शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

साकेगावला जलद बसेसना थांबा द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2019 16:49 IST

भुसावळ शहरालगत असलेले व १५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या साकेगावातून सुमारे ५०० विद्यार्थी भुसावळ येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. जलद बस थांबत नसल्यामुळे तासन तास विद्यार्थ्यांना स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागते.

ठळक मुद्देविद्यार्थी व पालकांची मागणीजलद बस थांबा असूनसुद्धा बस थांबत नाहीविद्यार्थ्यांचे होते शैक्षणिक नुकसान

वासेफ पटेलभुसावळ, जि.जळगाव : शहरालगत असलेले व १५ हजारांपेक्षा जास्त लोकसंख्येच्या साकेगावातून सुमारे ५०० विद्यार्थी भुसावळ येथे शिक्षणासाठी ये-जा करतात. जलद बस थांबत नसल्यामुळे तासन तास विद्यार्थ्यांना स्थानकावरच ताटकळत उभे राहावे लागते. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.साकेगाव येथून भुसावळला शिक्षणासाठी जाण्याकरिता सकाळ व दुपार अशा दोन्ही सत्रांमध्ये पाचशेपेक्षा जास्त विद्यार्थी ये-जा करतात. शाळा उघडल्या असून, दिवसंदिवस विद्यार्थ्यांची शाळेत जाण्यासाठी संख्येत वाढ होत आहे. सकाळी व दुपारी तासन्तास पावसाळ्यात उभे राहूनसुद्धा जलद बस थांबत नाही. यामुळे वेळेवर शाळेत व महाविद्यालयात पोहोचणे कठीण होते. उशिराने पोहोचल्यास दोन-तीन तासिका बुडतात. हे प्रकार नित्याचे झाले आहेत. महाविद्यालयातून उशिरा आल्याने दररोज तंबी दिली जाते. यामुळे विद्यार्थ्यांची मानसिकता खचत असून इच्छा असूनसुद्धा बस वेळेवर येत नाही. जलद बस थांबत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.विद्यार्थ्यांसह शेकडो चाकरमाने करतात दररोज ये-जासाकेगाव येथून भुसावळ व जळगाव येथे विद्यार्थ्यांसह शेकडो चाकरमाने व व्यवसायिक दररोज ये-जा करतात. नेहमी स्थानकावर ये-जा करण्याची गर्दी असते. परंतु बसेस न थांबल्यामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नियोजन कोलमडते. गावात वैद्यकीय महाविद्यालय, डी-फार्मसी, बी-फार्मसी महाविद्यालय तसेच गावालगतच गोदावरी एमबीबीएस कॉलेज व रुग्णालय आहे. यासाठी स्थानिक विद्यार्थ्यांसह भुसावळ व जळगावहूनही बाहेरगावचे विद्यार्थी साकेगाव येथे दररोज ये-जा करतात. या विद्यार्थ्यांची ही महाविद्यालयात येण्यासाठी मोठी गैरसोय होते. बस वेळेवर येत नसल्यामुळे नाहक जास्तीचे भाडे देऊन खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. तसेच खाजगी वाहनेही भरगच भरल्याने मालवाहू वाहने, ट्रॅक्टर, ट्रक अशा गाड्यांचा आधार विद्यार्थी शैक्षणिक नुकसान होऊ नये याकरिता घेतात.हात दाखवा बस थांबवा उपक्रम फक्त नावालानेहमी तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाने मध्यंतरी प्रवाशांनी प्रतिसाद द्यावा म्हणून हात दाखवा बस थांबा उपक्रम सुरू केले होते. चार दिवस फक्त दाखवण्यासाठी हा उपक्रम यशस्वी झाला. त्यानंतर वाहक व चालक यांच्या मनमानी कारभारामुळे हात दाखवूनसुद्धा बस थांबवली जात नाही. अशा उपक्रमांना कर्मचारीच प्रतिसाद देत नसतील तर एसटी महामंडळाला नफा तरी कसा मिळणार, असा प्रश्नही उपस्थित होतो.वाहकांचा मुजोरपणाभुसावळ-जळगाववरून येणारी प्रवाशी घेऊन येणारी बस साकेगाव येथे प्रवाशांना उतरणारी एसटी गाडी एखादवेळेस थांबली व त्यांनी विद्यार्थी बसताना बघितले तर ते चुकीच्या पद्धतीने विद्यार्थ्यांशी अरेरावीची भाषा करतात. यामुळे विद्यार्थी मानसिक तणाव निर्माण होतो व त्याचा परिणाम अभ्यासावर होतो. संबंधित अधिकाऱ्यांनी चालकांना विद्यार्थ्यांची सन्मानाने व प्रवाशांची नीट वागावे याबाबत तंबी देणे गरजेचे आहे.

टॅग्स :Public Transportसार्वजनिक वाहतूकBhusawalभुसावळ