार केला. तरीदेखील पर्यायी रस्ता मिळाला नाही. प्रशासन नागरिकांच्या जीवाशी खेळ खेळत असून, वेळेवर उपचार न मिळाल्याने आठवडाभरात तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यामुळे आता रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असून, पर्यायी रस्त्यासाठी येत्या २७ मार्च रोजी रेल्वे रोको करण्याचा निर्धार शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीच्या शुक्रवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत करण्यात आला. या वेळी बैठकीला उपस्थित नागरिकांनी प्रशासन व लोक प्रतिनिधी यांच्यावरही तीव्र संताप व्यक्त केला.जीर्ण झालेल्या शिवाजीनगर पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. यामुळे शिवाजीनगर भागातील रहिवाशांना सुरत रेल्वे गेटमार्गे मोठ्या फेऱ्यातून प्रवास करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजीनगर बचाव संघर्ष समितीतर्फे २२ मार्च रोजी सायंकाळी शिवाजीनगरातील क्रांती चौकात जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष दीपककुमार गुप्ता, राजेंद्र गाडगीळ, कार्याध्यक्ष इमरान शेख, उपाध्यक्ष मजहर पठाण, विजय बादल, सचिव जहागीर. ए. खान, सहसचिव शेख इकबाल शेख वजीर, कोषाध्यक्ष रमेश जोगी यांच्यासह नरेंद्र पिठवे, मसूद खान चाँद खान उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला राजेंद्र गाडगीळ यांनी पर्यायी रस्ता नसल्यामुळे विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून,रेल्वे रुळ ओलांडून जावे लागत आहे. रेल्वेच्या कामाला आमचा विरोध नाही. रेल्वे प्रशासनाने रहिवाशांचा त्रास लक्षात घेता, तात्काळ पर्यायी रस्ता उपलब्ध करण्याची मागणी केली. यानंतर विलास सांगोरे यांनी पर्यायी रस्ता उपलब्ध केल्यानंतरच पुलाचे काम सुरु करायला हवे होते. पर्यायी रस्ता नसल्यामुळे, नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत.प्रशासनाला वारंवार विनंती करुनही, लक्ष दिले जात नाही. त्यामुळे आपल्या मागण्यासांठी सर्वांनी एकत्र येण्याचे आवाहन त्यांनी केले.यानंतर दीपककुमार गुप्ता यांनी सांगितले की, पुलाच्या कामाला एक महिना होत असून, रेल्वे प्रशासनाने फक्त ५ इंचाचा पूल खोदला आहे. अतिशय संथ गतीने काम सुरु आहे. प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेतलेले नाही, नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरु असून, या आता पर्यायी रस्ता झाल्याशिवाय मागे न हटण्याचे आवाहन नागरिकांना केले. तसेच ‘टी’ आकाराच्या पूलालाही विरोध असून, याविरोधात आवाज उठविण्याचे सांगितले.रेल्वे प्रशासनासह ज्यांना आपण निवडून देतो, त्या लोकप्रतिनिधींचेही आपल्याकडे लक्ष नाही. त्यांनीदेखील शिवाजीनगरातील नागरिकांचा विश्वासघात केला असल्याचे संतप्त नागरिकांनी सांगितले.पर्यायी रस्त्यासाठी दोन विद्यार्थिनींनी दाखल केली याचिकापर्यायी रस्ता व्हावा, यासाठी आपल्या दोन मुलींनीदेखील न्यायालयात पुर्नयाचिका दाखल केली असल्याची माहिती दीपककुमार गुप्ता यांनी सांगितले. माझी एक मुलगी इयत्ता १२ व लहान मुलगी १० इयत्ता शिकते. त्यांनादेखील रेल्वे रुळ ओलांडून शाळेत जावे लागत आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शाळेत जाण्यासाठी पर्यायी रस्ता उपलब्ध करुन देण्या संदर्भात याचिका दाखल केली असून, यावर पुढील आठवड्यांत कामकाज असल्याचे सांगितले.